ध्यान म्हणजे काय?

Sep 21, 2022 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

 

 

ध्यान..ध्यान म्हणजे काय? खरंच ध्यान म्हणजे काय..आपण अनेकदा ऐकतो ध्यान केले पाहिजे..पण ध्यान म्हणजे काय..आपण याचे अनेक फायदे ऐकतो..मग आपणासही वाटते ध्यान करावे..मग प्रत्येक जण म्हणतो की अमुक अमुक ध्यानाची पद्धती श्रेष्ठ आहे..आणि मग ध्यान ध्यान न राहता एक तांत्रिक पद्धत बनते..खरंतर ध्यान म्हणजे सृष्टीची अशी व्यवस्था ज्यात आपण..आपल्या स्व अवस्थेवर जाण्यासाठी केलेला प्रयत्न..म्हणजेच काय ज्या अवस्थेत आपण आपल्या स्वतःशी संवाद साधू शकतो अशी पद्धती म्हणजे ध्यान..असो..जशी व्यक्ती तितक्या प्रकृती तसेच प्रत्येकाची ध्यान करण्याची वेगळी वेगळी पद्धती असणार..आणि ती चुकीची असू शकत नाही..म्हणून सर्वप्रथम आपणस अमुक एक पद्धतीच योग्य असा जर आपल्या मनात असेल तर आपणस सर्वप्रथम काढून टाकायचा आहे..कारण ध्यानाची सुरवातच विना अट होते..
ध्यानात सुरवातच मुळात मनावर होते..आपण ध्यान करण्यास सुरुवात करतो..आपले मन पहिल्या दिवशी विरोध करत नाही..पण एक दोन दिवसात आपणस नको नको वाटते..आपले मन आज नको उद्या करू असा प्रतिसाद देते..म्हणुन सर्वप्रथम आपणस मन नाही म्हंटले तरी ध्यान करण्यासाठी बसायचे आहे..ध्यान करण्यास बसले की मनात विचारांचा काहूर सुरू होईल..जसे विचार येतील तसे जातील ही..पण आपले काय होते..मी आज ध्यान केले म्हणजे लगेचच माझे मन निर्विचार झाले पाहिजे..खरंतर असे एका दिवसात होऊ शकत नाही..या साठी अनेक वर्षे आपणस दयावे लागतील..काही जण ध्यान या मुळे करत नाहीत कारण मनातील विचार थांबत नाहीत..खरंतर आपण कधीच निर्विचार होणार नाही मग आपण कधीच ध्यान करणार नाही का..सर्वप्रथम हा विचार मनातून काढून टाका की..ध्यान करताना विचारच मनात आले नाही पाहिजे..जसे विचार येतील तसे ते निघूनही जातात..फक्त गरज आहे आपण बसण्याची..आता मनात प्रश्न येतो की ध्यान किती वेळ करावे.. दिवसातील किमान २० मिनिटे आपण ध्यान करावे…सुरवातीला ही वेळ खूप मोठी वाटेल..पण सराव केल्यानंतर ही वेळ फार कमी वाटेल..म्हणून आज पासून किमान २० मिनिटे स्वतः साठी देऊया…ध्यान करताना अनेकांच्या मनात प्रश्न असतो की कुठे बसून ध्यान करावे.. कसे बसावे..खरंतर ज्या ठिकाणी २० मिनिट आपण बसू शकतो..ज्या आसनात आपणस त्रास होत नाही..अश्या ठिकाणी..आसनात बसून ध्यान करावे…मग खुर्चीवर बसूनही आपण ध्यान करू शकतो…
आता ध्यान कोणते करावा हा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो..खरंतर वर सांगितल्याप्रमाणे आपणस जे योग्य वाटेल..त्या पासून सुरवात करा..सुरवात महत्वाची..इथे पद्धती सांगत आहोंत..
१)श्वासावर ध्यान- यात आपण केवळ आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करतो..म्हणजे आपणस डोळे मिटून बसायचे.. मोबाईल।मध्ये २० मिनिटांचा टाईमर लावा.. हळूहळू डोळे बंद करा..आपले लक्ष श्वासावर केंद्रित करा..आपणस लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करायचा आहे..अनेकदा आपले लक्ष विचलित होते..परत आपणस त्याला श्वासावर केंद्रित करायचे आहे..ही पद्धत आपण वापरू शकता..!
2) दुसरी पद्धत प्रत्येकाची कोणत्या तरी देवावर श्रद्धा..विश्वास असतो..आपण त्या देवतेचा मंत्राचा जप करत असतो..जसे श्री स्वामी समर्थ..इथे आपणस आपल्या इष्ट देवतेचा मंत्र जप श्वासावर करायचा आहे..इथे जप।मोजायचा नाही..फक्त प्रत्येक श्वासावर जप करण्याचा प्रयत्न करायचा आहे..प्रत्येक नामावर आपणस अधिकाधिक नामावर ध्यान करायचे आहे…ही खूपच छान अशी ध्यानाची पद्धती आहे..!
आपण आपणस जी योग्य वाटेल.. ती पद्धत आपण निवडू शकता..गरज आहे फक्त ध्याना साठी बसण्याची.. बाकी सर्व समर्थ करून घेतात..!
चला आपण समर्थांना ध्यानासाठी प्रार्थना करूया…!
हे समर्था..आज ध्यानवर चिंतन.. मनन करून घेतले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद..ह्रदयात तुझा वास आहेस..परंतु दिसत नाहीस..त्या दर्शनासाठीचं तर ध्यानाची सुविधा तू निर्माण करून दिली आहेस..माझ्या मनाला ध्यानासाठी तयार कर..आम्हाला ध्यानावर स्थिर कर…आमचा प्रत्येक श्वास स्वामीमय बनव..ही समज दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.. ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद..!


Share
और पढिये !!

स्वामींची भक्ती

स्वामी भक्तहो.. स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत भक्ती हवी.. आपण सर्व स्वामींची भक्ती करतो पण कधी कधी आपले मन स्वामी भक्ती मध्ये व्यवहारिक पणा आणते.. इथे एक गोष्ट स्प्ष्ट करावीशी वाटते ती म्हणजे प्रार्थना आणि व्यवहारिक पणा यातील भेद आपणस समजला पाहिजे..नक्कीच तो यातून...

अहंकार

हे समर्था... माझ्यातील अहंकार ही सर्वात मोठी बाधा आहे... माझ्यातील अहं म्हणतो..मी केले म्हणून हे होत आहे.. पण तुझ्या इच्छे शिवाय मी श्वास ही घेऊ शकत नाही पण माझ्यातील अहं हे विसरते..आणि खोट्या अहं पोटी माझे नुकसान होते.. माझ्यातील अहंकार नष्ट कर..कारण तो जो पर्यंत...

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..!

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..! श्रावण मासी हर्ष मानसी...आपल्या मनात भक्ती भाव वाढवण्याचा मास...आपण।अनेक संकल्प करतो..अनेक मंदिरात जातो..विशेषतः श्री शिव मंदिरात आपण जातो..आपण अनेक गोष्टी भगवान श्री शिव यांना अर्पण करतो..मग आपण अनेक गोष्टी पिंडीवर वाहतो..मग...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री खंडू पाटील रोज श्री महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जात असत.. श्री खंडू पाटील महाराजांना सवयी प्रमाणे गण्या असे म्हणत असत.. एकेदिवशी कुकाजी खंडू पाटलाला म्हणतात अरे तू रोज श्री महाराजांच्या...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री गजानन महाराज श्री हरी पाटलांच्या भावाला म्हणत आहेत बाळांनो तुमच्या हाताला खूप त्रास झाला असेल तो त्रास दूर करण्यासाठी तुम्हाला उसाचा रस काढून देतो हरी पाटील श्री महाराजांचे सेवक ( भक्त झाले )...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- जर असशील पैलवान तर मला उठव ( उचल ) शेंगांव मध्ये पाटील घराण्याचे खूप मोठे प्रस्त होते.. पाटलांना दोन मुले होते.. कडताजी आणि कुकाजी.. कडताजी यांना ६ मुले होती तर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- मी आता मंदिरात राहणार आहे जेव्हा तू बोलवशील तेव्हा नक्की येईल.. ! शेगांव चे पूर्वी नाव होते शिवगाव.. नंतर काळानुरूप त्याचे नाव शेगांव झाले.. महाराज शेगांव मध्ये...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे वज्रभूषणा तुझा सदैव जयजकार होईल.. कर्म मार्ग सोडू नकोस मात्र त्यात अडकू नकोस! शिवर गावात वज्रभूषण नावाचा पंडित राहत होता.. त्याला चारही वेदांचे ज्ञान होते.. तो...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २१ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे नरसिंगा तू उत्तम केलेस प्रपंचात राहिलास.. ! शेगावच्या जवळ असणाऱ्या अकोट गावी श्री गजानन महाराज श्री नरसिंग यांची भेट घेण्यासाठी जातात.. श्री नरसिंग यांना श्री महाराज बंधू मानत असा उल्लेख चरित्रात येतो.. असो नक्कीच श्री नरसिंग हे...

हे स्वामीं चे घर आहे…आम्ही स्वामीं च्या घरात राहतो

स्वामीं भक्तहो... अनेकदा आपण ऐकतो की वास्तू दोष आहे.. मग तो दोष घालवण्यासाठी आपण अनेक उपाय योजना करतो..आणि त्या केल्याचं पाहिजेत...पण मग याचाच एक भाग म्हणून आपण जर विचार केला की हा दोष आपण कसा दूर करू शकतो.. दोष कोणताही असो तो दूर होऊ शकतो पण जर आपले विचार बदलत नसतील...