श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

May 8, 2022 | चरित्र, मराठी, संत गजानन महाराज

Share

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले… परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना म्हणजे उन्हाळ्याचे दिवस होते. उन्हाचे प्रमाण इतके होते कि सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष होते. वाटेत अकोली नावाचे गाव होते. तिथे महाराज आले. महाराजांना खूप तहान लागली होती. महाराज ज्या रस्त्याने जात होते तिथे भास्कर नावाच्या शेतकरी आपल्या शेतात काम करीत होता. भास्कर ने स्वतःला पाणी पिण्यासाठी एक घागर पाणी आणले होते. श्री गजानन महाराज भास्कर च्या जवळ आले व पिण्यासाठी पाणी मागितले. पाणी पाजण्याचें खूप मोठे पुण्य आहे. पाण्याशिवाय प्राणाचे रक्षण होणे अशक्य आहे. मोठमोठे धनिक लोक पाणपोई द्वारे लोकांची तृष्णा भागवतात व पुण्य कमवतात. महाराजांच्या हि वाणी ऐकून भास्कर श्री महाराजाना म्हणाले आपण तर दिंगबर आपणस पाणी पाजून काय पुण्य मिळणार ? उलट जर अनाथ , पंगू , दुर्बल यांना पाणी पाजले तर पुण्य मिळेल हे शास्त्र वचन आहे. आपणास पाणी देऊन काय पुण्य मिळणार. मी आपणस पाणी देणार नाही. भास्कर हे बोलणे ऐकून महाराजांनी स्मित हास्य केले व तिथून पुढे निघाले. थोडे पुढे गेल्या नंतर तिथे एक विहीर होती. महाराजांना तिकडे जाताना पाहून भास्कर म्हणाला अहो ती विहीर कोरडी आहे. आणि हसू लागला. महाराज त्याला म्हणाले अरे तू म्हणतोस ते बरोबर आहे पण एक प्रयत्न करतो समाज हितासाठी पाहूया पाणी मिळते का ? महाराज विहिरी जवळ आले. विहीर पूर्णतः कोरडी होती. महाराज तिथेच असणाऱ्या एक वृक्षा काही ध्यान लावून बसले आणि त्यांनी प्रार्थना सुरु केली – हे देवा । हे वामना वासुदेवा । प्रद्युम्न राघवा । हे विठ्ठला नरहरी । हे आकोली पाण्यावाचून त्रस्त झाली । ओलही ना राहिली । कोठेंच देवा विहिरींतून । मानवी यत्न अवघे हरिलें । म्हणून तुजला प्रार्थिले । पाव आतां जगन्माऊली । पाणी दे या विहिरीला । महाराजांच्या प्रार्थनेचे रूपांतर कृपेत झाले. विहिरीला पाण्याचा पाझर फुटला आणि काही क्षणात विहीर पाण्याने तुडुंब भरली. महाराज त्या विहिरीचे पाणी पिले. हे सर्व पाहून भास्कर थक्क झाला आणि त्याला कळून चुकले महाराज नक्कीच कुणीतरी महान योगी आहेत. तो धावतच महाराजांच्या जवळ आला आणि महाराजांना क्षमा प्रार्थना करू लागला. हे नरदेह धारी परमेश्वरा । हे दयेच्या सागरा ।लेकरासी कृपा कर । अर्भक मी तुमचे । मी आपणस ओळखले नाही आणि आपणस अपशब्द बोललो मला माफ करा. महाराज तर कृपेचे सागर आहेत ते कधी आपल्या बालकांवर रागावतील का. उलट महाराज त्याला म्हणाले अरे तुला त्रास होत होता म्हणूनच विहिरी ला आणि आणले आहे. विहिरीला पाणी लागल्याची वार्ता संपूर्ण गावात पसरली अनेक गावकरी मंडळी तिथे आली. सर्वांनी एका स्वरात महाराजांचा जयजयकार केला बोला श्री गजानन महाराज कि जय!

बोध – खरंतर आजच्या लीलाच पूर्णतः बोध आहे. त्यावर वेगळा बोध लिहिणे आवश्यक नाही असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. तरी देखील महाराजांना प्रार्थना करून आपण इथे बोध मांडण्याचा प्रयन्त करूया. आजची संपूर्ण लीला आपणस प्रार्थनेचे महत्व समजून सांगत आहे. जिथे कुठे आपला भक्त अडचणीत असेल तिथे परब्रह्म आपली मदत करण्यासाठी येत असते. या लीलेत श्री भास्कर हे देखील कोणत्या तरी देवाची भक्ती , सेवा करत असतील. त्यामुळेच परब्रम्ह श्री गजानन महाराज लीलेचे निमित्त करून त्यांच्या साठी धावून आले. कारण महाराजच श्री राम , श्री कृष्ण , विठ्ठल आहेत. आपण ज्या कोणत्या देवाची भक्ती करतो त्यांची नावे विविध आहेत पण परब्रम्ह मात्र एकच आहे. महाराजांनी भास्कर यांना पाणी मागितले पण भास्कर ने आपल्या अर्धवट माहितीच्या आधारे महाराजांनाच आपले विचार सांगितले. महाराज त्यांना काहीच बोलले नाहीत कारण महाराजांची प्रत्येक लीला म्हणजे कृतीतून अनुभूती. इथे महाराजां नी स्वतः प्रार्थना केली. इथे महाराज आपणस प्रार्थनेची शक्ती समजवून सांगत आहेत. महाराजांनी प्रार्थना करून विहिरीस पाणी आणले. थोडक्यात महाराज आपणस सकारात्मक प्रार्थना करण्याची शिकवण देत आहेत. महाराज भास्करला म्हणत आहेत कि तुझ्या साठीच पाणी आणले आहे म्हणजेच भास्कर ने सुद्धा देवाला अनेकदा प्रार्थना केली असेल कि भगवंता पाण्याचे दुर्भिक्ष दूर कर आणि त्यांच्या प्रार्थनेचे फलस्वरूप महाराजांनी १४ वर्षांपासून कोरड्या असणाऱ्या विहिरीस पाणी निर्माण केले. इथे महाराज आपणस पाण्याचे महत्व देखील समजून सांगत आहे. पाणी म्हणजे जीवन. आज जे पाणी आहे ते जपून वापरा तसेच पाण्याचे स्तोत्र वाढवण्याची प्रेरणा महाराज आपणस देत आहेत.

चला आपण सर्व मिळून श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया – हे समर्था.. आजची लीला म्हणजे प्रार्थना कशी करावी याची शिकवण आहे आमच्यासाठी.. ज्या प्रमाणे तू श्री भास्करराव यांच्याकडून प्रार्थना करवून घेतलीस व प्रार्थनेस निमित्त करून त्यांच्यावर कृपा केलीस अशीच कृपा आमच्यावर कर.. आमच्याकडून सकारात्मक प्रार्थना करवून घे.. तसेच आमच्याकडून पाण्याचे स्तोत्र वाढावेत ह्या साठी आम्हाला निमित्त कर.. आमच्याकडून हि प्रार्थना करवून घेतलीस त्या बद्दल खूप खूप धन्यवाद !!


Share
और पढिये !!

स्वामींची भक्ती

स्वामी भक्तहो.. स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत भक्ती हवी.. आपण सर्व स्वामींची भक्ती करतो पण कधी कधी आपले मन स्वामी भक्ती मध्ये व्यवहारिक पणा आणते.. इथे एक गोष्ट स्प्ष्ट करावीशी वाटते ती म्हणजे प्रार्थना आणि व्यवहारिक पणा यातील भेद आपणस समजला पाहिजे..नक्कीच तो यातून...

अहंकार

हे समर्था... माझ्यातील अहंकार ही सर्वात मोठी बाधा आहे... माझ्यातील अहं म्हणतो..मी केले म्हणून हे होत आहे.. पण तुझ्या इच्छे शिवाय मी श्वास ही घेऊ शकत नाही पण माझ्यातील अहं हे विसरते..आणि खोट्या अहं पोटी माझे नुकसान होते.. माझ्यातील अहंकार नष्ट कर..कारण तो जो पर्यंत...

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..!

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..! श्रावण मासी हर्ष मानसी...आपल्या मनात भक्ती भाव वाढवण्याचा मास...आपण।अनेक संकल्प करतो..अनेक मंदिरात जातो..विशेषतः श्री शिव मंदिरात आपण जातो..आपण अनेक गोष्टी भगवान श्री शिव यांना अर्पण करतो..मग आपण अनेक गोष्टी पिंडीवर वाहतो..मग...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री खंडू पाटील रोज श्री महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जात असत.. श्री खंडू पाटील महाराजांना सवयी प्रमाणे गण्या असे म्हणत असत.. एकेदिवशी कुकाजी खंडू पाटलाला म्हणतात अरे तू रोज श्री महाराजांच्या...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री गजानन महाराज श्री हरी पाटलांच्या भावाला म्हणत आहेत बाळांनो तुमच्या हाताला खूप त्रास झाला असेल तो त्रास दूर करण्यासाठी तुम्हाला उसाचा रस काढून देतो हरी पाटील श्री महाराजांचे सेवक ( भक्त झाले )...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- जर असशील पैलवान तर मला उठव ( उचल ) शेंगांव मध्ये पाटील घराण्याचे खूप मोठे प्रस्त होते.. पाटलांना दोन मुले होते.. कडताजी आणि कुकाजी.. कडताजी यांना ६ मुले होती तर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- मी आता मंदिरात राहणार आहे जेव्हा तू बोलवशील तेव्हा नक्की येईल.. ! शेगांव चे पूर्वी नाव होते शिवगाव.. नंतर काळानुरूप त्याचे नाव शेगांव झाले.. महाराज शेगांव मध्ये...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे वज्रभूषणा तुझा सदैव जयजकार होईल.. कर्म मार्ग सोडू नकोस मात्र त्यात अडकू नकोस! शिवर गावात वज्रभूषण नावाचा पंडित राहत होता.. त्याला चारही वेदांचे ज्ञान होते.. तो...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २१ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे नरसिंगा तू उत्तम केलेस प्रपंचात राहिलास.. ! शेगावच्या जवळ असणाऱ्या अकोट गावी श्री गजानन महाराज श्री नरसिंग यांची भेट घेण्यासाठी जातात.. श्री नरसिंग यांना श्री महाराज बंधू मानत असा उल्लेख चरित्रात येतो.. असो नक्कीच श्री नरसिंग हे...

हे स्वामीं चे घर आहे…आम्ही स्वामीं च्या घरात राहतो

स्वामीं भक्तहो... अनेकदा आपण ऐकतो की वास्तू दोष आहे.. मग तो दोष घालवण्यासाठी आपण अनेक उपाय योजना करतो..आणि त्या केल्याचं पाहिजेत...पण मग याचाच एक भाग म्हणून आपण जर विचार केला की हा दोष आपण कसा दूर करू शकतो.. दोष कोणताही असो तो दूर होऊ शकतो पण जर आपले विचार बदलत नसतील...