अहंकार नसावा मनी !

Feb 5, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५३०(पर्व ४ थे भाग ३४)

आजचे चिंतन-मनन

अहंकार नसावा मनी !
समर्पित कर्म करावे प्रत्येक क्षणी !!
कर्ता करविता एकच समर्थ स्वामी !
ऐसा विवेक जागृत ठेवुनिया !!

www.SwamiVaani.com

वरील ओवीतून स्वामी आपणस काय सांगत आहेत .. अहंकार नसावा मनी.. म्हणजेच इथे पुन्हा आपल्या मनावर प्रहार करण्यात आला आहे.. आपले मन नेहमी मी.. मी चा पाढा म्हणत असते.. मी देवाचे इतकी सेवा करतो.. मी कुटुंबासाठी इतके करतो.. मी चा अहंकार आपल्या जीवनात इतका असतो कि.. आपणस असे वाटते कि मी करतो म्हणूनच होत आहे.. पण खरंच विचार करा आपण नव्हतो तेव्हा हि सर्व सुरु होते… मी नसेल तेव्हा हि सर्व सुरु असणारच आहे.. मग माझ्यातील मी काम करतो कि.. माझ्या द्वारे काम करून घेणारी दुसरी शक्ती आहे.. नक्कीच यावर चिंतन मनन कर.. म्हणजेच इथे स्वामी आपल्या तील अहंकारावर मात करण्यास सांगत आहेत.. अहंकार कमी झाला कि आपण जे काही कर्म करतो ते प्रत्येक कर्म स्वामींना समर्पित करा… जसे आज दिवसभर जे काम केले असेल.. स्वामी सेवा केली असेल ती सर्व स्वामींना अर्पण करा.. स्वामी ना म्हणावे धन्यवाद माझ्याकडून सेवा करून घेतलीस.. म्हणजेच इथे समर्पित भाव आपणस जागृत करायचा आहे… सर्व काही स्वामींच्या इच्छेने होत आहे.. स्वामीच कर्ता आहेत मी फक्त निमित्त आहे… हा विश्वास आपणस आपल्यात अंतर्मनात जागृत करायचा आहे.. चला मग आज आपल्यातील अहंकारावर काम करूया .. धन्यवाद समर्था .. !

 


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...