प्रार्थना – प्रार्थना म्हणजे काय ?

Aug 25, 2022 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

प्रार्थना – प्रार्थना म्हणजे काय ? खरंतर आपण लहान पणा पासून प्रार्थना करत आलो आहोत..  तरी देखील आज यावर चिंतन मनन करणे आवश्यक आहे.. कारण अनेकदा आपण प्रार्थना करतो तरी देखील आपण पहातो कि काही प्रार्थना पुर्ण होतात काही होत नाही असे का ? खरंतर आपण प्रार्थना काय करतो यावर सर्व अवलंबुन आहे.. सर्वप्रथम प्रार्थना म्हणजे काय हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया.. प्रार्थना म्हणजे सृष्टीतील प्रत्येकांच्या हितावह सृष्टीला घातलेले शाब्दिक… मानसिक… वैचारिक.. हृदयातून घातलेली साद म्हणजे प्रार्थना.. पहा खूप खोल असा अर्थ आहे..आपण म्हणाल असे कसे पहा आपण लहानपणी प्रार्थना करण्यास शिकलो.. दिवे लावताना आपणस प्रार्थना शिकवली ती आठवूया.. शुभं करोति कल्याणम आरोग्यं धनसंपदा ।
शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोsस्तुते । दिव्या दिव्या दिपत्कार कानी कुंडले मोतीहार । दिव्याला पाहून नमस्कार ॥१॥ दिवा लावला देवांपाशी, उजेड पडला तुळशीपाशी । माझा नमस्कार सर्व देवांपाशी ॥२॥ ये गे लक्ष्मी बैस गे बाजे, आमुचे घर तुला सारे । तिळाचे तेल कापसाची वात, दिवा जळो मध्यान्हात । घरातली इडापिडा बाहेर जावो बाहेरची लक्ष्मी घरात येवो । घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो ॥३॥ दीपज्योति: परब्रह्म दीपज्योति: जनार्दन । दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोsस्तुते ॥४॥ अधिराजा महाराजा वनराजा वनस्पति । इष्टदर्शनं इष्टान्नं शत्रूणांच पराभवम्‌ । मुले तो ब्रह्मरुपाय मध्ये तो विष्णुरुपिण: । अग्रत: शिवरुपाय अश्वत्थाय नमो नम: ॥५॥ हि प्रार्थना आपण लहानपणापासून म्हणत आलो आहोत.. यावर जर चिंतन मनन आपण केले तर आपणस जाणवेल कि प्रार्थना हि सृष्टीतील सृष्टीला प्रत्येकासाठी असते.. व्यक्तिगत नसते.. कसे पाहूया.. सर्वांचे कल्याण कर.. आरोग्य मिळू दे.. कुणाविषयी मनात वाईट विचार येऊ नयेत…आपण नमस्कार कुणाला करतो जो अंधार दूर करतो अश्या दिव्याला.. आपण दिवा तुळशीपाशी लावला आहे पण उजेड संपूर्ण घरात पसरला आहे.. म्हणजेच आपण प्रार्थना करत आहोत याचा परिणाम सर्व सृष्टीवर होत आहे..आपण यात घरातील वडील धाऱ्या माणसांना उदंड आयुष्य लाभो या साठी प्रार्थना करतो म्हणजे यात व्यक्तिगत स्वार्थ आहे का नाही… कारण घरचा धनी म्हणजे फक्त आपल्या घरातील व्यक्ती असा मर्यादित अर्थ नसून सर्वसामावेशक असा अर्थ आहे .. पहा तो कसा आपले कुटूंब प्रार्थना करते तेव्हा आपण अर्थ घेतो घरातील कर्ता म्हणजे जी कमावती व्यक्ती आहे तिच्या साठी.. जेव्हा कमवणारी व्यक्ती प्रार्थना करते तेव्हा अर्थ होतो तो समजा नोकरी करत असेल तर त्याचा धनी म्हणजे कंपनीचा मालक.. मालक प्रार्थना करत असेल तर त्याचा धनी आहेत त्याचे ग्राहक.. म्हणजेच हि एक साखळी आहे.. आपण प्रार्थना करताना जितकी ती सर्व समावेशक करू तितका अधिक चांगला व लवकर परिणाम आपणस प्राप्त होतो.. म्हणून नेहमी प्रार्थना करताना सर्वांसाठी करूया.. म्हणजेच संपूर्ण सृष्टीसाठी प्रार्थना करूया.. नक्कीच आपणस प्रार्थनेचा अर्थ समजला असेलच त्यावर कार्य करून आजपासून सर्वहितकारी प्रार्थना करूयात … !

चला आपण प्रार्थनेसाठी समर्थाला प्रार्थना करूया.. हे समर्था आज तू आम्हाला प्रार्थना म्हणजे काय हि समज दिलीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.. नेहमी आमच्याकडून संपूर्ण सृष्टीसाठी हितकारीच प्रार्थना करून घे… प्रत्येक प्रार्थनेत व्यक्तिगत हिताचा नाहीतर.. संपूर्ण सृष्टीच्या हिताच्या प्रार्थना ह्रद्यातून प्रगट कर.. कारण तीच प्रार्थना तू पूर्ण करतो जी संपूर्ण सृष्टीच्या कल्याणाची असते ..हि समज दिल्याबद्दल धन्यवाद… हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद


Share
और पढिये !!

स्वामींची भक्ती

स्वामी भक्तहो.. स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत भक्ती हवी.. आपण सर्व स्वामींची भक्ती करतो पण कधी कधी आपले मन स्वामी भक्ती मध्ये व्यवहारिक पणा आणते.. इथे एक गोष्ट स्प्ष्ट करावीशी वाटते ती म्हणजे प्रार्थना आणि व्यवहारिक पणा यातील भेद आपणस समजला पाहिजे..नक्कीच तो यातून...

अहंकार

हे समर्था... माझ्यातील अहंकार ही सर्वात मोठी बाधा आहे... माझ्यातील अहं म्हणतो..मी केले म्हणून हे होत आहे.. पण तुझ्या इच्छे शिवाय मी श्वास ही घेऊ शकत नाही पण माझ्यातील अहं हे विसरते..आणि खोट्या अहं पोटी माझे नुकसान होते.. माझ्यातील अहंकार नष्ट कर..कारण तो जो पर्यंत...

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..!

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..! श्रावण मासी हर्ष मानसी...आपल्या मनात भक्ती भाव वाढवण्याचा मास...आपण।अनेक संकल्प करतो..अनेक मंदिरात जातो..विशेषतः श्री शिव मंदिरात आपण जातो..आपण अनेक गोष्टी भगवान श्री शिव यांना अर्पण करतो..मग आपण अनेक गोष्टी पिंडीवर वाहतो..मग...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री खंडू पाटील रोज श्री महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जात असत.. श्री खंडू पाटील महाराजांना सवयी प्रमाणे गण्या असे म्हणत असत.. एकेदिवशी कुकाजी खंडू पाटलाला म्हणतात अरे तू रोज श्री महाराजांच्या...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री गजानन महाराज श्री हरी पाटलांच्या भावाला म्हणत आहेत बाळांनो तुमच्या हाताला खूप त्रास झाला असेल तो त्रास दूर करण्यासाठी तुम्हाला उसाचा रस काढून देतो हरी पाटील श्री महाराजांचे सेवक ( भक्त झाले )...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- जर असशील पैलवान तर मला उठव ( उचल ) शेंगांव मध्ये पाटील घराण्याचे खूप मोठे प्रस्त होते.. पाटलांना दोन मुले होते.. कडताजी आणि कुकाजी.. कडताजी यांना ६ मुले होती तर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- मी आता मंदिरात राहणार आहे जेव्हा तू बोलवशील तेव्हा नक्की येईल.. ! शेगांव चे पूर्वी नाव होते शिवगाव.. नंतर काळानुरूप त्याचे नाव शेगांव झाले.. महाराज शेगांव मध्ये...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे वज्रभूषणा तुझा सदैव जयजकार होईल.. कर्म मार्ग सोडू नकोस मात्र त्यात अडकू नकोस! शिवर गावात वज्रभूषण नावाचा पंडित राहत होता.. त्याला चारही वेदांचे ज्ञान होते.. तो...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २१ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे नरसिंगा तू उत्तम केलेस प्रपंचात राहिलास.. ! शेगावच्या जवळ असणाऱ्या अकोट गावी श्री गजानन महाराज श्री नरसिंग यांची भेट घेण्यासाठी जातात.. श्री नरसिंग यांना श्री महाराज बंधू मानत असा उल्लेख चरित्रात येतो.. असो नक्कीच श्री नरसिंग हे...

हे स्वामीं चे घर आहे…आम्ही स्वामीं च्या घरात राहतो

स्वामीं भक्तहो... अनेकदा आपण ऐकतो की वास्तू दोष आहे.. मग तो दोष घालवण्यासाठी आपण अनेक उपाय योजना करतो..आणि त्या केल्याचं पाहिजेत...पण मग याचाच एक भाग म्हणून आपण जर विचार केला की हा दोष आपण कसा दूर करू शकतो.. दोष कोणताही असो तो दूर होऊ शकतो पण जर आपले विचार बदलत नसतील...