नामाचा नको कंटाळा !

Feb 5, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५४१(पर्व ४ थे भाग ४५)

आजचे चिंतन-मनन

नामाचा नको कंटाळा !
स्वामींचा असावा जिव्हाळा !!
प्रेमभावे नित्य आळवावा !
स्वामी माझा !!
www.SwamiVaani.com

स्वामीं भक्तहो..आपणस कंटाळा येत नाही..गप्पा गोष्टी , व्हाट्स अप, फेसबुक,वा सोशल मीडियाचा,टीव्ही ,रेडिओ, चर्चा वा इतर गोष्टीचा पण स्वामीं नाम घ्यावे म्हंटलं की झोप येते, कंटाळा येतो..मग आपण स्वामीं नाम घेत नाही..खरंतर दिवसभरात किमान १ तास आपण सोशल मीडियावर असतो..हा १ तास आपण स्वामीं नाम सेवे साठी देऊ शकतो..पण आपला जिव्हाळा आहे..भौतिक वस्तू मध्ये..स्वामीं नामा वर जिव्हाळा निर्माण होण्यासाठी प्रथम आपणस स्वामीं नाम घ्यावे लागेल..आपल्या मनाला घेऊन आपणस रोज १ माळ, 3 माळ ११ माळ, २१ माळ जप सेवा करावी लागेल..तेव्हा हळूहळू स्वामीं नामात आपणस प्रेम, जिव्हाळा निर्माण होईल..एकदा स्वामीं नामात प्रेम निर्माण झाले की..आपले जीवन म्हणजे..आनंददायी असणार यात काहीच शंका नाही…जर चिर आनंद हवा असेल तर स्वामीं नाम घ्या..आपला प्रत्येक श्वास हा स्वामीमय बनला पाहिजे..स्वामीं नाम सेवेला पर्याय नाही..आणि जेव्हा आपल्याला स्वामीं नाम।महिमा समजेल तेव्हा.. ह्रदयातून स्वामीं नामाचे प्रेम अश्रू येतील..स्वामीं आपल्याला मिठीत घेण्यास तयार आहेत..पण आपण इतरत्र भटकत आहोत..अमुक गोष्ट केली तर स्वामीं खुष होतील..आणि माझे अमुक अमुक काम होईल..अहो आपले काम तर होणारच आहे..पण स्वामीं त्या पेक्षा मोठी गोष्ट आपणस देऊ करत आहेत..आपण फक्त प्रेम भावनेने स्वामीं नाम घेणे आवश्यक आहे..आपणस विनंती आहे..स्वामीं नाम घ्या..बाकी कोणती सेवा करण्याची गरजच भासणार नाही..फ़क्त स्वामीं नामला मिठी मारा..जर स्वामीं नी मिठीत घेतले नाही तर सांगा..स्वामी माझा कधीच निराश करत नाही..फक्त गरज आहे स्वामीं नाम सेवेची..धन्यवाद स्वामीं..!


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...