आत्महत्या -पाप आहे कि पुण्य आहे

Oct 29, 2022 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

 

आत्महत्या – आपण अनेकदा ऐकतो किंवा वाचतो कि अमुक अमुक व्यक्तींनी आत्महत्या केली.. आपण ऐकतो हळहळ व्यक्त करतो.. जवळची व्यक्ती असेल तर कदाचित आपल्या डोळ्यातही अश्रू येतात..काही दिवसा नंतर आपण सर्व जण विसरून जातो.. आपण अनेकदा हेही ऐकले आहे कि आत्महत्या करणे पाप आहे वगैरे… खरंतर हे पाप आहे कि पुण्य आहे हा विषय फारच गौण आहे.. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे जीवन अनमोल असे आहे.. मग ती व्यक्ती तरुण असो म्हातारी असो…ज्या व्यक्तींनी आत्महत्या केली आहे त्या व्यक्तीला तर आपण परत आणू शकत नाही.. पण आज समाजात अनेक व्यक्ती आहेत कि त्यांच्या मनात हा विचार येऊन जातो कि नको हे जीवन.. काही व्यक्ती तर आत्महत्येचा विचार करतात.. काही प्रयत्न करतात.. काही त्यात वाचतात तर काही मरतात.. खरंच ज्या व्यक्तीच्या मनात हे विचार येतात त्यांच्याशी हा संवाद आहे.. खरंच तुमचे जीवन इतके स्वस्त आहे का हो ? नऊ महिने आई तुम्हाला पोटात सांभाळलं.. स्वतः त्रास सहन केला फक्त तुमचा जन्म व्हावा यासाठी.. जन्म झाल्यानंतर आई बापाने तुमची तळ हाताच्या फोडा प्रमाणे तुमची काळजी घेतली.. रात्र रात्र जागून काढली पण तुम्हाला स्वस्थ ठेवले.. स्वतः एक वेळ जेवण केले नाही पण तुम्हाला २ वेळेस पोटभर जेवू घातले.. स्वतः शिकले नाही पण तुम्हाला मात्र चांगले शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी प्रयत्न केले…तुम्हाला चांगले शिकवले.. तुम्ही चांगल्या नोकरी ला लागलात.. तुमचे लग्न करून दिले.. किंवा तुम्ही तुमच्या मना प्रमाणे लग्न केले.. आता तुमची जबाबदारी वाढली.. जीवनात असे काही प्रसंग आले कि तुमच्या मनात प्रश्न येऊ लागले कि आता मरून जावे किंवा आत्महत्या करावी.. आत्महत्या करण्याची कारणे काय तर यावर चिंतन केले तर खालील कारणे सापडतात.
१) आई वडिलांनी अमुक एखादी गोष्ट दिली नाही म्हणून आत्महत्या – अरे मुला तुला समजत आहे का तू काय करत आहेस.. अरे जी गोष्ट मागत आहेस तिची खरंच तुला गरज आहे का ? अरे जरा विचार कर आई वडील कष्ट करतात त्यांना तुमची काळजी आहे.. एखादी गोष्ट मिळत नाही म्हणून तू जीव देत आहेस.. तुझ्या सारखा मूर्ख तूच आहेस असा वेडे पणा करू नकोस.. इथे पालकांनी देखील आपल्या मुलांशी संवाद साधायला हवा.
२) परीक्षेत कमी मार्क पडले वा नापास होणार म्हणून आत्महत्या – अरे जेव्हा अभ्यास करण्याची वेळ होती तेव्हा झोपा काढल्यास आणि आता  परिस्थती पासून पळत आहेस अरे आत्म हत्या करू नकोस अपयश आले म्हणून खचून जाऊ नकोस.. पुन्हा प्रयत्न कर.. यश नक्कीच मिळेल.. इथेही पालकांनी मुलांशी संवाद साधावा.                                                                    ३)प्रेमात अपयश – एखादी मुलगा किंवा मुलगी एकमेकांसाठी आत्महत्या करतात – खरंच अश्या मुलांची किंव येते कारण प्रेम म्हणजे काय हेच माहित नाही आणि म्हणे हंम एक दुजे के सिवाय जी नही सकते.. अरे खरं प्रेम असे नसते रे.. प्रेम म्हणजे त्याग.. इथं त्यागा पेक्षा मरण बरं असे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या सारखे दरिद्री तुम्हीच आहात
४) कौटुंबिक वाद – यातून देखील अनेकजण आत्महत्या करतात.. खरंतर अनेक वाद आपल्यातील अहंकारापोटी होत असतात.. जर आपण आपल्यातील मी पणा सोडला तर नक्कीच वाद कमी होतील.. तरी देखील वाद होत असतील तर त्यावर चिंतन मनन करा पण जीव देऊ नका
५) कर्ज बाजरी पणा- आपल्या कडे सर्वात जास्त लोक कर्ज बाजरी पणा मूळे आत्महत्या करतात.. खरंच हा विचार जर तुमच्या मनात येत असेल तर पुढील प्रश्न स्वतःला विचारा माझ्यावर किती कर्ज आहे.. हे कर्ज नाही फेडले तर काय होऊ शकते.. माझी कर्ज फेडण्याची इच्छा आहे का? जर असेल तर काय केले तर हे कर्ज मी फेडू शकतो? माझी हि कर्जाची अडचण मी कुणाशी संवाद साधून बोलू शकतो का? मी जर आत्महत्या केली तर हे कर्ज माफ होईल का? कर्ज जरी माफ झाले तरी माझी बायको , मुले , आई ,वडील यांनी त्यांचा पुढचा उदर निर्वाह कसा करायचा.. माझे जीवनाचे मूल्य इतके कमी आहे का? हे प्रश्न किमान १० वेळेस विचारा नक्कीच तुमचे उत्तर तुम्हाला मिळेल.
नक्कीच मनुष्य जन्म एकदाच मिळतो.. मेल्यावर काय होते हे अजून तरी कुणाला माहित नाही.. माणूस दिसत नाही हे सर्वांना माहित आहे पण नक्की काय होते माहित नाही.. ईश्वराने दिलेले जीवन पूर्णपणे जगूया.. आपण मेल्याने काही फरक पडत नाही पण फरक पडतो आपल्या कुटुंबाला.. जर आपण जीव देऊ शकतो याचाच अर्थ आपण कष्ट करून इतिहास हि घडवू शकतो…आता इतिहास घडवायचा कि इतिहास जमा व्हायचे हे तुम्हीच ठरवा.. समस्या तर असणारच आहे.. प्रत्येक व्यक्तीला समस्या आहे.. समस्या आहे त्या मुळेच सुखाला किंमत आहे.. आणि जगातील सर्व भौतिक वस्तूपेक्षा मौल्यवान जर काही असेल तर आहे आपला जीव..आपली समस्या घेऊन रडत बसू नका.. समस्या व्यक्त करा.. वाईट विचार आले तर व्यक्त व्हा.. पण अमूल्य असा जीव.. आत्महत्या करून संपवू नका.. हा जन्म पुन्हा नाही नक्कीच आपण हुशार आहात यावर चिंतन मनंन कराल .

चला तर मग समर्थांना प्रार्थना करूया हे समर्था आज तू आम्हाला जीवन म्हणजे काय हे सांगितलेस त्याबद्दल धन्यवाद.. अनेकदा माझे नकारात्मक मन.. लढण्यापेक्षा पळण्याकडे धाव घेते.. यातून मी हे अमूल्य जीवन नष्ट करण्याचा विचार मनात येऊन जातो त्याबद्दल मला माफ कर.. असे नकारात्मक विचार नष्ट कर.. आम्हाला संकटाशी लढण्याची बळ दे.. सामर्थ्य दे.. तुला अपेक्षित असणारी जीवनाची अभिव्यक्ती आमच्यकडून करून घे.. हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद.. !


Share
और पढिये !!

स्वामींची भक्ती

स्वामी भक्तहो.. स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत भक्ती हवी.. आपण सर्व स्वामींची भक्ती करतो पण कधी कधी आपले मन स्वामी भक्ती मध्ये व्यवहारिक पणा आणते.. इथे एक गोष्ट स्प्ष्ट करावीशी वाटते ती म्हणजे प्रार्थना आणि व्यवहारिक पणा यातील भेद आपणस समजला पाहिजे..नक्कीच तो यातून...

अहंकार

हे समर्था... माझ्यातील अहंकार ही सर्वात मोठी बाधा आहे... माझ्यातील अहं म्हणतो..मी केले म्हणून हे होत आहे.. पण तुझ्या इच्छे शिवाय मी श्वास ही घेऊ शकत नाही पण माझ्यातील अहं हे विसरते..आणि खोट्या अहं पोटी माझे नुकसान होते.. माझ्यातील अहंकार नष्ट कर..कारण तो जो पर्यंत...

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..!

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..! श्रावण मासी हर्ष मानसी...आपल्या मनात भक्ती भाव वाढवण्याचा मास...आपण।अनेक संकल्प करतो..अनेक मंदिरात जातो..विशेषतः श्री शिव मंदिरात आपण जातो..आपण अनेक गोष्टी भगवान श्री शिव यांना अर्पण करतो..मग आपण अनेक गोष्टी पिंडीवर वाहतो..मग...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री खंडू पाटील रोज श्री महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जात असत.. श्री खंडू पाटील महाराजांना सवयी प्रमाणे गण्या असे म्हणत असत.. एकेदिवशी कुकाजी खंडू पाटलाला म्हणतात अरे तू रोज श्री महाराजांच्या...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री गजानन महाराज श्री हरी पाटलांच्या भावाला म्हणत आहेत बाळांनो तुमच्या हाताला खूप त्रास झाला असेल तो त्रास दूर करण्यासाठी तुम्हाला उसाचा रस काढून देतो हरी पाटील श्री महाराजांचे सेवक ( भक्त झाले )...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- जर असशील पैलवान तर मला उठव ( उचल ) शेंगांव मध्ये पाटील घराण्याचे खूप मोठे प्रस्त होते.. पाटलांना दोन मुले होते.. कडताजी आणि कुकाजी.. कडताजी यांना ६ मुले होती तर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- मी आता मंदिरात राहणार आहे जेव्हा तू बोलवशील तेव्हा नक्की येईल.. ! शेगांव चे पूर्वी नाव होते शिवगाव.. नंतर काळानुरूप त्याचे नाव शेगांव झाले.. महाराज शेगांव मध्ये...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे वज्रभूषणा तुझा सदैव जयजकार होईल.. कर्म मार्ग सोडू नकोस मात्र त्यात अडकू नकोस! शिवर गावात वज्रभूषण नावाचा पंडित राहत होता.. त्याला चारही वेदांचे ज्ञान होते.. तो...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २१ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे नरसिंगा तू उत्तम केलेस प्रपंचात राहिलास.. ! शेगावच्या जवळ असणाऱ्या अकोट गावी श्री गजानन महाराज श्री नरसिंग यांची भेट घेण्यासाठी जातात.. श्री नरसिंग यांना श्री महाराज बंधू मानत असा उल्लेख चरित्रात येतो.. असो नक्कीच श्री नरसिंग हे...

हे स्वामीं चे घर आहे…आम्ही स्वामीं च्या घरात राहतो

स्वामीं भक्तहो... अनेकदा आपण ऐकतो की वास्तू दोष आहे.. मग तो दोष घालवण्यासाठी आपण अनेक उपाय योजना करतो..आणि त्या केल्याचं पाहिजेत...पण मग याचाच एक भाग म्हणून आपण जर विचार केला की हा दोष आपण कसा दूर करू शकतो.. दोष कोणताही असो तो दूर होऊ शकतो पण जर आपले विचार बदलत नसतील...