देहभान हरपणे म्हणजे काय ?

Feb 3, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५७५(पर्व ४ थे भाग ७९)*

*आजचे चिंतन-मनन*

देहाचें भान न उरो !
गळून जाऊ दे अहंपणा !
कर चित्ताची शुद्धता !
मात्र तव चरण दर्शने !!

www.SwamiVaani.co.in
स्वामीं भक्तहो.. आजच्या स्वामीं वाणीत पहिली ओवी आहे…देहाचें भान न उरो ! देहाचे भान विसरून जर आपण एखादे काम करत असू तर आपणस त्या कामात यश नक्की प्राप्त होते..हा नियम आध्यत्मिक बाबतीत ही लागू होतो..पण इथे एक गल्लत आपली होऊ शकते…अन्न पाण्याचा त्याग करणे..असा अर्थ नसून.. स्वामीं नाम घेताना आपणस इतर गोष्टीचा त्याग करता यावा..जसे स्वामीं नाम घेताना आपणस झोप येते..कंटाळा येतो..या गोष्टींवर आपणस मात करण्याची समज स्वामीं आपणस देत आहेत.. पहा आपणस स्वामीं नाम घेताना झोप येते किंवा कंटाळा येतो..मग हे असे का होते यावर आपणस कार्य करायचे आहे..पहा जेव्हा आपण यावर काम करू तेव्हा आपला देह स्वामीं नाम सेवेस तयार होणार आहे..म्हणजेच आपल्या देहाचे भान हरपेल.. यासाठी मनाला आणि शरीराला स्वामीं नाम सेवेस बसवा..मन नको म्हणेल..ते का नको म्हणता आहे..त्याचा अभ्यास करा..आपल्यातील ते दोष दूर करा..नक्कीच आपणस यश येईल..गळून जाऊ दे अहंपणा ! अध्यात्म असो वा व्यक्तीगत जीवन यात मोठा अडसर कोणता असेल तर..तो आहे..अहंपणा..पहा मी इतकी सेवा करतो..सेवा कोण करतो मी..मी इतके देवाचे करतो…म्हणजेच अहंपणा..अहो त्याच्या इच्छे शिवाय आपण पुढचा श्वास घेऊ शकत नाही..स्वामीं सेवा किंवा इतर गोष्टी काय करणार..इथं असा गैरसमज करून घेऊ नका मी काहीच कर्म करणार नाही..असे नाही सर्व काही करा पण आपल्यातील अहंपणा सोडा..कर्म करून विसरून जा..म्हणजेच स्वामीं सेवा केली असे म्हणण्या ऐवजी म्हणा…” स्वामीं नी सेवा करून घेतली” पहा कसा हळूहळू अहंभाव गळून पडेल..कर चित्ताची शुद्धता !
मात्र तव चरण दर्शने !! पहा जर आपले चित्त शुद्ध नसेल तर आपणस अडचणी येतात..पहा दोन भांडी आहेत..दोन्ही स्वच्छ दिसतात..एक भांडे असे आहे त्यात नकळत थोडा भांडे घासण्याचा साबण राहिला आहे..पहा काय परिणाम होईल..जर आपल्या दिसले तर आपण ते स्वच्छ करू..जर ते स्वच्छ नाही केले तर त्यातील दूध खराब होईल..त्याच प्रमाणे आपण जर आपले चित्त शुद्धी केली नाही तर…आपण कोणतेच कार्य व्यवस्थित करू शकता नाही..म्हणून रोज प्रत्येक क्षणी चित्त शुद्धी वर लक्ष ठेवा..आपले चित्त स्वामीं चरणी लीन व्हावे यासाठी प्रार्थना करा..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नक्कीच यश देतील..धन्यवाद स्वामीं.. कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय..!


Share
और पढिये !!

स्वामींची भक्ती

स्वामी भक्तहो.. स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत भक्ती हवी.. आपण सर्व स्वामींची भक्ती करतो पण कधी कधी आपले मन स्वामी भक्ती मध्ये व्यवहारिक पणा आणते.. इथे एक गोष्ट स्प्ष्ट करावीशी वाटते ती म्हणजे प्रार्थना आणि व्यवहारिक पणा यातील भेद आपणस समजला पाहिजे..नक्कीच तो यातून...

अहंकार

हे समर्था... माझ्यातील अहंकार ही सर्वात मोठी बाधा आहे... माझ्यातील अहं म्हणतो..मी केले म्हणून हे होत आहे.. पण तुझ्या इच्छे शिवाय मी श्वास ही घेऊ शकत नाही पण माझ्यातील अहं हे विसरते..आणि खोट्या अहं पोटी माझे नुकसान होते.. माझ्यातील अहंकार नष्ट कर..कारण तो जो पर्यंत...

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..!

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..! श्रावण मासी हर्ष मानसी...आपल्या मनात भक्ती भाव वाढवण्याचा मास...आपण।अनेक संकल्प करतो..अनेक मंदिरात जातो..विशेषतः श्री शिव मंदिरात आपण जातो..आपण अनेक गोष्टी भगवान श्री शिव यांना अर्पण करतो..मग आपण अनेक गोष्टी पिंडीवर वाहतो..मग...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री खंडू पाटील रोज श्री महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जात असत.. श्री खंडू पाटील महाराजांना सवयी प्रमाणे गण्या असे म्हणत असत.. एकेदिवशी कुकाजी खंडू पाटलाला म्हणतात अरे तू रोज श्री महाराजांच्या...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री गजानन महाराज श्री हरी पाटलांच्या भावाला म्हणत आहेत बाळांनो तुमच्या हाताला खूप त्रास झाला असेल तो त्रास दूर करण्यासाठी तुम्हाला उसाचा रस काढून देतो हरी पाटील श्री महाराजांचे सेवक ( भक्त झाले )...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- जर असशील पैलवान तर मला उठव ( उचल ) शेंगांव मध्ये पाटील घराण्याचे खूप मोठे प्रस्त होते.. पाटलांना दोन मुले होते.. कडताजी आणि कुकाजी.. कडताजी यांना ६ मुले होती तर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- मी आता मंदिरात राहणार आहे जेव्हा तू बोलवशील तेव्हा नक्की येईल.. ! शेगांव चे पूर्वी नाव होते शिवगाव.. नंतर काळानुरूप त्याचे नाव शेगांव झाले.. महाराज शेगांव मध्ये...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे वज्रभूषणा तुझा सदैव जयजकार होईल.. कर्म मार्ग सोडू नकोस मात्र त्यात अडकू नकोस! शिवर गावात वज्रभूषण नावाचा पंडित राहत होता.. त्याला चारही वेदांचे ज्ञान होते.. तो...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २१ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे नरसिंगा तू उत्तम केलेस प्रपंचात राहिलास.. ! शेगावच्या जवळ असणाऱ्या अकोट गावी श्री गजानन महाराज श्री नरसिंग यांची भेट घेण्यासाठी जातात.. श्री नरसिंग यांना श्री महाराज बंधू मानत असा उल्लेख चरित्रात येतो.. असो नक्कीच श्री नरसिंग हे...

हे स्वामीं चे घर आहे…आम्ही स्वामीं च्या घरात राहतो

स्वामीं भक्तहो... अनेकदा आपण ऐकतो की वास्तू दोष आहे.. मग तो दोष घालवण्यासाठी आपण अनेक उपाय योजना करतो..आणि त्या केल्याचं पाहिजेत...पण मग याचाच एक भाग म्हणून आपण जर विचार केला की हा दोष आपण कसा दूर करू शकतो.. दोष कोणताही असो तो दूर होऊ शकतो पण जर आपले विचार बदलत नसतील...