पितृपक्ष – पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा

Sep 9, 2022 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

पितृपक्ष – पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा, आपल्याकडे दरवर्षी भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपदी अमावास्या हा साधारण १५ ते १६ दिवसाची कालावधी ला आपण पितृपक्ष म्हणतो. पितृपक्ष म्हंटलं कि आपल्या कडे आपण म्हणतो कि कोणतेच धार्मिक  कार्य या महिन्यात करायची नाही हे आपण आज पर्यंत ऐकत आलो आहोत पण नेमके काय आहे ? कश्या साठी असतो? नेमके काय करणे अपेक्षित असावे आपली पूर्वजांना या कालावधीत यावर आज आपण चिंतन मनन करणार आहोत. जसे इंग्रजीत १२ महिने आहेत तसेच आपल्या संस्कृतीत १२ महिने आहेत. आपल्यकडे प्रत्येक महिण्याची काही तरी विशेष असा सण असतो जो आपणस काही तरी प्रेरणा देत असतो तसाच हा भाद्रपद महिना याच्या सुरवातीला आपण १० दिवस गणपती बाप्पा ची सेवा करतो आणि लगेचच दुसऱ्या दिवशी पितृपक्ष सुरु होतो जो कालावधी आपण आपल्या पूर्वजांच्या सेवे साठी शास्त्राने ठरवून दिला आहे. खरंतर प्रत्येक दिवसच तसा आपल्या वडीलधाऱ्या माणसांच्या सेवेसाठी असतो. ज्यावेळी एखादी व्यक्ती मृत पावते तेव्हा प्रथम वर्षी आपण वर्ष श्राद्ध करतो पण त्यानंतर आपण दरवर्षी पूर्वजांच्या सेवेसाठी देणे काळा नुसार शक्य होणार नाही हे आपली पूर्वजांनी जाणले असावे म्हणूनच त्यांनी पितृपक्ष या साठी वर्षातील १५ दिवसांचा कालावधी दिला असावा. आता नेमकी आपल्या पूर्वजांची सेवा कधी करावी हा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो. समजा एखादी व्यक्ती प्रतिपदा ला मृत झाली असेल तर तिचे पक्ष भाद्रपद प्रतिपदेला करावे.. एकादशी ला एखादी व्यक्ती मृत झाली असेल तर तिचे पक्ष भाद्रपद एकादशीला करावे थोडक्यात ज्या तिथीला व्यक्ती मृत पावते त्या नंतर वर्ष श्राद्ध झाल्या नंतर दरवर्षी भाद्रपद महिन्यांत त्या तिथीला आपल्या पूर्वजांचे पक्ष करावेत. एखादी स्त्री सवाष्ण मृत असेल तर तिचे पक्ष नवमी तिथीला करण्यात येतात. पती मृत झाल्या नंतर दोघांचे पक्ष एकाच तिथीस करण्यात येतात . ज्यांना आपल्या पूर्वजांची तिथी माहित नसेल अश्यानी अमावस्या तिथीला पक्ष करावेत. थोडक्यात हि झाली तिथी विषयी माहिती आता अनेकांच्या मनात प्रश्न असतो कि या साठी स्वयंपाक काय असावा खरंतर स्वयंपाक याला साधाच असतो. पोळी भाजी , वरण भात , कढी , खीर ,भाजणीच्या डाळीचे वडे . साधारण असा नैवद्य आपण करतो. आता हि झाली माहिती शास्त्रानुसार आता आपण यावर थोडे चिंतन मनन करूया.. खरंच हा महिना सेवा केली तरच पूर्वज तृप्त होतील का ? आपण ज्याची मृत झाल्या नंतर सेवा म्हणून पक्ष करत आहोत त्यांची जिवंतपणी तितक्याच आत्मीयतेने सेवा केली आहे का ? त्यांना काय हवं काय नको आहे हे आपण पाहिले आहे का ? त्यांच्याशी जीवंतपणी आत्मीयतेने बोललो आहोत का ? यांची उत्तरे हा असावीत जर याचे उत्तर नाही असे येत असेल तर नक्कीच आपण आधी त्यांची माफी मागितली पाहिजे कारण जो पर्यंत आपण केलेली चूकच जर आपणस समजत नसेल तर आपण पितरांची किती हि सेवा केली तरी आपणस अपेक्षित फल कसे प्राप्त होईल. हे झाले मृत व्यक्तींबद्दल खरंतर आपण सर्वांशीच आदराने वागले पाहिजे कारण मुख्य दोष निर्मिती होत असेल तर जिवंत व्यक्तींना जो त्रास देतो त्यातुन म्हणून जर आपण सर्वांशीच वागताना दोष रहित वागण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपले रोजचे जीवनच सेवा मय बनेल आणि मग जेव्हा आपण मृत व्यक्तींची सेवा करू ती तर विशेष असे फल दिल्याशिवाय राहणार नाही यात काहीच शंका नाही.

चला तर मग आजपासूनच या सेवेस सुरवात करूयात आणि आपले जीवन सुंदर असे बनवूयात. चला आज आपण आपल्या पूर्वजांना प्रार्थना करूयात..

हे माझ्या पूर्वजांनो… मला माफ करा.. जाणते अजाणतेपणी.. आपण जिवीत असताना आपले मन माझ्याकडून दुखावले गेले त्याबद्दल मला माफ करा.. तुमच्या अनेक इच्छा अपेक्षा आम्ही पूर्ण करू शकलो नाही त्याबद्दल आम्हाला माफ करा… ज्या चुका आमच्याकडून झाल्या त्या परत होऊ नयेत या साठी आम्हाला आशीर्वाद द्या… आता तरी आम्हाला समज प्राप्त होऊ द्या.. आमचे प्रत्येक कर्म हे मनुष्य सेवा बनू द्या जेणेकरून एखादी व्यक्ती मृत झाल्यावर रडू नाही आले तरी तिच्या सेवेचा आनंद आम्हाला प्राप्त होईल.. आणि जिवंतपणीच आमच्याकडून सेवा होईल .. आम्हाला आज हि समज दिलीस त्याबद्दल धन्यवाद… आमच्याकडून हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद … !

www.chetnakeswar.com


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...