श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा – श्री महादेवांनी हि कथा रचली व सर्वप्रथम ती माता पार्वती यांना सांगितली… श्री शंकरांनी हि कथा काकभुशुंडी ऋषींना दिली कारण ते राम भक्त होते… काकभुशुंडी ऋषींनी याज्ञवल्क्य ऋषींना ऐकवली याज्ञवल्क्य ऋषींनी श्री भारद्वाज ऋषींना ऐकवली.. . श्री रामाची कथा हि ज्ञानाची भांडार आहे… श्री रामाची कथा हि बुद्धिवान लोकांना विवेकी बनण्यास मदत करते.. आपल्या मनात असणाऱ्या शंकाचे निराकरण या कथेने होते… कथा हि अमृतरूपी आहे.. म्हणजेच आपणस प्रेरणा देणारी अशी आहे.. सर्व दुःख, भय यांचा नाश करणारी आहे.. खरंतर राम कथा हि आपल्यातील असुरी विचार, आचार यांचा नाश करणारी आहे… भक्ती , प्रेम आणि श्रद्धा यांची खाण हि राम कथा आहे… श्री तुलसीदास म्हणतात रामकथा हि मंदाकिनी नदी सारखी आहे.. निर्मळ अशी.. श्री रामाचे चरित्र हे धर्म, अर्थ , काम , मोक्ष यांची खाण आहे.. रोगाचे निवारक अशी वैद्य आहे.. शोक , भय दुःख विनाशक आहे… आपल्या मनातील काम क्रोधाची नाश करणारी आहे… आपल्या मनातील सर्व इच्छांची पुर्ती करणारी आहे… संपूर्ण जगाचे कल्याण करणारी अशी हि राम कथा आहे.. जसा पौर्णिमेचा चंद्र अंधार दूर करतो तशी हि राम कथा आपल्या जीवनातील अंधार दूर करते… थोडक्यात काय तर श्री राम कथा हा आपल्या सर्वांसाठी अभ्यासाचा चिंतन मननं करण्याचा असा ग्रंथ आहे.. फक्त यात एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे एकदम कोणत्याही तर्क वा वितर्क न लावता संपूर्ण कथा वाचण्याचा श्रवण करण्याचा… त्यावर चिंतन मनन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत… !
स्वामींची भक्ती
स्वामी भक्तहो.. स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत भक्ती हवी.. आपण सर्व स्वामींची भक्ती करतो पण कधी कधी आपले मन स्वामी भक्ती मध्ये व्यवहारिक पणा आणते.. इथे एक गोष्ट स्प्ष्ट करावीशी वाटते ती म्हणजे प्रार्थना आणि व्यवहारिक पणा यातील भेद आपणस समजला पाहिजे..नक्कीच तो यातून...