अतूट श्रद्धा म्हणजे काय?

Jan 31, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५७३(पर्व ४ थे भाग ७७)*

*आजचे चिंतन-मनन*

श्रध्दा अतूट-अभेद्य करा !
स्वामी चरणी भाव धरा !
जन्म सार्थक निश्चित !!

www.SwamiVaani.co.in
स्वामीं भक्तहो.. जशी आपली श्रद्धा असेल तसे फल आपणस प्राप्त होत असते..आपण म्हणतो आमची स्वामी वर किंवा या या देवावर श्रद्धा आहे..पण श्रद्धा आणि अतूट श्रद्धा यात फरक आहे..पहा जेव्हा आपण लहान असतो आपणस सर्व काही चांगलेच दिसते तेव्हा आपण समोरील प्रत्येक व्यक्तीवर श्रद्धा ठेवतो ही आपली अतूट श्रद्धा..आता आपण स्वामीं सेवा करतो तेव्हा आपले अमुक अमुक काम व्हावे म्हणून सेवा करतो..जेव्हा आपल्या मनात देवघेव हा विचार असतो तेव्हा आपली जरी श्रद्धा असेल तरी ती अतूट होता नाही..कारण मनात अनेक शंका डोकावत असतात..माझे काम होईल का नाही..काम कसे होणार..म्हणजेच आपल्या तील श्रद्धा तर आहे पण ती अतूट नाही..पण जर आपल्या मनात हा विचार असेल स्वामीं जे काही करणार आहेत ते योग्यच आहे..मी फक्त स्वामीं नाम व माझे कर्म १०० % स्वामीं सेवा म्हणून करणार आहे…यश येवो किंवा अपयश मी थांबणार नाही..कारण माझा स्वामींच्या नियोजनावर पूर्ण विश्वास आहे..ही आहे अतूट श्रद्धा आहे..स्वामींच्या चरणी आपला।अशी श्रद्धा असेल विश्वास असेल तर..आपल्या जीवनाचे सार्थक होतेच..म्हणून आपण आपल्यातील श्रद्धा अतूट करूया..धन्यवाद स्वामीं.. कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय..!


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...