नामस्मरण भक्ति – नवविधा भक्ति – श्री समर्थ रामदास स्वामी

Dec 19, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

नवविधा भक्ती चा तिसरा प्रकार नामस्मरण भक्ति या भक्ती विषयी श्रीमत दासबोध ग्रंथात सांगतात
” स्मरण देवाचे करावें | अखंड नाम जपत जावें | नामस्मरणें पावावें | समाधान | नित्य नेम प्रातः काळी | माध्यानकाळी सायंकाळी | नामस्मरण सर्वकाळी करत जावें |
नामस्मरण भक्ति हि खूपच सुंदर अशी भक्ती आहे… हि भक्ती करण्यासाठी आपल्याला कोणत्याही सामुग्रीची आवश्यकता लागत नाही…उपरोक्त श्लोका द्वारे रामदास स्वामी सांगत आहेत… भगवंताचे स्मरण करावे रोज नित्यनेमाने , प्रातः ककाळी , दुपारी , आणि सायंकाळी नामस्मरण करावे… शिवाय जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नामस्मरण करावे… ज्या पण कोणत्या देवावर आपली श्रद्धा असेल त्या भगवंताचे आपण नामस्मरण भक्ति आपण करू शकतो… जसे आपली भगवान श्री कृष्णावर श्रद्धा असेल तर आपण ” ओम नमो भगवते वासुदेवाय… थोडक्यात आपली ज्या देवावर आपली श्रद्धा असेल त्या देवाचे नामस्मरण रुपी सेवा आपण करावी… अनेकदा आपल्या मनात प्रश्न असतो कि नामस्मरण कधी करावे… याचे उत्तर आपणस समर्थ रामदास स्वामी यांनी आपणस दिले आहे कि रोज ना चुकता भगवंताचे नामस्मरण करावे… सकाळी उठले कि … दुपारी… संध्याकाळी तसेच आपणस जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अखंड नामस्मरण रुपी भक्ती करावी… या साठी कोणतेही बंधन नाहीये कि अमुक अश्या अवस्थेतच जप करावा…हा भगवंताच्या भक्तीचा खूप सुंदर असा मार्ग आहे… ज्याप्रमाणे आपला श्वास अखंड चालू आहे त्या प्रमाणे आपली नाम रुपी सेवा सुरु असली पाहिजे… या मुळे आपणस आपल्या मनास नाम रुपी सेवेची सवय लावायची आहे… सर्वांना नक्कीच विनंती आहे कि रोज किमान १ माळ आपली ज्या कोणत्या देवावर श्रद्धा असेल त्याभगवंताचे नाम सेवा करावी… या मध्ये एक गोष्ट महत्वाची कि अमुक एक मंत्रच श्रेष्ठ अशी शंका मनात आणू नये … प्रत्येक नाम हे श्रेष्ठच आहे.

चला आपण समर्थांना प्रार्थना करूया – हे समर्था… नाम कधी घ्यावे हि समज तू आज आम्हाला दिलीस…आमचे मन अनेकदा अनेक मंत्राचा जप करते कारण… मनाला असे वाटते कि हा मंत्राचा जप केला तर अमुक फायदा होईल… आणि या कारणाने नामस्मरण भक्ति चा जो खरा फायदा मिळवायचा आहे त्यापासून आम्ही दूर जातो… आमची हीच प्रार्थना आहे कि एक नामावर आम्हाला स्थिर कर… धन्यवाद स्वामी… कोटी कोटी धन्यवाद.. !
जय जय रघुवीर समर्थ


Share
और पढिये !!

स्वामींची भक्ती

स्वामी भक्तहो.. स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत भक्ती हवी.. आपण सर्व स्वामींची भक्ती करतो पण कधी कधी आपले मन स्वामी भक्ती मध्ये व्यवहारिक पणा आणते.. इथे एक गोष्ट स्प्ष्ट करावीशी वाटते ती म्हणजे प्रार्थना आणि व्यवहारिक पणा यातील भेद आपणस समजला पाहिजे..नक्कीच तो यातून...

अहंकार

हे समर्था... माझ्यातील अहंकार ही सर्वात मोठी बाधा आहे... माझ्यातील अहं म्हणतो..मी केले म्हणून हे होत आहे.. पण तुझ्या इच्छे शिवाय मी श्वास ही घेऊ शकत नाही पण माझ्यातील अहं हे विसरते..आणि खोट्या अहं पोटी माझे नुकसान होते.. माझ्यातील अहंकार नष्ट कर..कारण तो जो पर्यंत...

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..!

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..! श्रावण मासी हर्ष मानसी...आपल्या मनात भक्ती भाव वाढवण्याचा मास...आपण।अनेक संकल्प करतो..अनेक मंदिरात जातो..विशेषतः श्री शिव मंदिरात आपण जातो..आपण अनेक गोष्टी भगवान श्री शिव यांना अर्पण करतो..मग आपण अनेक गोष्टी पिंडीवर वाहतो..मग...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री खंडू पाटील रोज श्री महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जात असत.. श्री खंडू पाटील महाराजांना सवयी प्रमाणे गण्या असे म्हणत असत.. एकेदिवशी कुकाजी खंडू पाटलाला म्हणतात अरे तू रोज श्री महाराजांच्या...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री गजानन महाराज श्री हरी पाटलांच्या भावाला म्हणत आहेत बाळांनो तुमच्या हाताला खूप त्रास झाला असेल तो त्रास दूर करण्यासाठी तुम्हाला उसाचा रस काढून देतो हरी पाटील श्री महाराजांचे सेवक ( भक्त झाले )...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- जर असशील पैलवान तर मला उठव ( उचल ) शेंगांव मध्ये पाटील घराण्याचे खूप मोठे प्रस्त होते.. पाटलांना दोन मुले होते.. कडताजी आणि कुकाजी.. कडताजी यांना ६ मुले होती तर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- मी आता मंदिरात राहणार आहे जेव्हा तू बोलवशील तेव्हा नक्की येईल.. ! शेगांव चे पूर्वी नाव होते शिवगाव.. नंतर काळानुरूप त्याचे नाव शेगांव झाले.. महाराज शेगांव मध्ये...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे वज्रभूषणा तुझा सदैव जयजकार होईल.. कर्म मार्ग सोडू नकोस मात्र त्यात अडकू नकोस! शिवर गावात वज्रभूषण नावाचा पंडित राहत होता.. त्याला चारही वेदांचे ज्ञान होते.. तो...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २१ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे नरसिंगा तू उत्तम केलेस प्रपंचात राहिलास.. ! शेगावच्या जवळ असणाऱ्या अकोट गावी श्री गजानन महाराज श्री नरसिंग यांची भेट घेण्यासाठी जातात.. श्री नरसिंग यांना श्री महाराज बंधू मानत असा उल्लेख चरित्रात येतो.. असो नक्कीच श्री नरसिंग हे...

हे स्वामीं चे घर आहे…आम्ही स्वामीं च्या घरात राहतो

स्वामीं भक्तहो... अनेकदा आपण ऐकतो की वास्तू दोष आहे.. मग तो दोष घालवण्यासाठी आपण अनेक उपाय योजना करतो..आणि त्या केल्याचं पाहिजेत...पण मग याचाच एक भाग म्हणून आपण जर विचार केला की हा दोष आपण कसा दूर करू शकतो.. दोष कोणताही असो तो दूर होऊ शकतो पण जर आपले विचार बदलत नसतील...