श्री गजानन चरित्र दर्शन 10 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

Jan 2, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

 

श्री गजानन चरित्र दर्शन 10 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३
भक्ती रुपी चरणतीर्थचा महिमा
श्री जानराव देशमुख हे शेगांव मध्ये राहत होते…ते शेगाव मध्ये प्रसिद्ध व्यक्ती होते… घरात संपत्तीची काहीच कमतरता नव्हती..अचानकपणे त्यांची तब्येत बिघडली… त्याची तब्येत इतकी खराब झाली कि त्यांनी अंथरुनच धरले…अनेक वैद्य त्याचे उपचार करत होते परंतु दिवसेंदिवस तब्येत आणखीनच खराब होत होती…अनके वैद्य आपले प्रयन्त करत होते परंतु कुणालाच यश येत नव्हते… शेवटी वैद्यांनी सांगितली कि आता यांच्यावर काहीच उपचार होऊ शकत नाहीत… सर्वांनीच आशा सोडून दिली.. त्यातील काही जणांनी सुचवले कि… आपण श्री गजानन महाराज त्यांच्याकडे जाऊन त्याना मार्गदर्शन मागावे… नक्कीच काही तरी मार्ग मिळेल… मग उपस्थित लोक पैकी एक जण श्री गजानन महाराजांकडे गेले.. तेव्हा श्री महाराज बंकटलाल त्यांच्या घरी होते … त्यानी श्री बंकटलाल यांना सर्व काही सांगितलं व विनंती केली कि आपण श्री महाराजांना विनंती करून त्यांचे चरण तीर्थ जानराव त्यांच्यासाठी द्यावे… बंकटलाल यांनी सांगितले कि हे काम मी करू शकत नाही… आपण माझ्या वडिलांशी बोलून पाहावे… ते श्री भवानीराम यांच्याशी बोलले… त्यांना सर्व वृत्तांत सांगितला… सर्व वृत्तांत ऐकून भवानीराम यांचे ह्रद्य द्रवित झाले… ते श्री महाराजांकडे गेले… त्यांना सर्व वृत्तांत सांगितला व विनंती केली जर आपण आपले चरण तीर्थ दिलेत तर आम्हाला विश्वास वाटतो कि श्री जानराव यांची तब्येत नक्कीच सुधारेल… श्री महाराज यांनी चरणतीर्थ देण्याची परवानगी दिली… श्री च्या चरण तीर्थाने जानराव यांची तब्येत सुधारली आणि ते पूर्णपणे बरे झाले व आठ दिवसातच ते श्री महाराजांच्या दर्शनास गेले… हे सर्व पाहून उपस्थित सर्वांनी श्री महाराजांचा जय जय कार केला . बोला श्री गजानन महाराज कि जय
बोला || अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

बोध – वरील लीलेतून आपणस खूप खोल असा संदेश प्राप्त होत आहे..
श्री जानराव देशमुख यांच्याकडे आर्थिक सुबत्ता होती…अनेक वैद्य त्याच्यावर उपचार करत होते… परंतु कोणत्याच वैद्याला यश प्राप्त होत नव्हते… सर्वांनी आशा सोडून दिली…परंतु त्यात काही लोक असे होते कि ज्यांचा विश्वास हा उच्च होता… या ठिकाणी आपणस श्रद्धा आणि भक्ती चा भाव समजवून घ्यायचा आहे… आपणस कुठेही अंधश्रद्धा ठेवून भक्ती करायची नाहीये… वरील लीला हि त्या वेळेनुसार आहे… आज जर आपण आजारी असाल तर आपणस योग्य डॉक्टरच्या सल्ल्याने औषध उपचार घ्यायचे आहेत.. वरील लीलेत बंकटलाल यांना सर्व काही सांगितले तेव्हा त्यांनी आपल्या वडिलांशी बोलण्यास सांगितले… म्हणजेच इथे आपणस त्यांची श्री महाराजांवर जी श्रद्धा होती… ती किती वरच्या पातळीवर होती… त्याना महाराजांना अश्या प्रकारे प्रश्न विचारणे चुकीचे वाटले…. भवानी राम यांनी सुद्धा श्री महाराजांना सर्व हकीकत सांगितली… व त्यांच्या परवानगी नंतर चरण तीर्थ दिले… इथे चरण तीर्थ हे… आपल्यातील विश्वासाचे प्रतीक आहे… पहा श्री जानराव देशमुख श्री महाराजांच्या चरण तीर्थाने पूर्णपणे बरे झाले… इथे चरण तीर्थ म्हणजे विश्वास..पहा आपण अनेकदा डॉक्टरांकडे जातो… डॉक्टर आपणस औषध देतात जर आपला डॉक्टरांवर विश्वास असेल तर आपणस एकाच दिवसात फरक जाणवतो… इथे औषध काम करतेच पण आपल्यातील डॉक्टरांवरील विश्वास काम करतो व आपणस बरे वाटण्यास सुरवात होते.. थोडक्यात आपला विश्वास आपणस वाढवायचा आहे.
चला आपण श्री महाराजांना प्रार्थना करूया -श्री गजानन महाराज आपली लीला म्हणजे आमच्यासाठी विश्वास रुपी औषध आहे… आमचे मन कायम प्रत्येक गोष्टीत नकारात्मक विचार करते..श्री .जानराव यांच्या जीवनात जसे सकारात्मक लोक आले तसे सकारात्मक विचारांचे लोक आमच्या जीवनात येऊ द्या…आमच्या जीवनात प्रत्येक क्षणाला थोडे थोडे विश्वास रुपी चरण तीर्थ आम्हाला मिळावे जेणेकरून प्रत्येक परिस्थिती आमच्यातील श्रद्धा विश्वासाची पातळी उच्चत्तमच असेल… धन्यवाद महाराज… हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद !!


Share
और पढिये !!

स्वामींची भक्ती

स्वामी भक्तहो.. स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत भक्ती हवी.. आपण सर्व स्वामींची भक्ती करतो पण कधी कधी आपले मन स्वामी भक्ती मध्ये व्यवहारिक पणा आणते.. इथे एक गोष्ट स्प्ष्ट करावीशी वाटते ती म्हणजे प्रार्थना आणि व्यवहारिक पणा यातील भेद आपणस समजला पाहिजे..नक्कीच तो यातून...

अहंकार

हे समर्था... माझ्यातील अहंकार ही सर्वात मोठी बाधा आहे... माझ्यातील अहं म्हणतो..मी केले म्हणून हे होत आहे.. पण तुझ्या इच्छे शिवाय मी श्वास ही घेऊ शकत नाही पण माझ्यातील अहं हे विसरते..आणि खोट्या अहं पोटी माझे नुकसान होते.. माझ्यातील अहंकार नष्ट कर..कारण तो जो पर्यंत...

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..!

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..! श्रावण मासी हर्ष मानसी...आपल्या मनात भक्ती भाव वाढवण्याचा मास...आपण।अनेक संकल्प करतो..अनेक मंदिरात जातो..विशेषतः श्री शिव मंदिरात आपण जातो..आपण अनेक गोष्टी भगवान श्री शिव यांना अर्पण करतो..मग आपण अनेक गोष्टी पिंडीवर वाहतो..मग...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री खंडू पाटील रोज श्री महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जात असत.. श्री खंडू पाटील महाराजांना सवयी प्रमाणे गण्या असे म्हणत असत.. एकेदिवशी कुकाजी खंडू पाटलाला म्हणतात अरे तू रोज श्री महाराजांच्या...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री गजानन महाराज श्री हरी पाटलांच्या भावाला म्हणत आहेत बाळांनो तुमच्या हाताला खूप त्रास झाला असेल तो त्रास दूर करण्यासाठी तुम्हाला उसाचा रस काढून देतो हरी पाटील श्री महाराजांचे सेवक ( भक्त झाले )...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- जर असशील पैलवान तर मला उठव ( उचल ) शेंगांव मध्ये पाटील घराण्याचे खूप मोठे प्रस्त होते.. पाटलांना दोन मुले होते.. कडताजी आणि कुकाजी.. कडताजी यांना ६ मुले होती तर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- मी आता मंदिरात राहणार आहे जेव्हा तू बोलवशील तेव्हा नक्की येईल.. ! शेगांव चे पूर्वी नाव होते शिवगाव.. नंतर काळानुरूप त्याचे नाव शेगांव झाले.. महाराज शेगांव मध्ये...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे वज्रभूषणा तुझा सदैव जयजकार होईल.. कर्म मार्ग सोडू नकोस मात्र त्यात अडकू नकोस! शिवर गावात वज्रभूषण नावाचा पंडित राहत होता.. त्याला चारही वेदांचे ज्ञान होते.. तो...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २१ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे नरसिंगा तू उत्तम केलेस प्रपंचात राहिलास.. ! शेगावच्या जवळ असणाऱ्या अकोट गावी श्री गजानन महाराज श्री नरसिंग यांची भेट घेण्यासाठी जातात.. श्री नरसिंग यांना श्री महाराज बंधू मानत असा उल्लेख चरित्रात येतो.. असो नक्कीच श्री नरसिंग हे...

हे स्वामीं चे घर आहे…आम्ही स्वामीं च्या घरात राहतो

स्वामीं भक्तहो... अनेकदा आपण ऐकतो की वास्तू दोष आहे.. मग तो दोष घालवण्यासाठी आपण अनेक उपाय योजना करतो..आणि त्या केल्याचं पाहिजेत...पण मग याचाच एक भाग म्हणून आपण जर विचार केला की हा दोष आपण कसा दूर करू शकतो.. दोष कोणताही असो तो दूर होऊ शकतो पण जर आपले विचार बदलत नसतील...