नामस्मरण भक्ति – नवविधा भक्ति – श्री समर्थ रामदास स्वामी

Dec 19, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

नवविधा भक्ती चा तिसरा प्रकार नामस्मरण भक्ति या भक्ती विषयी श्रीमत दासबोध ग्रंथात सांगतात
” स्मरण देवाचे करावें | अखंड नाम जपत जावें | नामस्मरणें पावावें | समाधान | नित्य नेम प्रातः काळी | माध्यानकाळी सायंकाळी | नामस्मरण सर्वकाळी करत जावें |
नामस्मरण भक्ति हि खूपच सुंदर अशी भक्ती आहे… हि भक्ती करण्यासाठी आपल्याला कोणत्याही सामुग्रीची आवश्यकता लागत नाही…उपरोक्त श्लोका द्वारे रामदास स्वामी सांगत आहेत… भगवंताचे स्मरण करावे रोज नित्यनेमाने , प्रातः ककाळी , दुपारी , आणि सायंकाळी नामस्मरण करावे… शिवाय जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नामस्मरण करावे… ज्या पण कोणत्या देवावर आपली श्रद्धा असेल त्या भगवंताचे आपण नामस्मरण भक्ति आपण करू शकतो… जसे आपली भगवान श्री कृष्णावर श्रद्धा असेल तर आपण ” ओम नमो भगवते वासुदेवाय… थोडक्यात आपली ज्या देवावर आपली श्रद्धा असेल त्या देवाचे नामस्मरण रुपी सेवा आपण करावी… अनेकदा आपल्या मनात प्रश्न असतो कि नामस्मरण कधी करावे… याचे उत्तर आपणस समर्थ रामदास स्वामी यांनी आपणस दिले आहे कि रोज ना चुकता भगवंताचे नामस्मरण करावे… सकाळी उठले कि … दुपारी… संध्याकाळी तसेच आपणस जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अखंड नामस्मरण रुपी भक्ती करावी… या साठी कोणतेही बंधन नाहीये कि अमुक अश्या अवस्थेतच जप करावा…हा भगवंताच्या भक्तीचा खूप सुंदर असा मार्ग आहे… ज्याप्रमाणे आपला श्वास अखंड चालू आहे त्या प्रमाणे आपली नाम रुपी सेवा सुरु असली पाहिजे… या मुळे आपणस आपल्या मनास नाम रुपी सेवेची सवय लावायची आहे… सर्वांना नक्कीच विनंती आहे कि रोज किमान १ माळ आपली ज्या कोणत्या देवावर श्रद्धा असेल त्याभगवंताचे नाम सेवा करावी… या मध्ये एक गोष्ट महत्वाची कि अमुक एक मंत्रच श्रेष्ठ अशी शंका मनात आणू नये … प्रत्येक नाम हे श्रेष्ठच आहे.

चला आपण समर्थांना प्रार्थना करूया – हे समर्था… नाम कधी घ्यावे हि समज तू आज आम्हाला दिलीस…आमचे मन अनेकदा अनेक मंत्राचा जप करते कारण… मनाला असे वाटते कि हा मंत्राचा जप केला तर अमुक फायदा होईल… आणि या कारणाने नामस्मरण भक्ति चा जो खरा फायदा मिळवायचा आहे त्यापासून आम्ही दूर जातो… आमची हीच प्रार्थना आहे कि एक नामावर आम्हाला स्थिर कर… धन्यवाद स्वामी… कोटी कोटी धन्यवाद.. !
जय जय रघुवीर समर्थ


Share
और पढिये !!

क्षमा म्हणजे काय ?

💐 *स्वामी वाणी पुष्प ५७४(पर्व ४ थे भाग ७८)* *आजचे चिंतन-मनन* जया अंगी क्षमा भाव करुणेचा ! ऐसा भक्त सदैव प्रिय स्वामींचा !! म्हणोनि चुकलेल्या माफ करावे ! चूक झाली तर नम्र भावें माफी मागावे !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. क्षमा म्हणजे काय? इंग्रजीत आपण सॉरी...

अतूट श्रद्धा म्हणजे काय?

स्वामी वाणी पुष्प ५७३(पर्व ४ थे भाग ७७)* *आजचे चिंतन-मनन* श्रध्दा अतूट-अभेद्य करा ! स्वामी चरणी भाव धरा ! जन्म सार्थक निश्चित !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. जशी आपली श्रद्धा असेल तसे फल आपणस प्राप्त होत असते..आपण म्हणतो आमची स्वामी वर किंवा या या देवावर...

स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ?

प्रश्न- स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ? चिंतन- स्वामीं भक्तहो..आजचा प्रश्न हा इतका खोल आहे की ज्यावर प्रत्येकाने चिंतन मनन केले पाहिजे..स्वामीं सेवा..खूप सोपी आहे तशीच खूप अवघड...

अतुलना प्रार्थना

हे समर्था..आज पर्यंत मला वाटायचं की...माझेच विचार, मत, तत्व बरोबर आहे..इतरांचे नाही..पण आज तू समज दिलीस की...प्रत्येक गोष्ट ही अनुभव घेण्यापूर्वी छान वाटते..म्हणजेच ती सुद्धा अतुलनीय आहे..ही समज कायम राहू दे..ही समज दिल्याबद्दल धन्यवाद..ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल...

मधाची मधुरता मधमाश्यांनशिवाय नाही.. श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6 श्री महाराज बंकटलाल यांच्या घरी रहात होते... गावाच्या दक्षिणेस बंकटलाल यांची शेती होती.. श्री महाराज बंकटलाल यांच्या शेतात कणसे खाण्यासाठी गेले.. त्यांच्या बरोबर अजूनही अनेक सेवेकरी होते.. शेतात एक...

श्री रामचरित मानस 4

विक्रम संवत १६३१ मध्ये श्री रामचरित्र मानस कथेला प्रारंभ झाल.. चैत्र मासातील नवमी या तिथीस वार मंगळवार या दिवशी अयोध्येत हे चरित्र प्रकशित झाले... हाच प्रभू श्री रामांचा जन्मदिवस... शरयू नदी आणि अयोध्या नगरी..श्री तुलसीदास महाराज श्री राम कथेस आरंभ करत आहेत... श्री...

आत्महत्या -पाप आहे कि पुण्य आहे

https://youtu.be/QpXKoAqCoUU   आत्महत्या - आपण अनेकदा ऐकतो किंवा वाचतो कि अमुक अमुक व्यक्तींनी आत्महत्या केली.. आपण ऐकतो हळहळ व्यक्त करतो.. जवळची व्यक्ती असेल तर कदाचित आपल्या डोळ्यातही अश्रू येतात..काही दिवसा नंतर आपण सर्व जण विसरून जातो.. आपण अनेकदा हेही ऐकले...

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा - श्री महादेवांनी हि कथा रचली व सर्वप्रथम ती माता पार्वती यांना सांगितली... श्री शंकरांनी हि कथा काकभुशुंडी ऋषींना दिली कारण ते राम भक्त होते... काकभुशुंडी ऋषींनी याज्ञवल्क्य ऋषींना ऐकवली याज्ञवल्क्य ऋषींनी श्री भारद्वाज...

श्री रामचरित मानस 2 – महिमा राम नामाचा

महिमा राम नामाचा - श्री रामचरित मानस मध्ये संत श्रेष्ठ तुलसी दासजी महाराज राम नामाचा महिमा वर्णन करत आहेत... सर्वप्रथम राम नामाला वंदन असो... खरंतर राम नामाचा महिमा शब्दात व्यक्त करणे कठीण आहे... हा महामंत्र आहे.. इथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते कि ती हि कि...