श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ – गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा

Sep 12, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ – गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा… ! 

आपण लीला क्रमांक ७ मध्ये पाहिले कि श्री गजानन महाराज श्री बंकटलाल यांच्या घरीच राहिले.. दुसऱ्या दिवशी श्री गजानन महाराजांची विविध प्रकारचे सुंगधी द्रव्याने स्नान घातले.. षोडश उपचारे पूजा केली.. नैवद्य अर्पण केला.. इतके भक्तिमय वातावरण होते कि सर्व सेवेकरी सेवेत तल्लीन झाले होते.. श्री बंकटलाल तर भक्तीत इतके तल्लीन झाले होते.. त्यांचे घर द्वारकापुरी सारखे झाले होते… तो दिवस सोमवारचा होता.. त्यावेळेस तिथे श्री बंकटलाल यांचे चुलत भाऊ इच्छाराम सुद्धा तिथेच होते… ते शिव भक्त होते.. त्या दिवशी त्यांचा उपवास होता.. त्यांनी श्री महाराजांना प्रार्थना केली.. महाराज आपण करुणाघन आहात.. आपण सर्वांच्या इच्छेची पूर्ती करता.. माझी आपणस विनंती आहे कि.. आपण संध्याकाळचे भोजन देखील आमच्याकडे करावे.. आपण जर जेवण केले नाही तर मी देखील भोजन करणार नाही.. आपण सर्वांची इच्छा पूर्ण करता.. माझी इतकी इच्छा पूर्ण करा.. महाराज भोजन करण्यास तयार झाले.. इच्छाराम भोजनाचे ताट घेऊन आले.. ताटात आंबेमोहर तांदळाचा भात , मोतीचूर चे लाडू , जिलेबी, अजूनही बरेच पदार्थ होते.. श्री महाराज स्वतःशीच बोलले.. “आता इतके खा कि कधीच खाण्यास मिळाले नाही.. सगळ्यांना दाखव अति खाणे काय असते.. असे म्हणून महाराज भोजन करण्यास सुरवात करतात.. त्यांनी ताटातील सर्व अन्न ग्रहण केले.. त्यांनी इतके जेवण केले कि त्यांना तिथेच जोराची उलटी झाली.. हि त्यांची लीला होती.. बोला श्री गजानन महाराज कि जय !

बोध – वरील लीलेत खूपच खोल असा संदेश दडला आहे.. वरील लीलेत इच्छा रामजी यांनी आपली इच्छा महाराजांना सांगितली व इच्छा युक्त भक्ती साठी श्री महाराजांना भोजनाचा आग्रह केला.. त्यांना माहित होते श्री महाराजांचे भोजन झाले आहे तरी आपल्या व्रताच्या पूर्ती साठी महाराजांना भोजनाचा आग्रह धरला.. श्री महारांजानी सुद्धा आपणस बोध प्राप्त व्हावा यासाठी भोजन करण्यास तयार झाले.. त्यांनी केवळ भोजनच केले नाही तर आणलेले सर्व भोजन त्यांनी ग्रहण केले आणि लगेचच उलटी केली.. इथे ते सर्व अन्न पचवू शकत होते पण जाणून बुजून त्यांनी उलटी केली कारण त्यांना सर्वांना दाखवून द्याचे होते कि कुणालाही कोणत्याच गोष्टीचा आग्रह करू नका.. ज्याला जितकी भूख आहे तो तितके अन्न ग्रहण करेल.. त्याला आग्रह करून खाऊ घालूं नका.. इथे इच्छा रामजी सारखे आपले सुद्धा होते.. कुठेही कोणती चांगली खाण्याची वस्तू दिसली कि ती खाण्याचा मोह आपण रोखू शकत नाही मग तेव्हा आपणस भूख असो व नसो आपण अतिरिक्त अन्न ग्रहण करतो.. अश्या प्रकारे आपण आपली शरीरावर अन्याय करतो… असे आपण करू नये हा बोध देण्यासाठी श्री गजानन महाराजांनी हि लीला केली असावी असा बोध मिळतो.. बोला गजानन महाराज कि जय .. !

प्रार्थना – श्री गजानन महाराज आपण तर करुणाघन आहात.. आजच्या लीलेच्या माध्यमातून आपण आम्हाला समज दिलीत कि शरीराला आवश्यक असेल तितकेच अन्न आपण ग्रहण करणे आवश्यक आहे.. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो.. आम्हाला आमच्या आहारावर नियंत्रण ठेवण्याची समज द्या.. आमच्यातील इच्छा राम वर नियंत्रित करा.. अती सर्व वर्ज्य करण्याची समज आमच्यात दृढ करा.. हि समज दिल्याबद्दल धन्यवाद.. हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...