परमशांती मधील स्वरनाद – श्री स्वामी समर्थ

Feb 6, 2023 | Uncategorized, प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५८०(पर्व ४ थे भाग ८४)*

*आजचे चिंतन-मनन*

परमशांती मधील स्वरनाद तू ,
शून्या मधील अस्तित्व तू ,
बुद्धीच्या ही पलीकडे असलेला ,
ऐसा अतर्क्य समर्थ तू !!
www.SwamiVaanni.co.in

स्वामीं भक्तहो…परमशांती मधील स्वरनाद तू !!! आपण अनेकदा कळत न कळत कधी तरी म्हणतो मला शांती हवी आहे..पण ही शांती आहे तरी कुठे..याचे उत्तर मात्र आपणस मिळत नाही..आपण केवळ म्हणतो शांती शांती..मग आपण इतरत्र शांतीला शोधतो.. ही आपण शांती शोधतो.. स्वामीं तर आपणस परम शांती देत आहेत..पण ती आपण ग्रहण करत नाही..ती परम शांती आहे स्वामी नामात, स्वामीं चरणी, स्वामीं ध्यानी..फ़क्त गरज आहे त्या स्वामी नामाच्या स्वराशी एकरूप होण्याची…शून्या मधील अस्तित्व तू ..! शुन्य याला किंमत आहे की नाही आपण सर्वजण जाणतो..पैश्यात 0 नसेल तर काय होईल..परीक्षेत 0 मार्क मिळाले तर काय होते…वेळेत 0 सेकंदाचे…सर्वात महत्वाचे आयुष्याच्या शेवटचा श्वास घेतल्यानंतर आपण कुणीही।असलो तरी बरोबर काय येते ? शून्य..म्हणजेच शून्याला इतके।महत्त्व.. या शून्याचा वापर आपण करून घेतला पाहिजे कारण या शून्याच्या पलीकडे जे काही परम सत्य..परमशांती आहे ती म्हणजे ” श्री स्वामी समर्थ” कारण त्याच्या शिवाय कोणतेच अस्तित्व निर्माण होत नाही किंवा लय सुद्धा पावत नाही..बुद्धीच्या ही पलीकडे असलेला ,ऐसा अतर्क्य समर्थ तू !! पहा असा जो समर्था आहे तो कुठे आहे? आपणस हा प्रश्न विचारला की आपण आपल्या बुद्धीचा वापर सुरू करतो…आपल्या बुद्धितील तर्क.. वितर्क…मनातील विचार या द्वारे आपण त्याला शोधण्याचा प्रयत्न करतो…बुद्धी वर इतका भार देतों की मन म्हणते हे काही शकय नाही…बुद्धिवाद म्हणतो असे काहीच नाहीये..कारण आपण प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या माप दंडात मोजून पहातो.. पण आपण हे विसरतो किंवा आपणस माहिती नसते..ईश्वर ही बुद्धीने शोधण्यासाठी नाही तर ह्रदयातून हाक मारण्याची शक्ती आहे..पहा अनेक विषय बुद्धी ने सुटत नाहीत तेव्हा आपण म्हणतो ” दिमाग से नहीं दिल से काम करो”
म्हणजेच स्वामीं ची अनुभूती घ्यायची असेल तर ह्रदयातून होईल बुद्धीने नाही…कारण स्वामीं अतर्क्य आहेत..धन्यवाद स्वामीं…कोटी कोटी धन्यवाद…बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय..!


Share
और पढिये !!

स्वामींची भक्ती

स्वामी भक्तहो.. स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत भक्ती हवी.. आपण सर्व स्वामींची भक्ती करतो पण कधी कधी आपले मन स्वामी भक्ती मध्ये व्यवहारिक पणा आणते.. इथे एक गोष्ट स्प्ष्ट करावीशी वाटते ती म्हणजे प्रार्थना आणि व्यवहारिक पणा यातील भेद आपणस समजला पाहिजे..नक्कीच तो यातून...

अहंकार

हे समर्था... माझ्यातील अहंकार ही सर्वात मोठी बाधा आहे... माझ्यातील अहं म्हणतो..मी केले म्हणून हे होत आहे.. पण तुझ्या इच्छे शिवाय मी श्वास ही घेऊ शकत नाही पण माझ्यातील अहं हे विसरते..आणि खोट्या अहं पोटी माझे नुकसान होते.. माझ्यातील अहंकार नष्ट कर..कारण तो जो पर्यंत...

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..!

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..! श्रावण मासी हर्ष मानसी...आपल्या मनात भक्ती भाव वाढवण्याचा मास...आपण।अनेक संकल्प करतो..अनेक मंदिरात जातो..विशेषतः श्री शिव मंदिरात आपण जातो..आपण अनेक गोष्टी भगवान श्री शिव यांना अर्पण करतो..मग आपण अनेक गोष्टी पिंडीवर वाहतो..मग...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री खंडू पाटील रोज श्री महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जात असत.. श्री खंडू पाटील महाराजांना सवयी प्रमाणे गण्या असे म्हणत असत.. एकेदिवशी कुकाजी खंडू पाटलाला म्हणतात अरे तू रोज श्री महाराजांच्या...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री गजानन महाराज श्री हरी पाटलांच्या भावाला म्हणत आहेत बाळांनो तुमच्या हाताला खूप त्रास झाला असेल तो त्रास दूर करण्यासाठी तुम्हाला उसाचा रस काढून देतो हरी पाटील श्री महाराजांचे सेवक ( भक्त झाले )...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- जर असशील पैलवान तर मला उठव ( उचल ) शेंगांव मध्ये पाटील घराण्याचे खूप मोठे प्रस्त होते.. पाटलांना दोन मुले होते.. कडताजी आणि कुकाजी.. कडताजी यांना ६ मुले होती तर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- मी आता मंदिरात राहणार आहे जेव्हा तू बोलवशील तेव्हा नक्की येईल.. ! शेगांव चे पूर्वी नाव होते शिवगाव.. नंतर काळानुरूप त्याचे नाव शेगांव झाले.. महाराज शेगांव मध्ये...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे वज्रभूषणा तुझा सदैव जयजकार होईल.. कर्म मार्ग सोडू नकोस मात्र त्यात अडकू नकोस! शिवर गावात वज्रभूषण नावाचा पंडित राहत होता.. त्याला चारही वेदांचे ज्ञान होते.. तो...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २१ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे नरसिंगा तू उत्तम केलेस प्रपंचात राहिलास.. ! शेगावच्या जवळ असणाऱ्या अकोट गावी श्री गजानन महाराज श्री नरसिंग यांची भेट घेण्यासाठी जातात.. श्री नरसिंग यांना श्री महाराज बंधू मानत असा उल्लेख चरित्रात येतो.. असो नक्कीच श्री नरसिंग हे...

हे स्वामीं चे घर आहे…आम्ही स्वामीं च्या घरात राहतो

स्वामीं भक्तहो... अनेकदा आपण ऐकतो की वास्तू दोष आहे.. मग तो दोष घालवण्यासाठी आपण अनेक उपाय योजना करतो..आणि त्या केल्याचं पाहिजेत...पण मग याचाच एक भाग म्हणून आपण जर विचार केला की हा दोष आपण कसा दूर करू शकतो.. दोष कोणताही असो तो दूर होऊ शकतो पण जर आपले विचार बदलत नसतील...