आपण म्हणतो कि चिंतन मनन केले पाहिजे.

Feb 5, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी भक्तहो .. आपण म्हणतो कि चिंतन मनन केले पाहिजे.. पण केले जात नाही कारण चिंतन मनन का करायचे.. याचा फायदा काय हेच आम्ही समजून घेत नाही .. चला आधी आपण चिंतन मनन म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करू… आपण सर्व शिकलो.. आज प्रत्येक जण काही तरी काम करतो.. पण बहुतांशी लोक म्हणतात कि मी जे शिकलो त्याचा आयुष्यात काहीच उपयोग होत नाही.. खरंच हे खरे आहे का ? आहे पण नाही पण कसे पहा.. आपण लहानपणी १,२ ,३,४,५, शिकलो बाराखडी शिकलो… याचा वापर आपल्या जीवनात होतो कि नाही.. होतो कसा तर आपणस अंक कळतात म्हणजेच आर्थिक व्यवहार करताना उपयोग होतो.. बाराखडी येते त्यामुळे आपण वाचू शकतो.. म्हणजेच आपला पाया पक्का आहे.. पण आपण ज्या क्षेत्रात करियर करतो त्याचा पायाचा मजबूत नाही म्हणून आपण म्हणतो कि याचा जीवनात उपयोग नाही .. कारण आपण शाळेत जो अभ्यास केला त्यावर कधीच चिंतन केले नाही.. तसेच हे जे काही ग्रंथ आहेत , स्वामी चरित , गुरुचरित्र, तारक मंत्र हे केवळ पारायण कण्यासाठी नाहीत तर त्यावर आपणस चिंतन मनन करायचे आहे.. कारण प्रत्येक ग्रंथात आपल्याला पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर असते पण आपण ते शोधत नाही तर आपण फक्त पारायण करतो.. जेव्हा तो ग्रंथ असेल वा ओवीं असेल आपल्या अंतःकरणात रुजेल तरच स्वामीं ना आपल्याकडून काय अपेक्षित आहे.. हे आपणस समजेल.. ग्रंथ कोणताही असो नुसता वाचण्यापेक्षा त्यावर चिंतन मनन करा पहा नक्कीच एक आनंददायी जीवनाची अभिव्यक्ती होईल.. असो आपण चिंतन मनन करावे.. स्वामी नाम घ्यावे.. स्वामी सेवेत दंग व्हावे हीच स्वामी चरणी प्रार्थना

 


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...