श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा

Oct 29, 2022 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा – श्री महादेवांनी हि कथा रचली व सर्वप्रथम ती माता पार्वती यांना सांगितली… श्री शंकरांनी हि कथा काकभुशुंडी ऋषींना दिली कारण ते राम भक्त होते… काकभुशुंडी ऋषींनी याज्ञवल्क्य ऋषींना ऐकवली याज्ञवल्क्य ऋषींनी श्री भारद्वाज ऋषींना ऐकवली.. . श्री रामाची कथा हि ज्ञानाची भांडार आहे… श्री रामाची कथा हि बुद्धिवान लोकांना विवेकी बनण्यास मदत करते.. आपल्या मनात असणाऱ्या शंकाचे निराकरण या कथेने होते… कथा हि अमृतरूपी आहे.. म्हणजेच आपणस प्रेरणा देणारी अशी आहे.. सर्व दुःख, भय यांचा नाश करणारी आहे.. खरंतर राम कथा हि आपल्यातील असुरी विचार, आचार यांचा नाश करणारी आहे… भक्ती , प्रेम आणि श्रद्धा यांची खाण हि राम कथा आहे… श्री तुलसीदास म्हणतात रामकथा हि मंदाकिनी नदी सारखी आहे.. निर्मळ अशी.. श्री रामाचे चरित्र हे धर्म, अर्थ , काम , मोक्ष यांची खाण आहे.. रोगाचे निवारक अशी वैद्य आहे.. शोक , भय दुःख विनाशक आहे… आपल्या मनातील काम क्रोधाची नाश करणारी आहे… आपल्या मनातील सर्व इच्छांची पुर्ती करणारी आहे… संपूर्ण जगाचे कल्याण करणारी अशी हि राम कथा आहे.. जसा पौर्णिमेचा चंद्र अंधार दूर करतो तशी हि राम कथा आपल्या जीवनातील अंधार दूर करते… थोडक्यात काय तर श्री राम कथा हा आपल्या सर्वांसाठी अभ्यासाचा चिंतन मननं करण्याचा असा ग्रंथ आहे.. फक्त यात एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे एकदम कोणत्याही तर्क वा वितर्क न लावता संपूर्ण कथा वाचण्याचा श्रवण करण्याचा… त्यावर चिंतन मनन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत… !


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...