तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता !

Feb 5, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

आजचे चिंतन-मनन

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता !
शरण आलो तुला !!
‘मी’ पणाच्या जाळ्यात,मन हे फसले !
मुक्त कर तू मला !!

स्वामी भक्तहो.. तू सुखकर्ता- सर्व सुखाचे कारण स्वामी आहेत.. पण आपले मन नेहमी सुखात म्हणते कि मी कष्ट केले म्हणून आज हे सुखाचे दिवस आलेत.. म्हणजेच प्रत्येक गोष्टीत आपला मी पणा वर येतो.. मी अमुक करतो म्हणून हे घडते.. मी सेवा करतो… खरंच आपण करतो म्हणूनच सुख मिळते का? म्हणजे आपणच सुख कारक आहोत का? चला आता यावर विचार करू मग दुःख आल्यावर का बरं आपण म्हणतो कि मी फार कष्ट केले पण मला यश आले नाही..नशिबात नव्हते.. इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते कि आपणस दैववादी वा अंधश्रद्धा वादी नाही बनायचे पण आपणस कर्म करून विसरून जायचे आहे.. म्हणजेच कोणत्याही गोष्टीत आपल्यात मी पणा आपणस आणायचा नाहीये.. म्हणजेच आपणस कर्ते पणा स्वामींना अर्पण करायचा आहे.. पण आपल्यातील हा मी पणा कसा दूर होईल तर.. हा मी पण दूर करण्यासाठी आपणस आपल्या विचारांचे सूक्ष्म परीक्षण करणे आवश्यक आहे.. विचारांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न नाही करायचा पण त्या विचारांना योग्य ती दिशा देणे महत्वाचे आहे.. हे सर्व तेव्हा शक्य होईल जेव्हा आपण आपल्या विचारांना स्वामी नामावर स्थिर करायचे आहे..स्वामी नाम सेवेत सातत्य आणायचे आहे.. या सर्व गोष्टीसाठी आपणस स्वामींना आपल्या शब्दात प्रार्थना करणे आवश्यक आहे.. कारण प्रार्थना जेव्हा ह्रद्यातून येते तेव्हा त्यात आवश्यक भक्ती भाव उतरतो.. चला तर मग स्वामींनाच प्रार्थना करूया– हे समर्था तूच सुखकारक आहेस.. तूच दुःख विनाशक आहेस.. पण माझे मन नेहमी मी पणा मागते.. कृपा कर माझ्यातील मी पणाचा भाव दूर कर.. माझ्यातील मी पणा जोपर्यंत तुझी कृपा होत नाही तोपर्यंत तो दूर होऊ शकत नाही..मला मी पणा च्या जाळ्यातून मुक्त कर.. कारण हे तुझ्या कृपेशिवाय शकय नाही.. धन्यवाद समर्था.. हि समज दिल्याबद्दल धन्यवाद.. हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद.. !!


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...