स्वामीं नाम आणि आपले जीवन

Feb 3, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

💐 *स्वामी वाणी पुष्प ५७७(पर्व ४ थे भाग ८१)*

*आजचे चिंतन-मनन*

नाम घ्यावे,नाम द्यावे !
नाम सांगावे, नाम ऐकावे !
नाम पुजावे,नाम भजावे !
अवघे जीवन करावे नाममय !!

www.SwamiVaani.co.in

स्वामीं भक्त हो..नामाचा महिमा काय वर्णन करावा..नामाचा महिमा हा जेव्हा आपण नाम घेतो..त्यात सातत्य ठेवतो..तेव्हा नामाचा महिमा अनुभवास येतो..जर आपणस नामाची अनुभूती हवी असेल तर नाम घ्या..कोणतेही नाम घ्या…असे नाही की अमुकच नाम घ्यावे..कोणतेही नाम घ्यावे..नामावर मनाल स्थिर करा…नाम द्यावे..इथे आपणस वाटते की इतरांना नाम दयाचे आहे..असे नाही तर आपल्या मनाला, विचारांना खाद्य द्यावे कशाचे तर नामाचे.. रोज जेवतो..तसे मनाला ही खाद्य हवे आहे कोणते..नामाचे..मनाला नाम रुपी सेवेचे खाद्य द्या..नाम सांगावे.. इथे आपणस वाटते की इतरांना नाम घेण्यास सांगायचे आहे..असे नाहीये..आपल्या मनाला सांगा आता बाकी काही आवश्यकता नाही..स्वामीं नामच सर्व काही आहे..आता किती दिवस ही सेवा करू की ती करू..नको नको आता फक्त मनाला एकच ध्यास लागावा..यासाठी स्वामीं नाम घ्यावे..नाम ऐकावे..काय ऐकावे हे सुद्धा आपणस इथे स्वामीं समज देत आहेत.. स्वामीं नाम ऐका.. स्वामीं चरित्र ऐका.. स्वामीं महिमा ऐका.. आपण दिवसाची सुरुवात कशाने करतो..सकाळी उठले की काय ऐकतो..सकारात्मक विचार ऐकणे हे सुद्धा स्वामीं नामच..म्हणजेच असे ऐका ज्याने आपली चेतना उंचावेल..बाकी काही नाही ऐकता आले तर..स्वतः स्वामी नाम घ्या आपल्याला ऐकू येईल त्या आवाजात..तेच श्रवण करा…नाम पुजावे.. इथे आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो..नामाची पुजा करायची म्हणजे काय..आता एक उदाहरण पहा आपण काय जपतो, कशाची पुजा करतो..दिवस रात्र आपण कष्ट करतो..पैसे कमवण्यासाठी..म्हणजेच एक प्रकारे पूजा करतो..पैसे आवश्यक आहेतच..आता मग स्वामी नामाची पुजा कशी करावी..ज्याप्रमाणे आपण नेहमी पैसे कमी होऊ नये या साठी प्रयत्न करतो..त्याचप्रमाणे ” स्वामी नामाची पुजा करा” स्वामी नामाचा विसर होणार नाही, जसा पैसे महत्वाचे तसे आपल्या जीवनात नामाला महत्व द्या..जसा पैसे वाढतात तसे आपल्या जीवनात नामाचे महत्त्व वाढावे..ही एकच अशी गोष्ट आहे जी आपल्या जीवनातून कमी करू शकत नाही..नाम असे जपा की शेवटचा श्वास हा स्वामी नामाचाच असेल..या साठी रोज स्वामीं नाम घ्या..नाम भजावे.. नाम भजावे म्हणजे आपल्या मुखाने स्वामीं नाम घ्या..बाकी वायफळ बडवड करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्या जिभेला स्वामीं नामाची गोडी द्या..पहा जेव्हा जिभेला ही सवय लागेल तेव्हा प्रत्येक परिस्थितीत स्वामीं नामच येईल..आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण हा स्वामीं नाममय बनवू..इथे आपल्या मनात येते असे कसे.. अहो जेव्हा आपल्या मनात हा भाव निर्माण होईल स्वामीं नाम सेवा ( इतर कोणतेही नाम) ही सेवा स्वयंपूर्ण सेवा आहे..आता बाकी कोणती सेवेची आवश्यकता नाही..हे जेव्हा आपल्या अंतर्मनात कोरले जाईल…स्वामीं नामच आपल्या।मुखातून येईल..स्वामीं भजन होईल..प्रत्येक कर्म स्वामीं सेवा वाटेल तेव्हाच आपले जीवन स्वामीं मय होणार आहे..या साठी आपणस रोज स्वामीं नाम सेवा करायची आहे..स्वामीं ना प्रार्थना करायची आहे..नक्कीच स्वामीं कृपा होत आहे..आपले जीवन स्वामीं मय होत आहे..धन्यवाद स्वामीं.. कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय..!


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...