मनातील सुख दुःख स्वामींना सांगावे !

Feb 5, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५४२(पर्व ४ थे भाग ४६)

आजचे चिंतन-मनन

मनातील सुख दुःख स्वामींना सांगावे !
माता म्हणोनिया !!
प्रपंचाची चिंता स्वामींवर सोडावी !
कुटुंब प्रमुख म्हणोनिया !!

www.SwamiVaani.com

स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी म्हणजे..सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत.. मन आणि सुख दुःख यांचं सुंदर असे नाते आहे..आपण नेहमी सुख दुःख इतरांना सांगत असतो..समोरची व्यक्तीला ते ऐकण्यात रस असतो की नाही ह्याचा आपण विचारही करत नाही..लहानपणी आपले सर्व सुख दुःख कुणाला सांगत होतो? आपल्या आईला.. आज आपण आपल्या आईशी बोलत नाही..खरंतर तर बोलले पाहिजे..असो नाही आईशी तर..स्वामीं आईला आपली सुख दुःख सांगा.. पहा आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात की नाही…फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा..फक्त दुःख सांगता बसू नका..स्वामीं आपण कसे दुःखातून बाहेर काढले हे स्वामीं ना सांगा..पहा काय अनुभव येतो..कुटुंबातील प्रमुख व्यक्तीवर सर्व चिंता सोडा..पहा आपण घरातील ज्येष्ठ व्यक्तीवर जबाबदारी देतो की नाही..आपण किती निवांत असतो..पण आपल्या मनाला वाटते की मीच सर्व करत आहे..घरातील कुटुंब प्रमुख पद स्वामीं ना द्या..पहा काय अनुभूती येते..इथे महत्वाची गोष्ट लक्षात असावी..आपणस आपले कर्म करायचेच आहे..हे सर्व जेव्हा आपण आचरणात आणू.. तेव्हाच आपणस याच्या आनंदाची अनुभुती येईल.. स्वामीं नाम घ्या..धन्यवाद स्वामीं..!


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...