जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच- श्री गजानन चरित्र दर्शन 11 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

Jan 4, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच

श्री विठोबा घाटोळ यांना पूर्व पुण्याई ने श्री गजानन महाराजांच्या सेवेची संधी त्यांना मिळाली होती पण म्हणतात ना पुण्य करण्यासाठी पुण्य गाठी असावे लागते… श्री विठोबा घाटोळ यांना श्री महाराजांच्या सेवेची खूप छान अशी संधी मिळाली होती… श्री विठोबा घाटोळ हे महाराजांची सेवा करत होते परंतु अंतर्मनात वेगेळेच विचार सुरु होते… मनात अहंकार… खोटी भक्ती … लालसा होती … महाराजांची सेवा थोडीच करत परुंतु दिखाऊ पण जास्त करत.. तो सर्वाना सांगत असे कि समर्थांच्या सेवेचे काम माझ्याशिवाय होत नाही… महाराज माझा शब्द कधीच टाळत नाहीत… इतर भक्तांवर तो हुकूम गाजवण्याचे काम करत असे… हे सर्व महाराजांना माहित होते परंतु महाराज त्या कडे दुर्लक्ष करत… एके दिवशी काही बाहेरगावची मंडळी श्री महाराजांच्या दर्शनासाठी आली होती… परंतु त्यावेळी महाराज आराम करत होते… महाराजांना उठवण्याची कुणाची हिम्मत नव्हती.. सर्वांना प्रश्न पडला कि महाराजांना कुणीत उठवावे… त्यावेळी अनेकांनी श्री विठोबा घाटोळ यांचे नाव सुचवले… त्या बाहेरगाव वरून आलेल्या भक्तांनी श्री विठोबा घाटोळ यांना विनंती केली…आणि त्यांची विनंती व स्तुति ऐकून ते भारावून गेले… अहंकार जागृत झाला…आणि ते श्री महाराजांकडे गेले…श्री महाराजांना सर्व हकीकत सांगितली व आपण त्या लोकांना दर्शन द्यावे अशी विंनती केली… महाराजांकडे एक काठी होती ती घेऊ ते बाहेर आले… आलेल्या भक्तांना दर्शन दिले… दर्शन घेऊन बाहेरगांव वरून आलेले भक्त निघून गेले… ते भक्त निघून जाताच श्री महाराजांनी श्री विठोबा घाटोळ यांस तिथे उपस्थित लोकांसमोर काठीने बदडून काढले… महाराजांचा मर खाल्ल्या नंतर श्री विठोबा तिथून पळून गेला तो परत काही श्री महाराजांकडे आला नाही … बोला श्री गजानन महाराज कि जय !! 

बोला || अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

बोध -खरंतर वरील लीला म्हणजे आपल्या साठी डोळ्यातील अंजन आहे म्हणावे लागेल… पहा श्री विठोबा घाटोळ यांची पूर्वपुण्याई होती म्हणूनच त्यांना श्री महाराजांचा सहवास व सेवा करण्याचे भाग्य लाभले… परंतु त्यांच्यातील अहंकार व लोभी वृत्ती मूळे त्यांना त्या सेवेचा लाभ घेता आला नाही व परब्रम्हाच्या सेवेस ते मुकले… इथे आपणस हा सुद्धा बोध होतो पहा ना श्री महाराज आराम करत होते तरीही जे भक्त त्यांच्या दर्शन साठी आले होते… त्याची श्री महाराजांवर इतकी श्रद्धा होती कि श्री महाराज त्यांना दर्शन देण्यासाठी तात्काळ आले… इथे श्री महाराजांनी श्री विठोबा घाटोळ यांना काठीने मारले… खरे तर महाराजांचा मार हा आपल्यातील चुकीच्या वृत्ती काढून टाकण्यासाठी असतो… आहे हे श्री विठोबा घाटोळ यांना समजले नाही…जसे हे त्यांना समजले नाही तसेच अनेकदा आपल्याही बाबतीत होत असते… अनेकदा आपल्याकडून जेव्हा काहीचुका होतात तेव्हा श्री महाराज इतरांना माध्यम बनवून आपल्याला मार वा समज देत असतात … कारण महाराजांना आपल्यातील चुकीच्या समजुती… आपल्यातील दिखाऊपणा घालवून आपल्यातील भक्ती वाढवायची आहे… परंतु नेमके आपण सुद्धा अनेकदा या गोष्टीला विरोध करतो आणि श्री विठोबा घाटोळ यांच्या प्रमाणे सेवा सोडून इतरत्र अडकतो… आपणस यावर स्व चिंतन… करण्याची नितांत गरज आहे… चला तर मग आपण त्या साठी श्री महाराजांना प्रार्थना करूया ..
प्रार्थना – श्री गजानन महाराज आमची देखील पुण्याई म्हणून आम्हाला आपली सेवा करण्याची संधी प्राप्त झाली आहे… अनेकदा तू माझी प्रगती व्हावी यासाठी… इतरांच्या मार्फत शब्दरुपी काठी द्वारे व अन्य मार्गाने तू आमच्यातील… ढोंगीपणा… दिखाऊपणा… जावा यासाठी मला मदत करत असतेस परंतु माझ्यातील अहंकारी मन याला विरोध करते… आई माझी इतकीच प्रार्थना आहे कि माझ्या मनाने कितीही विरोध करू दे परंतु तू मला सॊडू नकोस कारण माझे भले कश्यात आहे हे मला समजत नाही… धन्यवाद आई… कोटी कोटी धन्यवाद

 

 


Share
और पढिये !!

स्वामींची भक्ती

स्वामी भक्तहो.. स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत भक्ती हवी.. आपण सर्व स्वामींची भक्ती करतो पण कधी कधी आपले मन स्वामी भक्ती मध्ये व्यवहारिक पणा आणते.. इथे एक गोष्ट स्प्ष्ट करावीशी वाटते ती म्हणजे प्रार्थना आणि व्यवहारिक पणा यातील भेद आपणस समजला पाहिजे..नक्कीच तो यातून...

अहंकार

हे समर्था... माझ्यातील अहंकार ही सर्वात मोठी बाधा आहे... माझ्यातील अहं म्हणतो..मी केले म्हणून हे होत आहे.. पण तुझ्या इच्छे शिवाय मी श्वास ही घेऊ शकत नाही पण माझ्यातील अहं हे विसरते..आणि खोट्या अहं पोटी माझे नुकसान होते.. माझ्यातील अहंकार नष्ट कर..कारण तो जो पर्यंत...

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..!

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..! श्रावण मासी हर्ष मानसी...आपल्या मनात भक्ती भाव वाढवण्याचा मास...आपण।अनेक संकल्प करतो..अनेक मंदिरात जातो..विशेषतः श्री शिव मंदिरात आपण जातो..आपण अनेक गोष्टी भगवान श्री शिव यांना अर्पण करतो..मग आपण अनेक गोष्टी पिंडीवर वाहतो..मग...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री खंडू पाटील रोज श्री महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जात असत.. श्री खंडू पाटील महाराजांना सवयी प्रमाणे गण्या असे म्हणत असत.. एकेदिवशी कुकाजी खंडू पाटलाला म्हणतात अरे तू रोज श्री महाराजांच्या...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री गजानन महाराज श्री हरी पाटलांच्या भावाला म्हणत आहेत बाळांनो तुमच्या हाताला खूप त्रास झाला असेल तो त्रास दूर करण्यासाठी तुम्हाला उसाचा रस काढून देतो हरी पाटील श्री महाराजांचे सेवक ( भक्त झाले )...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- जर असशील पैलवान तर मला उठव ( उचल ) शेंगांव मध्ये पाटील घराण्याचे खूप मोठे प्रस्त होते.. पाटलांना दोन मुले होते.. कडताजी आणि कुकाजी.. कडताजी यांना ६ मुले होती तर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- मी आता मंदिरात राहणार आहे जेव्हा तू बोलवशील तेव्हा नक्की येईल.. ! शेगांव चे पूर्वी नाव होते शिवगाव.. नंतर काळानुरूप त्याचे नाव शेगांव झाले.. महाराज शेगांव मध्ये...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे वज्रभूषणा तुझा सदैव जयजकार होईल.. कर्म मार्ग सोडू नकोस मात्र त्यात अडकू नकोस! शिवर गावात वज्रभूषण नावाचा पंडित राहत होता.. त्याला चारही वेदांचे ज्ञान होते.. तो...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २१ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे नरसिंगा तू उत्तम केलेस प्रपंचात राहिलास.. ! शेगावच्या जवळ असणाऱ्या अकोट गावी श्री गजानन महाराज श्री नरसिंग यांची भेट घेण्यासाठी जातात.. श्री नरसिंग यांना श्री महाराज बंधू मानत असा उल्लेख चरित्रात येतो.. असो नक्कीच श्री नरसिंग हे...

हे स्वामीं चे घर आहे…आम्ही स्वामीं च्या घरात राहतो

स्वामीं भक्तहो... अनेकदा आपण ऐकतो की वास्तू दोष आहे.. मग तो दोष घालवण्यासाठी आपण अनेक उपाय योजना करतो..आणि त्या केल्याचं पाहिजेत...पण मग याचाच एक भाग म्हणून आपण जर विचार केला की हा दोष आपण कसा दूर करू शकतो.. दोष कोणताही असो तो दूर होऊ शकतो पण जर आपले विचार बदलत नसतील...