स्वामी वाणी पुष्प ५७५(पर्व ४ थे भाग ७९)*
*आजचे चिंतन-मनन*
देहाचें भान न उरो !
गळून जाऊ दे अहंपणा !
कर चित्ताची शुद्धता !
मात्र तव चरण दर्शने !!
www.SwamiVaani.co.in
स्वामीं भक्तहो.. आजच्या स्वामीं वाणीत पहिली ओवी आहे…देहाचें भान न उरो ! देहाचे भान विसरून जर आपण एखादे काम करत असू तर आपणस त्या कामात यश नक्की प्राप्त होते..हा नियम आध्यत्मिक बाबतीत ही लागू होतो..पण इथे एक गल्लत आपली होऊ शकते…अन्न पाण्याचा त्याग करणे..असा अर्थ नसून.. स्वामीं नाम घेताना आपणस इतर गोष्टीचा त्याग करता यावा..जसे स्वामीं नाम घेताना आपणस झोप येते..कंटाळा येतो..या गोष्टींवर आपणस मात करण्याची समज स्वामीं आपणस देत आहेत.. पहा आपणस स्वामीं नाम घेताना झोप येते किंवा कंटाळा येतो..मग हे असे का होते यावर आपणस कार्य करायचे आहे..पहा जेव्हा आपण यावर काम करू तेव्हा आपला देह स्वामीं नाम सेवेस तयार होणार आहे..म्हणजेच आपल्या देहाचे भान हरपेल.. यासाठी मनाला आणि शरीराला स्वामीं नाम सेवेस बसवा..मन नको म्हणेल..ते का नको म्हणता आहे..त्याचा अभ्यास करा..आपल्यातील ते दोष दूर करा..नक्कीच आपणस यश येईल..गळून जाऊ दे अहंपणा ! अध्यात्म असो वा व्यक्तीगत जीवन यात मोठा अडसर कोणता असेल तर..तो आहे..अहंपणा..पहा मी इतकी सेवा करतो..सेवा कोण करतो मी..मी इतके देवाचे करतो…म्हणजेच अहंपणा..अहो त्याच्या इच्छे शिवाय आपण पुढचा श्वास घेऊ शकत नाही..स्वामीं सेवा किंवा इतर गोष्टी काय करणार..इथं असा गैरसमज करून घेऊ नका मी काहीच कर्म करणार नाही..असे नाही सर्व काही करा पण आपल्यातील अहंपणा सोडा..कर्म करून विसरून जा..म्हणजेच स्वामीं सेवा केली असे म्हणण्या ऐवजी म्हणा…” स्वामीं नी सेवा करून घेतली” पहा कसा हळूहळू अहंभाव गळून पडेल..कर चित्ताची शुद्धता !
मात्र तव चरण दर्शने !! पहा जर आपले चित्त शुद्ध नसेल तर आपणस अडचणी येतात..पहा दोन भांडी आहेत..दोन्ही स्वच्छ दिसतात..एक भांडे असे आहे त्यात नकळत थोडा भांडे घासण्याचा साबण राहिला आहे..पहा काय परिणाम होईल..जर आपल्या दिसले तर आपण ते स्वच्छ करू..जर ते स्वच्छ नाही केले तर त्यातील दूध खराब होईल..त्याच प्रमाणे आपण जर आपले चित्त शुद्धी केली नाही तर…आपण कोणतेच कार्य व्यवस्थित करू शकता नाही..म्हणून रोज प्रत्येक क्षणी चित्त शुद्धी वर लक्ष ठेवा..आपले चित्त स्वामीं चरणी लीन व्हावे यासाठी प्रार्थना करा..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नक्कीच यश देतील..धन्यवाद स्वामीं.. कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय..!