स्वामीं ना काय मागावे ?

Feb 8, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५८२(पर्व ४ थे भाग ८६)*

*आजचे चिंतन-मनन*

स्मरण तुझे मज नित्य असावे !
तव गुण भावे गावे !!
www.SwamiVaani.co.in

स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी म्हणजे स्वामीं ना केलेली प्रार्थना आहे…स्मरण तुझे मज नित्य असावे !तव गुण भावे गावे !! आपण स्वामीं कडे मागतो..स्वामीं मला हे..ते दे..माझे अमुक काम कर..तमुक काम कर..स्वामीं आपण मागतो ते देणारच आहेत.. आणि आपण ही मगितलेच पाहिजे..पण आपण काय मागतो हे फार महत्वाचे आहे..आपल्या मागण्यात व्यवहारिक पणा नसावा..माझे अमुक काम कर मी हे करेल..अरे स्वामीं  आहेत ते ब्रम्हांड  नायक त्यांना आपण काय देणार..दयाचे असतील तर आपल्यातील अवगुण स्वामीं चरणी  अर्पण करा.. मागायचे असेल तर..स्वामींनाच का मागू नये..स्वामीं तुम्ही माझे आहात..पण मला नेहमी याचा विसर पडतो..माझ्यासाठी काय चांगले काय वाईट हे आपण जाणता.. तरी देखील मी माझी मागण्याची सवय काही सोडत नाही..कारण जे माझ्यासाठी योग्य आहे ते तर तू देतच आहेस..देणारचं आहेस..पण मनाची सवय काही सुटत नाही..आम्हाला अशी बुद्धी दे की आम्ही प्रार्थनेत तुलाच मागू… मनाला नित्य तुझेच स्मरण व्हावे..मुखाने तूझे गुणगान होऊ दे…माझे मन नेहमी इतरच गोष्टी मागते..पण जिथे परमशांती आहे..स्व अनुभव आहे..ते मागत नाही..माझ्या मनाला तुझ्या नामावर स्थिर कर..कारण हे फक्त तूच करू शकतोस..कृपा कर समर्था..धन्यवाद समर्था.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय..!


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...