जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस… !

Sep 18, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

श्री गजानन महाराज म्हणत आहेत… जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस… !

लीला -श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी शेगांव येथेच रहात होते.. ते काशी चे गोसावी होते.. त्यांनी श्री गजानन महाराज यांची महिमा ऐकून एक व्रत घेण्याचा निर्णय घेतला.. त्यांनी असे व्रत घेतले कि जर माझे अमुक अमुक काम झाले तर अमुक अमुक वस्तू श्री महाराजांना अर्पण करेल.. त्यांनी अमुक अशी वस्तू अर्पण करण्याचा निर्णय या साठी घेतला होता या मागे कारण असे होते कि ती वस्तू त्यांना फार आवडत होती.. काही दिवसातच त्यांचे काम झाले.. आता व्रताची पूर्ती करण्याचा दिवस आला त्यासाठी शेगांव मध्ये आले… आल्या नंतर त्यांनी पाहिले कि श्री महाराजांच्या दर्शनासाठी तर फारच गर्दी आहे.. त्यांनी विचार केला कि इतक्या गर्दीत माझे दर्शन कसे होणार… आणि इतक्या गर्दीत दर्शन झाले तरी मी जी वस्तू अर्पण करणार आहे ती इतक्या गर्दीत कशी अर्पण करणार.. कारण हि वस्तू पाहूनच लोक मला मारण्यास देखील कमी करणार नाहीत.. त्याच्या मनात हे विचार सुरु होते… त्याच वेळी श्री महाराजांना त्याच्या मनातील विचार समजले.. श्री महाराजांनी तिथे असणाऱ्या एका भक्ताला श्री गोसावी यांना बोलवण्यास सांगितले.. श्री गोसावी नम्रता पूर्वक श्री महाराजांच्या समोर हाथ जोडून उभे राहिले.. तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणतात.. तू आणलेली भेट आम्हाला दे.. जी तीन महिण्यापासून तुझ्या पिशवीत आहे.. श्री महाराजांची हि वाणी ऐकून तो अचंबित झाला… त्याच प्रमाणे श्री महाराज त्यांना म्हणाले ” जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस… ! अश्या पद्धतीने योग्य समज देऊन श्री महाराजांनी श्री गोसावी यांच्या व्रताची पूर्ती करून घेतली.. बोला श्री गजानन महाराज कि जय … !

बोला – अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद
भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

बोध – वरील लीला तर आपल्या साठी ज्ञानाचा भंडार आहे.. श्री गोसावी यांना समस्या होती ती समस्या सुटण्यासाठी त्यांनी व्रत घेतले.. व्रत असे घेतले कि जे त्यांना आवडत होते… जेव्हा त्यांचे काम होते व व्रत पूर्ती करण्याची वेळ येते तेव्हा ते घाबरू लागेल… अशीच स्थिती आपली सुद्धा होते… आपणस देखील काही समस्या आली तर आपण सुद्धा काही तर व्रत म्हणा किंवा संकल्प घेतो परंतु तो घेताना देखील आपण आपणस आवडणारा संकल्प घेतो… यातून महाराज सांगत आहेत.. व्रत घ्यायचे असेल तर असे व्रत घ्या ज्यातून आपल्यात जीवनात बदल घडेल.. वास्तविक भगवंताला आपल्याकडून कोणतीच भौतिक वस्तू नको आहे भगवंताची इच्छा आहे कि व्रताला निमित्त करून आपण आपल्यातील वाईट सवयींचा त्याग करून आपले जीवन आनंददायी बनवावे… काही जणांना तर सवयच असते कि काहीही समस्या आली कि लगेचच काही तर व्रत घेतात म्हणजे माझे अमुक काम झाले तर अमुक एखादी वस्तू अर्पण करेल.. खरंतर भगवंत व आपल्यातील नाते हे व्यवहारिक नाते आहे का ? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा.. जर याचे उत्तर नाही असे असेल तर भगवंताला मागायचे असेल तर भक्ती मागा… त्यासाठी कणखर पणा मागा.. त्यावर चालण्याचा संकल्प घ्या… ज्याने ब्रम्हांड निर्माण केले त्याला आपल्याकडून कोणत्याच भौतिक वस्तू नको आहेत.. तो तर म्हणत आहे उच्चतम अभिव्यक्ती कर.. किती खोल असा संदेश श्री महाराज आपणस देत आहेत… !

चला आपण श्री महाराजांना प्रार्थना करूया – श्री गजानन महाराज आम्हाला आपल्याकडे काय मागावे याची समज नाही… आजच्या लीलेतून आपण आम्हाला हि समज दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद… आम्हाला व्यवहारिक नाही तर आम्हाला तुझी प्रेमळ भक्ती दे… आम्हाला काही मागण्याची नाही तर देण्याची सवय आमच्यात दृढ कर.. आमच्यातील विकार अर्पण करण्याची शक्ती .. समज आम्हाला दे.. हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद .. !

 

 


Share
और पढिये !!

क्षमा म्हणजे काय ?

💐 *स्वामी वाणी पुष्प ५७४(पर्व ४ थे भाग ७८)* *आजचे चिंतन-मनन* जया अंगी क्षमा भाव करुणेचा ! ऐसा भक्त सदैव प्रिय स्वामींचा !! म्हणोनि चुकलेल्या माफ करावे ! चूक झाली तर नम्र भावें माफी मागावे !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. क्षमा म्हणजे काय? इंग्रजीत आपण सॉरी...

अतूट श्रद्धा म्हणजे काय?

स्वामी वाणी पुष्प ५७३(पर्व ४ थे भाग ७७)* *आजचे चिंतन-मनन* श्रध्दा अतूट-अभेद्य करा ! स्वामी चरणी भाव धरा ! जन्म सार्थक निश्चित !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. जशी आपली श्रद्धा असेल तसे फल आपणस प्राप्त होत असते..आपण म्हणतो आमची स्वामी वर किंवा या या देवावर...

स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ?

प्रश्न- स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ? चिंतन- स्वामीं भक्तहो..आजचा प्रश्न हा इतका खोल आहे की ज्यावर प्रत्येकाने चिंतन मनन केले पाहिजे..स्वामीं सेवा..खूप सोपी आहे तशीच खूप अवघड...

अतुलना प्रार्थना

हे समर्था..आज पर्यंत मला वाटायचं की...माझेच विचार, मत, तत्व बरोबर आहे..इतरांचे नाही..पण आज तू समज दिलीस की...प्रत्येक गोष्ट ही अनुभव घेण्यापूर्वी छान वाटते..म्हणजेच ती सुद्धा अतुलनीय आहे..ही समज कायम राहू दे..ही समज दिल्याबद्दल धन्यवाद..ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल...

मधाची मधुरता मधमाश्यांनशिवाय नाही.. श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6 श्री महाराज बंकटलाल यांच्या घरी रहात होते... गावाच्या दक्षिणेस बंकटलाल यांची शेती होती.. श्री महाराज बंकटलाल यांच्या शेतात कणसे खाण्यासाठी गेले.. त्यांच्या बरोबर अजूनही अनेक सेवेकरी होते.. शेतात एक...

श्री रामचरित मानस 4

विक्रम संवत १६३१ मध्ये श्री रामचरित्र मानस कथेला प्रारंभ झाल.. चैत्र मासातील नवमी या तिथीस वार मंगळवार या दिवशी अयोध्येत हे चरित्र प्रकशित झाले... हाच प्रभू श्री रामांचा जन्मदिवस... शरयू नदी आणि अयोध्या नगरी..श्री तुलसीदास महाराज श्री राम कथेस आरंभ करत आहेत... श्री...

आत्महत्या -पाप आहे कि पुण्य आहे

https://youtu.be/QpXKoAqCoUU   आत्महत्या - आपण अनेकदा ऐकतो किंवा वाचतो कि अमुक अमुक व्यक्तींनी आत्महत्या केली.. आपण ऐकतो हळहळ व्यक्त करतो.. जवळची व्यक्ती असेल तर कदाचित आपल्या डोळ्यातही अश्रू येतात..काही दिवसा नंतर आपण सर्व जण विसरून जातो.. आपण अनेकदा हेही ऐकले...

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा - श्री महादेवांनी हि कथा रचली व सर्वप्रथम ती माता पार्वती यांना सांगितली... श्री शंकरांनी हि कथा काकभुशुंडी ऋषींना दिली कारण ते राम भक्त होते... काकभुशुंडी ऋषींनी याज्ञवल्क्य ऋषींना ऐकवली याज्ञवल्क्य ऋषींनी श्री भारद्वाज...

श्री रामचरित मानस 2 – महिमा राम नामाचा

महिमा राम नामाचा - श्री रामचरित मानस मध्ये संत श्रेष्ठ तुलसी दासजी महाराज राम नामाचा महिमा वर्णन करत आहेत... सर्वप्रथम राम नामाला वंदन असो... खरंतर राम नामाचा महिमा शब्दात व्यक्त करणे कठीण आहे... हा महामंत्र आहे.. इथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते कि ती हि कि...