Share

स्वामी वाणी पुष्प ५२३(पर्व ४ थे भाग २७)

कर्ता आणि करविता ।
तूचि एक स्वामीनाथा ।
माझिया ठाई वार्ता ।
मीपणाची नसेची ॥
– स्वामी चरित्र सारामृत अ.१ ओ.५०
www.SwamiVaani.com

वरील ओवीवर आपण चिंतन मनन केले तर अनेक प्रश्नाचे उत्तर स्वामी आपणस देतात.. कर्ता हा भाव हा आपल्यात असणारा गुण आहे.. प्रत्येक गोष्टीत आपण आपले कर्ते पण दाखवत असतो.. मी हे काम केले म्हणून झाले.. मी स्वामींची सेवा करतो.. म्हणजेच आपल्यातील मी नेहमी जागृत असतो.. पण खरंच आज या वर आपण आपणस प्रश्न विचारायचा आहे कि खरंच मीच कर्ता आहे का? अहो झाडाचे पान देखील त्याच्या इच्छे शिवाय हालत नाही.. त्याची इच्छा नसेल तर आपल्या मुखात स्वामी नाम येत नाही..मग खरंच आपण कर्ता आहोत का ? जर खरंच आपण यावर चिंतन मनन केले तर आपणस उत्तर मिळेल कि नाही मी कर्ता नाही.. माझ्या मार्फत कार्य करणारी शक्ती आहे.. पण आपले मन मी पणा सोडत नाही त्यामुळे प्रत्येक गोष्टीत मीच कर्ता आहे असे मला वाटते.. हे समर्था तूच कर्ता आहेस .. आमच्या मार्फत तूच प्रत्येक कार्य करवून घेतोस.. हि समज आम्हाला प्राप्त होत आहे त्याबद्दल धन्यवाद.. हि समज कायम असू दे हीच प्रार्थना.. जे काही कार्य तू माझ्याकडून करवून घेत आहेस.. त्यात माझ्या अंगी मी पणाचा अहंकार येऊ देऊ नकोस.. कारण आज मला समजले आहे जो पर्यंत तुझी इच्छा होत नाही तो पर्यंत कोणतेच कार्य होत नाही.. धन्यवाद समर्था.. हि समज दिल्याबद्दल धन्यवाद… !!


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...