श्री गजानन महाराज दर्शन लीला 6 – मराठी

Jan 16, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

खूप सारे लोक श्री गोविंद बुवांचे किर्तन ऐकण्यासाठी आले होते त्यामध्ये श्री गजानन महाराज पण कडू लिंबाच्या निंबाच्या झाडा जवळ बसून किर्तन ऐकत होते श्री गोविंद बुवांनी किर्तनासाठी श्री  भागवतातील एकादश स्कंध मधील हंस गीता याचा श्लोक किर्तन सेवेसाठी घेतला होता… बुवांनी किर्तनाचा पुर्वार्ध सांगितला किर्तनाचा उत्तरार्ध सांगताना त्यांना अडचण येत होती … श्री गजानन महाराजांनी किर्तनाचा उरलेला भाग सांगितला त्यांचे कीर्तन ऐकून सगळे तृप्त झाले तेव्हा श्री गोविंद बुवा तेथील उपस्थित लोकांना म्हणाले कि श्री महाराजांना येथे येण्याची विनंती करा तेव्हा बंकटलाल आणि बाकीचे लोक श्री महाराजांच्या जवळ जातात व त्याना येण्याची विनंती करतात… परंतु श्री महाराज येत नाहीत… तेव्हा श्री गोविंद बुवा स्वतः श्री महाराजांच्या जवळ जातात आणि त्यांना मंदिरात येण्याची विनंती करतात… आपण स्वतः शिव स्वरूप आहात… कृपया आपण मंदिरात चलावे… तुमच्या शिवाय मंदिर सुने सुने आहे… माझ्या पूर्व जन्माचे काही तरी पुण्य कर्म असावे त्यामुळेच मला तुमचे दर्शन झाले… आणि तुमच्या मुखातून कीर्तनाचा उत्तरार्ध ऐकण्यास मिळाला… तेव्हा श्री महाराज त्यांच्याकडे पाहून बोलतात… लोकांना सांगतात ईश्वर सर्वत्र आहे… आत बाहेर असे काहीच नाही… आणि स्वतः त्या कीर्तन कथेच्या विरुद्ध वर्तन करता… लोकांना एक गोष्ट सांगता व स्वतः त्याच्या नुसार आचरण करत नाही… इतरांसारखे व्यवहारिक कीर्तनकार बनू नका … जा कीर्तन सेवा रुजू करा… मी इथे बसून कीर्तन ऐकतो… श्री गोविंद बुवा व्यास पीठावर आले आणि त्यांनी सर्वांना सांगितले कि आपण सर्व खूप नशीबवान आहोत… आपल्या गावात प्रत्यक्ष परब्रह्म आले आहेत… त्याची सेवा करा… आपल्या सर्वांचे कल्याण होईल… सगळयांनी एका स्वरात श्री गजानन महाराजांचा जय जयकार केला .
बोला – श्री गजानन महाराजांचा जय जयकार असो .

बोध – वरील लीलेतून  बोध समजण्याची समज आमहाला द्या… वरील लीलेत श्री गोविंद बुवांनी कीर्तन सुरु केले ते खूप मोठे कीर्तनकार होते… त्यानी पूर्वार्ध तर सांगितला परुंतु उत्तरार्ध सांगताना त्यांना काय सांगावे हे सुचले नाही त्या वेळी श्री गजानन महाराजांनी कीर्तनाचा उत्तरार्ध पूर्ण केला… असेच आपल्या जीवनात सुद्धा खूप वेळेस होत असते… आपण कोणत्या तरी अडचणीत असतो आणि आपण ईश्वराला प्रार्थना करतो… त्याच वेळी कुणीतरी येऊन आपली मदत करते… त्यांना ईश्वरानेच आपल्या मदती साठी पाठवले असते आणि आपण म्हणतो देवा सारखे धावून आलात आणि माझी मदत केलीत… परंतु काही दिवसांनी ते आपण विसरून जातो… श्री गोविंद बुवा श्री महाराजांना म्हणतात कि आपण शिव स्वरूप आहात.. कृपया मंदिरात चला… तेव्हा श्री महाराज त्यांना बोलतात कि तुम्ही कीर्तनात लोकांना सांगता… कि ईश्वर सर्वत्र आहे आणि आपणच हि गोष्ट विसरलात.. आपण व्यवहारिक बनू नका… इथे श्री महाराज आपल्याला सांगतात कि मी सर्वत्र आहे… कोणत्याही ऐका ठिकाणी गेलात तरच मी भेटले असे नाही.. इथे श्री महाराज हा सुद्धा आपणस बोध देतात कि चांगल्या गोष्टी फक्त लोकांना सांगण्यासाठी नसतात तर प्रथम आपण त्याचे अनुकरण करणे गरजेचे आहे… त्यावर आपण अधिक चिंतन मनन केले तर त्याचा जास्त खोलवर बोध श्री महाराज आपणस देतील… चला आपण श्री महाराजांना प्रार्थना करूयात – श्री गजानन महाराज… तुम्ही आमच्या प्रत्येक प्रार्थनेची पूर्तता करतात… जेव्हा तुम्ही आमच्या इच्छे ची पूर्ती करता त्यावेळी आमची श्रद्धा भाव उच्चतम असतो… परंतु काही दिवसांनी ती परत कमी होते… जसे श्री गोविंद बुवा यांना समज दिलीत… तशीच समज आमहाला द्या… आमच्या मध्ये अध्यात्मिकते मध्ये जो व्यवहारिकपणा आहे ती दूर करा आणि आम्हाला चांगली समज द्या…जेणेकरून आपली प्रामाणिक भक्ती आमहाला समजेल… धन्यवाद महाराज… कोटी कोटी धन्यवाद !!


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...