श्री रामचरित मानस 2 – महिमा राम नामाचा

Oct 26, 2022 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

महिमा राम नामाचा – श्री रामचरित मानस मध्ये संत श्रेष्ठ तुलसी दासजी महाराज राम नामाचा महिमा वर्णन करत आहेत… सर्वप्रथम राम नामाला वंदन असो… खरंतर राम नामाचा महिमा शब्दात व्यक्त करणे कठीण आहे… हा महामंत्र आहे.. इथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते कि ती हि कि भगवंताचे प्रत्येक नाम हे श्रेष्ठच आहे.. नाही तर काय होते आपण तुलना करत बसतो… पहा श्री वाल्मिकी ऋषींनी राम नाम उलटे घेतले म्हणजे त्यांनी राम.. राम जप करण्याऐवजी.. मरा.. मरा असा जप केला तरीहि नाम जपाच्या प्रभावाने वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाले हे आपण सर्व जाणताच.. राम नाम जपाने आपल्यात भक्ती जागृत होते.. याचा जप करणे खूप सोपे असे आहे.. कुठेही आपण जप करू शकतो.. याला काळ ,वेळ, स्थळ याचे बंधन नाही.. नाम जपा मुळे इहलोकी तर कल्याण होतेच पण त्याच प्रमाणे परलोकतही आपले कल्याण होते.. जीव आणि ब्रम्ह यांची अनुभूती घेण्याचा मार्ग म्हणजे नाम सेवा… आपली जीभ जशी चांगली चव हवी असते तसेच एकदा आपल्या जिभेला राम नामाची चव लागली कि मग इतर कोणत्याच चवीची अपेक्षा राहत नाही… तुलसी दास महाराज म्हणतात राम नामाची दोन्ही अक्षरे हि अत्यंत श्रेष्ठ अशीच आहेत..आता आपल्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो कि राम नाम व प्रभू श्री राम हे एकच आहेत कि वेगळे आहेत ? याचे उत्तर आहे ते एकच आहेत.. मग आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो कि मग नामच का घ्यावे… याचे उत्तर देताना तुलसी दास महाराज म्हणतात पहा एखादा सेवक असतो तो आपल्या स्वामींच्या मागेच असतो तसाच जिथे नाम तिथे श्री राम… थोडक्यात भगवंत हे नामाच्या आधीन असतात.. पहा आपणास कोणत्याही वस्तूचे स्वरूप समजण्यासाठी तिचे नाव माहित असणे आवश्यक आहे त्याशिवाय आपण तिला ओळखू शकत नाही तसेच राम नामाशिवाय आपण रामाला ओळखू शकत नाही… सगुण असो वा निर्गुण असो स्वरूप समजण्यासाठी नामच मार्ग आहे… तुलसीदास महाराज म्हणतात जर आपणस आंतर्बाह्य प्रकाश हवा असेल तर आपणस आपल्या मुखात कायम राम नामाचा वास असणे आवश्यक आहे… नामाने धर्म अर्थ काम मोक्ष यांची प्राप्ती होते… वेद सुद्धा नामाचा महिमा गातात.. कलियुगात ईश्वर सेवेचा सर्वात सुलभ सोप्पा मार्ग म्हणजे नाम सेवा… नाम म्हणजे सर्व काही… नाम हे सर्वव्यापक आहे.. भगवंताचा निवास आपल्या हृदयात आहे.. त्याचे दर्शन हे नाम जप सेवेने सुलभ होते.. राम नाम हे रामपेक्षा हि मोठे आहे… नामाने आपला उद्धार होतो… आपले आचार विचार यांत बदल होतो… आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग नाम रुपी सेवा… आपल्या मनास पवित्र करण्याचे साधन राम नाम… सेतू बांधताना राम नाम रूपीच सेतू बांधावा लागला व तो तयार झाला हे आपण सर्वच जांणतोच म्हणजेच यशाचा सेतू म्हणजे राम नाम… थोडक्यात निर्गुण निराकाच्याही पलीकडे जे काही आहे ते राम नाम थोडक्यात श्री रामांना जाण्याचं असेल तर राम नामाशिवाय ते शक्य नाही म्हणून आपणस राम नाम घ्यायचे आहे.. !
बोध – वरील नाम महिमा यावर आपण चिंतन मनन केले तर आपणस नक्कीच हा बोध होतो कि… सर्वांत सुंदर.. सोपी ईश्वर सेवेचा मार्ग म्हणजे नाम जप रुपी सेवा.. हि सेवा आपण जितकी अधिकाधिक करू तसे आपल्यातील वृत्ती, विषय , विकार नाश होतील.. नक्कीच आपणस त्यावर चिंतन मनन करून आपल्यातील जे दोष दिसत आहेत.. ते हळू हळू करून नष्ट करायचे आहेत… या साठी आपणस नाम रुपी सेवा मदत करणार आहे.. फक्त यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपणस सेवेत सातत्य ठेवणे आवश्यक आहे.. चला तर आज पासून नाम रुपी सेवेस सुरवात करूया


Share
और पढिये !!

देवी भगवतीला प्रार्थना –

https://youtu.be/TCahq34720k हे देवी भगवती.. राजा सुरथ आणि समाधी यांना निमित्त करून तू आम्हाला आमच्यातील मोह, लोभ, मायेचे दर्शन करून दिलेस त्याबद्दल धन्यवाद मधू आणि कैटभ ज्या प्रमाणे बलवान होते त्याप्रमाणे आमच्यातील हे लोभ , मोह , माया हे विकार आमच्यात खोलवर रुजले...

ध्यान म्हणजे काय?

https://youtu.be/OjvH-OX4ATo     ध्यान..ध्यान म्हणजे काय? खरंच ध्यान म्हणजे काय..आपण अनेकदा ऐकतो ध्यान केले पाहिजे..पण ध्यान म्हणजे काय..आपण याचे अनेक फायदे ऐकतो..मग आपणासही वाटते ध्यान करावे..मग प्रत्येक जण म्हणतो की अमुक अमुक ध्यानाची पद्धती श्रेष्ठ...

जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस… !

https://youtu.be/ys7eNZGQJeU श्री गजानन महाराज म्हणत आहेत... जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस... ! लीला -श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी शेगांव येथेच रहात होते.. ते काशी चे गोसावी होते.. त्यांनी...

डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी व लाखोंच्या सकारत्मक प्रार्थनेने मृत्यूच्या दारातून परत.. स्वामीं सेवेकरी…!

आपण नेहमी म्हणतो की स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून रहावे.. म्हणजेच आपले कर्म निस्वार्थ भावनेने करावे..फळाची अपेक्षा करू नये...खरंच काय असते निःस्वार्थ सेवा..अशी निःस्वार्थ सेवा करणारे कुणी आहेत का... असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होईल तर याचे उत्तर आहे हो..असे...

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ – गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ - गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा... !  आपण लीला क्रमांक ७ मध्ये पाहिले कि श्री गजानन महाराज श्री बंकटलाल यांच्या घरीच राहिले.. दुसऱ्या दिवशी श्री गजानन महाराजांची विविध प्रकारचे सुंगधी द्रव्याने स्नान घातले.. षोडश उपचारे...

पितृपक्ष – पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा

पितृपक्ष - पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा, आपल्याकडे दरवर्षी भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपदी अमावास्या हा साधारण १५ ते १६ दिवसाची कालावधी ला आपण पितृपक्ष म्हणतो. पितृपक्ष म्हंटलं कि आपल्या कडे आपण म्हणतो कि कोणतेच धार्मिक  कार्य या महिन्यात करायची नाही हे आपण आज...

श्री गणपती बाप्पा ची मूर्ती आपणस काय प्रेरणा देत आहे

श्री गणपती बाप्पा ची मूर्तीची आपण स्थापना करतो हि मूर्ती आपणस अनेक गोष्टींची प्रेरणा देते.. चला तर मग आज आपण यावर चिंतन मनन करण्याचा प्रयत्न करूया...विशाल मस्तक आपणस प्रेरणा देते ज्या प्रमाणे बाप्पा बुद्धी ची देवता आहे त्याचप्रमाणे आपण कायम नवनवीन ज्ञान प्राप्त केले...

प्रार्थना – दोष कुणाचा

हे समर्था.. आज पर्यंत मला वाटत होते की समोरची व्यक्तीच चुकीची आहे..पण आज मला समजले की दोष समोरच्यात नाही तर माझ्या विचारांत आहे..माझ्या विचारांतील दोष दूर कर..कारण माझे जसे विचार तशीच सृष्टी मला प्राप्त होणार आहे..माझी दृष्टी..विचार..आचार प्रेम..आनंद..मौनमय...

प्रार्थना – प्रार्थना म्हणजे काय ?

प्रार्थना - प्रार्थना म्हणजे काय ? खरंतर आपण लहान पणा पासून प्रार्थना करत आलो आहोत..  तरी देखील आज यावर चिंतन मनन करणे आवश्यक आहे.. कारण अनेकदा आपण प्रार्थना करतो तरी देखील आपण पहातो कि काही प्रार्थना पुर्ण होतात काही होत नाही असे का ? खरंतर आपण प्रार्थना काय करतो...