मी डॉक्टर सिंधुताई सपकाळ बोलतेय – एक प्रेरणा

Jan 12, 2022 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

बाळांनो… मी डॉक्टर सिंधुताई सपकाळ बोलतेय… हो तुमची माई बोलतेय… बेटा दचकू नकोस…मी तर अनंतात विलीन झाले… हि बातमी जेव्हा सोशल मीडिया मार्फत तुझ्या पर्यंत पोहोचली तेव्हा… सोशल मीडिया द्वारे तू जी श्रद्धांजली… भावांजली वाहिलीस त्या बद्दल खूप खूप धन्यवाद… पण खरंच मला एक सांग खरंच तुला असे वाटते कि मला श्रद्धांजली व्हावी… जी कायम सतत येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणा असेल…मी तुला एक काम सांगते… काम अवघड नाही तसेच सोपे हि नाही कारण तुला हि तुझा प्रपंच आहे… तुझा प्रपंच सांभाळता… सांभाळता एक काम करशील…तुला जशी शक्य आहे तशी अनाथ मुलांना… अनाथ वृद्धांना मदत करशील… असे मी म्हणणार नाही कि तू अमुक इतकीच मदत कर…तुला जशी शक्य आहे तशी मदत कर…तू मनात आणशील तर एका अनाथ मुलाचे जीवन तू बदलू शकतोस…तुझ्या आसपास अनेक अशी मुले आहेत… अनेक वृद्ध आहेत ज्यांना कुणीच नाही… त्यांना तुला जशी शकय आहे तशी मदत कर… तुझ्या उत्पन्नाच्या २ ते ५ टक्के मदतीने ते अनाथ बाळ चांगले शिकू शकते बेटा…बेटा या यामध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव मदत कर पण तू ती मदत निस्वार्थ भावनेनें कर…जर तू हे कार्य करू शकलास तर नक्कीच तीच मला खरी श्रद्धांजली असेल


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...