नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

May 14, 2022 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया

हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर सुद्धा मृत्यू येऊ नये ,  असा वर त्याने प्राप्त करून घेतला. हा वर प्राप्त झाल्यामुळे तो स्वतःला अजरामर समजू लागला त्याला वाटू लागले कि मीच देव आहे मीच सर्व शक्तिमान आहे  हिरण्यकश्यपू राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता मुलगा नेहमी  नामस्मरणात तल्लीन असत.  हे पाहून हिरण्यकश्यपू राजा ला फार राग येई त्याने आपल्या मुलाला खूप समजून सांगितले कि तू माझा जप कर मीच देव आहे.  पण प्रल्हाद मात्र भगवान विष्णूच्या नाम सेवेत तल्लीन असे हे सर्व पाहून हिरण्यकश्यपू  ला फार चीड येऊ लागली आणि त्याने  त्याला समजून सांगण्यासाठी त्याला शिक्षा केली पण तरी देखील प्रल्हाद विष्णूची नाम रुपी सेवा करणे सोडत नाही .मग मात्र हिरण्यकश्यपू  चा राग वाढला आणि त्याने शिपायांना प्रल्हादाला डोंगरावरून खाली ढकलून देण्यास सांगितले तरी देखील प्रल्हादाला काहीच इजा पोहचली नाही हे पाहून हिरण्यकश्यपूला खूपच राग आला आणि त्याने शिपायांना उकळत्या तेलात टाकण्याची आज्ञा दिली शिपायांनी प्रल्हादाला तेलात टाकले तर शिपायांना भाजले पण प्रल्हादाला काहीच झाले नाही. उलट प्रल्हाद नाम रुपी सेवेत तल्लीन होता .हे सर्व पाहून हिरण्यकश्यपू ने प्रल्हादला विचारला कि कुठे आहे तुझा ” नारायण नारायण ” दाखव मला कुठे आहे .तुझा भगवान विष्णू  बोलव त्याला तेव्हा प्रल्हाद म्हणाला माझा देव सर्वत्र आहे. तुम्ही जिथे पाहाल तिथे माझा देव आहे .आपण फक्त हाक मारा मग रागाच्या भरात  हिरण्यकश्यपूने विचारले कि या खांबात तुझा देव आहे का ? तेव्हा प्रल्हाद म्हणाला हो या खांबात माझा देव आहे. तेव्हा हिरण्यकश्यपू ने रागाच्या भरात लाकडी खांबाला लाथ मारली तेव्हा त्या खांबातून भगवान विष्णूंचा नृसिंह रूपात खांबातून बाहेर आले.  नृसिंह रूप पाहून हिरण्यकश्यपू खूप घाबरला .भगवान विष्णूं नृसिंह यांनी  हिरण्यकश्यपू ला मांडीवर घेतले व दाराच्या उंबऱ्यावर बसले ती वेळ होती सायंकाळची म्हणजे दिवस हि नव्हता रात्र हि नव्हती उंबरा म्हणजे घर हि नाही व घराच्या बाहेर हि नाही न कोणते शस्त्र न काही अस्त्र भगवान नृसिंह यांनी घराच्या उंबऱ्यावर नखांनी हिरण्यकश्यपूचे पोट फाडून मुक्त केल अश्या प्रकारे भगवान विष्णूचा  नृसिंह अवतार झाला सर्वांनी एक घोषात ” नारायण नारायण ” ओम नमो भगवते वासुदेवाय ” नामाचा जय घोष केला

 

बोध – नृसिंह अवतार हा आपल्या सर्वांना प्रेरणा देणारा अवतार आहे. खरे तर हा अवतार म्हणजे आपणस आपला बोध करण्यास प्रेरणा देणार अवतार .चला आपण यावर चिंतन मनंन करूया, हिरण्यकश्यपू राजा होता .तो देखील देवाची सेवा करत होता व त्याने सेवा करून वर प्राप्त केला कि मला कधीच मरण येऊ नये खरे तर इथे आपणस आपल्यातील हिरण्यकश्यपू शोधायचा आहे कारण अनेकदा आपणस देखील विस्मरण होते कि आपण या पृथ्वी वर पाहुणे आहोत आपण अशा अविर्भावात जगतो कि मी अमर आहे. आजच्या लीलेतून आपणस बोध घ्यायचा आहे , कि मी देखील पाहुणा आहे .जे काही आयुष्य मला प्राप्त झाले आहे त्याचा मी सदुपयोग करेल जेणेकरून माझ्यातील हिरण्यकश्यपू मरून जाईल .भक्त प्रल्हाद हा विष्णू भक्त होता इथे आपणस भक्त प्रल्हाद यांच्या कडून नाम रुपी सेवेचे महत्व समजत आहे .समस्या कोणतीही असो आपणस नाम रुपी सेवा सुरु ठेवायची आहे. जसे भक्त प्रल्हाद यांना नृसिह यांनी तारले तसेच आपणास देखील आपली जी कोणती इष्ट देवता आहे ती तारणार आहे .आवश्यकता आहे केवळ अखंड नाम सेवेची इथे आपणस वाटते कि   हिरण्यकश्यपू हे वाईट होते खरे तर ते सुद्धा देव भक्त होते पण त्यांच्यात अहंकार निर्माण झाला होता व तो दूर करण्यासाठी  नृसिंह  अवतार झाला म्हणजेच आपल्यातील हिरण्यकश्यपू चा नाश व्हावा यासाठी अवतार झाला आहे .आपणस त्यावर काम करायचे आहे आणि खरी नृसिंह  जयंती साजरी करायची आहे व आपल्या जन्माचे सार्थक करायचे आहे.

चला आपण सर्व जण भगवान नृसिंह यांना प्रार्थना करूया – हे नृसिंहा तुझा नृसिंह अवतार म्हणजे आम्हाला आमच्या तील विकारांवर काम करण्यास प्रेरणा देणारा अवतार.. आमच्यातील हिरण्यकश्यपू चा नाश कर.. कारण खरा हिरण्यकश्यपू आमच्यात आहे… पण आम्ही तो फक्त तुझ्या गोष्टीत शोधतो.. खरेतर आमच्यातील हिरण्यकश्यपू नाश होणे गरजेचे आहे… आणि तो तुझ्या कृपेशिवाय शक्य नाही… आम्हाला भक्त प्रल्हादा सारखी भक्ती दे… आमच्या कडून तुझी नाम रुपी सेवा करून घे… आम्हाला तुझ्या नामात स्थिर कर… आणि आमचे आयुष्य रोजच नृसिंह जयंती मय बनव… हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद…  सर्वांना नृसिंह जयंती च्या खूप खूप शुभेच्छा

 


Share
और पढिये !!

क्षमा म्हणजे काय ?

💐 *स्वामी वाणी पुष्प ५७४(पर्व ४ थे भाग ७८)* *आजचे चिंतन-मनन* जया अंगी क्षमा भाव करुणेचा ! ऐसा भक्त सदैव प्रिय स्वामींचा !! म्हणोनि चुकलेल्या माफ करावे ! चूक झाली तर नम्र भावें माफी मागावे !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. क्षमा म्हणजे काय? इंग्रजीत आपण सॉरी...

अतूट श्रद्धा म्हणजे काय?

स्वामी वाणी पुष्प ५७३(पर्व ४ थे भाग ७७)* *आजचे चिंतन-मनन* श्रध्दा अतूट-अभेद्य करा ! स्वामी चरणी भाव धरा ! जन्म सार्थक निश्चित !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. जशी आपली श्रद्धा असेल तसे फल आपणस प्राप्त होत असते..आपण म्हणतो आमची स्वामी वर किंवा या या देवावर...

स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ?

प्रश्न- स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ? चिंतन- स्वामीं भक्तहो..आजचा प्रश्न हा इतका खोल आहे की ज्यावर प्रत्येकाने चिंतन मनन केले पाहिजे..स्वामीं सेवा..खूप सोपी आहे तशीच खूप अवघड...

अतुलना प्रार्थना

हे समर्था..आज पर्यंत मला वाटायचं की...माझेच विचार, मत, तत्व बरोबर आहे..इतरांचे नाही..पण आज तू समज दिलीस की...प्रत्येक गोष्ट ही अनुभव घेण्यापूर्वी छान वाटते..म्हणजेच ती सुद्धा अतुलनीय आहे..ही समज कायम राहू दे..ही समज दिल्याबद्दल धन्यवाद..ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल...

मधाची मधुरता मधमाश्यांनशिवाय नाही.. श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6 श्री महाराज बंकटलाल यांच्या घरी रहात होते... गावाच्या दक्षिणेस बंकटलाल यांची शेती होती.. श्री महाराज बंकटलाल यांच्या शेतात कणसे खाण्यासाठी गेले.. त्यांच्या बरोबर अजूनही अनेक सेवेकरी होते.. शेतात एक...

श्री रामचरित मानस 4

विक्रम संवत १६३१ मध्ये श्री रामचरित्र मानस कथेला प्रारंभ झाल.. चैत्र मासातील नवमी या तिथीस वार मंगळवार या दिवशी अयोध्येत हे चरित्र प्रकशित झाले... हाच प्रभू श्री रामांचा जन्मदिवस... शरयू नदी आणि अयोध्या नगरी..श्री तुलसीदास महाराज श्री राम कथेस आरंभ करत आहेत... श्री...

आत्महत्या -पाप आहे कि पुण्य आहे

https://youtu.be/QpXKoAqCoUU   आत्महत्या - आपण अनेकदा ऐकतो किंवा वाचतो कि अमुक अमुक व्यक्तींनी आत्महत्या केली.. आपण ऐकतो हळहळ व्यक्त करतो.. जवळची व्यक्ती असेल तर कदाचित आपल्या डोळ्यातही अश्रू येतात..काही दिवसा नंतर आपण सर्व जण विसरून जातो.. आपण अनेकदा हेही ऐकले...

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा - श्री महादेवांनी हि कथा रचली व सर्वप्रथम ती माता पार्वती यांना सांगितली... श्री शंकरांनी हि कथा काकभुशुंडी ऋषींना दिली कारण ते राम भक्त होते... काकभुशुंडी ऋषींनी याज्ञवल्क्य ऋषींना ऐकवली याज्ञवल्क्य ऋषींनी श्री भारद्वाज...

श्री रामचरित मानस 2 – महिमा राम नामाचा

महिमा राम नामाचा - श्री रामचरित मानस मध्ये संत श्रेष्ठ तुलसी दासजी महाराज राम नामाचा महिमा वर्णन करत आहेत... सर्वप्रथम राम नामाला वंदन असो... खरंतर राम नामाचा महिमा शब्दात व्यक्त करणे कठीण आहे... हा महामंत्र आहे.. इथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते कि ती हि कि...