आपण सर्व जाणतो का ?

Feb 5, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५७९(पर्व ४ थे भाग ८३)

आजचे चिंतन-मनन

न शास्त्र जाणतो , न धर्म जाणतो ,
न भक्ती जाणतो , न सेवा जाणतो !
मुठमती मी अज्ञानी,
तुझ्या चरणापेक्षा काहीही मोठे नाही
इतुके मात्र जाणतो !
www.SwamiVaani.co.in

स्वामी भक्तहो.. आजची स्वामी वाणी समज हि आहे आणि प्रार्थना हि आहे.. हे समर्था मी शास्त्र जाणत नाही.. पहा आपण एखादे शास्त्राचा जरी आपण परिपूर्ण अभ्यास केला तरी देखील त्यातील काही तरी ज्ञान आपण जाणत नसतो.. पहा जसे आपणस एका जीव शास्त्राचे ज्ञान आहे तर भौतिक चे नाही.. हाच नियम अध्यात्मात हि लागू होतो.. न धर्म जाणतो.. इथे आपण म्हणू असे कसे मला माहित आहे कि मी अमूक अमुक धर्मात जन्म घेतला आहे हे मी जाणतो कि.. अहो पण इथे धर्म याचा अर्थ आहे आपणस मुख्य मनुष्य जन्माचा धर्म कोणता आहे.. नक्की कोणता धर्माचे पालन स्वामींना अपेक्षित आहे.. याचे आपल्या माहिती नाही.. न भक्ती जाणतो , न सेवा जाणतो ! आपण भक्ती कशी करावी सेवा कोणती करावी हे पण जाणत नाही..पहा आपण एका देवाची भक्ती करतो का नाही.. आपण या देवाची भक्ती करतो कधी त्या देवाची सेवा करतो.. म्हणजेच आपले चित्त एका ठिकाणी स्थिर होते का नाही..म्हणजेच आपण सर्वच गोष्टीत अज्ञानी आहोत.. पण मग या सर्वांवर उपाय काय.. स्वामी चरण सेवा.. कारण आपण कितीही ज्ञान प्राप्त केले तरी जो पर्यत आपणस सत्याचे ज्ञान मिळत नाही तो पर्यंत सर्व व्यर्थ आहे..यावर उपाय काय स्वामी नाम सेवा.. रोज स्वामी नाम घ्या.. वेळ मिळाला कि स्वामी नाम घ्या.. स्वामी नाम साठी वेळ द्या.. स्वामी नाम ध्यान करा.. पहा स्वामी कृपेचा वर्षाव कसा होतो .. हा स्व अनुभव आहे.. धन्यवाद स्वामी.. कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...