श्री गजानन चरित्र दर्शन 13 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

Feb 13, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

आपण श्री गजानन चरित्र दर्शन १२ मध्ये पहिले कि श्री महाराजांनी वीणा अग्नी चिलीम प्रज्वलित केली…. खरंतर चिलीम पेटवण्यासाठी श्री जानकी राम यांच्या कडे मुले अग्नी आणण्यासाठी गेली होती… परंतु श्री जानकी राम यांनी अग्नी तर दिला नाहीच… पण उलट श्री महाराजां बद्दल अश्रद्धा युक्त शब्द उच्चारले… असो त्याच दिवशी श्री जानकीराम यांच्या कडे श्राद्ध होते …श्राद्ध विधी साठी त्यांनी अनेक लोकांना बोलावले होते… श्राद्ध पूजा साठी त्यांनी सर्व स्वयंपाक केला होता …त्यात मुख्य असते ती खीर आणि वडा हे पदार्थ सुद्धा त्यानी बनवले होते… श्राद्ध पूजा पूर्ण झाली ..आता भोजन करण्याची वेळ आली.. सर्व जण जेवण करण्यासाठी बसले सर्व पदार्थ वाढण्यात आले खीर वाढण्यासाठी श्री जानकीराम यांनी पातेले हातत घेतले तर.. त्यांना खिरीत काही तर वळवळ करताना दिसले …त्यानी व्यवस्थित पाहिले तर त्यांना दिसले कि संपूर्ण खिरीच्या भांडयात त्यांना अळया दिसू लागल्या.. हे सर्व पाहून सर्व लोक जेवण न करताच तसेच निघून गेले..  हे सर्व कसे झाले यावर त्यानी विचार केल्या नंतर त्याना असे वाटले कि आपण श्री महाराजांना अग्नी दिला नाही …तसेच त्यांच्या बद्दल अपशब्द बोललो त्या मुळे हे घडले असावे… हा विचार क्ररुन ते श्री महाराजांकडे गेले तिथे बंकटलाल होते.. त्यांना सर्व वृत्तांत सांगितला आणि त्याना विनंती केली कि मला श्री महाराजकडे घेऊन चला… मला त्याची माफी मागायची आहे… बंकटलाल त्याना श्री महाराजांकडे नेतात श्री महाराजांकडे जाताच जानकीराम क्षमा प्रार्थना करतात …महाराज आपण साक्षात उमानाथ आहात… मला माफ करा… आज माझे सर्व संशय दूर झाले ..माझे अपराध पोटात घ्या… इथून पुढे मी कुणाचीच मजाक करणार नाही… कुणाची टीका करणार नाही.. मला आज जी शिक्षा दिलीस ती पुरी आहे… तू अनाथांचा नाथ आहेस… आता माझा अंत पाहू नकोस… महाराजांनी श्री जानकीराम यांच्याकडे पाहिले आणि बोलले.. अरे आन इकडे ते खिरेचे भाडे अरे यात अळया नाहीत… उलट तुझी खीर खुपच मधुर आहे …महाराजांची हि लीला पाहून सर्वाना महाराजांच्या अंत साक्षीत्वाचा अनुभव आला सर्वानी एक घोषात महाराजांचा जय जय कार केला.

बोध – वरील लीला म्हणजे आपल्या मनाला शिकवण आहे.. श्री जानकी राम यांच्या मनात जश्या शंका येत होत्या… अश्या अनेक शंका आपल्या मनात आपण अडचणीत असताना येत असतात… नक्की महाराज माझे काम करतील का ? अनेकदा आपण इतक्या अडचणीत असतो कि आपण कळत न कळत महाराजांन बद्दल शंका मनात निर्माण होते … खरे तर त्या वेळेस आपल्यातील जानकीराम जागृत असतो.. आणि तो आपणस महाराजांपासून दूर नेत असतो ..आणि आपण कधी दूर जातो हे आपणस हि कळत नाही.. वरील लीलेत खिरीत अळ्या झाल्या असे श्री जानकी राम यांना दिसल्या.. यातून महाराज आपणस सांगत आहेत ..अरे जश्या त्या खिरीत अळ्या झाल्या त्या मुळे ती खीर खाण्यास लायक नाही ..त्याच प्रमाणे आपल्या मनात.. विचारात जी बाधा आहे… ती असेल तर आपण खरी भक्ती करू शकत नाही… त्या साठी आपणस आपल्या मनावर कार्य करणे आवश्यक आहे… जेणेकरून मनातील अळ्या म्हणजे कुविचार जातील… आणि आपण आपले लक्ष प्राप्त करू शकू ..खरे तर महाराजांची प्रत्येक लीला हि आपल्या साठीच आहे.. फक्त गरज आहे त्यावर चिंतन मनंन करण्याची व त्या नुसार काम करण्याची चला तर मग आपण महाराजांना प्रार्थना करूया !!

श्री गजानन महाराज आजच्या लीलेस माध्यम करून… आज आपण आम्हाला आमच्या मनाचे दर्शन घडवलेत.. त्या बद्दल खूप खूप धन्यवाद.. खरे तर आम्ही अनेक काम करतो ..पण कधी स्वतःच्या मनावर कार्य करत नाही.. कारण माझे मन नेहमी सांगते कि मीच बरोबर आहे.. आणि हि जी ..मी ..मी ..ची बाधा आहे.. तीच मला तुझ्या सत्य स्वरूपा पासून दूर नेते.. जसे जानकीराम यांच्यावर कृपा केलीत तशी कृपा आमच्यावर करा… माझे मन मी ..मी च्या ऐवजी …तुझ्या नामाचा धावा करेल ..अशी शिकवण माझ्या मनाला दे.. कारण जेव्हा मन तुझ्या नामात अडकेल.. तेव्हा ते मी ..मी करणार नाही.. आणि त्यामुळे तुला अपेक्षित असणारी अभिव्यक्ती सहजपणे आमच्याकडून होईल ..धन्यवाद आई.. हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद !!!

 


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...