पादसेवन भक्ती -नवविधा भक्ति श्री समर्थ रामदास स्वामी

Dec 12, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

पादसेवन भक्ती – श्री समर्थ रामदास स्वामी या भक्ती बाबत सांगतात कि –

पादसेवन ते जाणावे । कायावाचा मनोभावे । सद्गुरूंचे पाय सेवावे । सद्गती कारणे । सेवावें सद्गुरुचरण । या नाव पादसेवन ।
श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथात याचे यतार्थ वर्णन केले आहे –
भगवंताच्या प्राप्ती साठी काया, वाचा, मनाने आणि आपलेपणाने सद्गुरूंची चरण सेवा करावी. सद्गुरूंच्या चरणांची सेवा करणे म्हणजे पादसेवन भक्ती !
नवविधा भक्ती मधील चौथा प्रकार आहे पादसेवन भक्ती । पादसेवन भक्ती चे रामदास स्वामींनी खूप विस्तार पूरक वर्णन दासबोध मध्ये केले आहे… वरील श्लोकातून महाराज  सोप्या भाषेत पादसेवन भक्ती चे वर्णन करत आहेत… सद्गुरूंचे पाय सेवावे… सद्गुरू आपल्या प्रत्येकाचे वेगवेगळे सद्गुरू असणार… श्री स्वामी समर्थ महाराज , श्री गजानन महाराज, संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली वा अन्य कोणते आपले सद्गुरू असतील… त्यांची काया… वाचा… मनोभावे सद्गुरूंची पाद्य सेवा करावी… काया म्हणजे शरीराने सेवा करायची … शरीराने सेवा म्हणजे आपणस काय शरीराला त्रास द्यायचा आहे का? नाही आपणस शरीर साक्षात परमेश्वर या भावनेने आपणस सेवा करायची आहे… कारण आपले शरीर जर तंदुरुस्त असेल तरच आपण सद्गुरूंची सेवा करू शकतो… कारण शरीर जर व्यवस्थित नसेल तर आपण कशी सेवा करणार… त्यामुळे आपणस सर्वप्रथम आपले शरीर सद्गुरु सेवेसाठी निरोगी ठेवणे आवश्यक आहे.. जेणेकरून आपण सद्गुरूंची जी सेवा असेल ती करू शकू… आता या ठिकाणी आपली जी वाचा आहे तिने सद्गुरु ची सेवा करायचा उपदेश इथे समर्थ करत आहेत… पहा हि वाचा आपणस उच्च स्थान पण देऊ शकते व नीच स्थान पण देऊ शकते… आपण तिचा कसा वापर करतो यावर ते अवलंबून आहे… आता वाचेने सदगुरूंची सेवा म्हणजे आपणस जी काही ग्रंथ संपदा उपलब्ध आहे त्याचे आपणस वाचन करायचे आहे… जसे तुकाराम गाथा असेल , दासबोध असेल , ज्ञानेश्वरी असेल यांचे आपणस मनसोक्त वाचन करायचे आहे… जेणेकरून आपणस सद्गुरू आपणस जो बोध देऊ इच्छितात तो आपणस समजेल…तोच बोध आपण आपल्या वाचे द्वारे इतरांना सांगू शकता हि देखील सद्गुरूंची सेवा होणार आहे …हि सर्व सेवा झाली कि एक अवस्था अशी येईल कि आपण आपल्या मनाद्वारे… सद्गुरूची मानस पूजा करू… पण हि अवस्था येण्यासाठी आपणस खूप सेवेची भक्ती ची अवस्था प्राप्त करून घेणे आवश्यक आहे… त्या साठी आपण सदगुरूंच्या प्रत्येक आज्ञा चे पालन करणे आवश्यक आहे… त्यावर आपणस चिंतन मनन करणे आवश्यक आहे…तेव्हाच आपल्याकडून परिपूर्ण अशी पादसेवन भक्ती होईल.
चला आपण सद्गुरू श्री रामदास स्वामींनाच या साठी प्रार्थना करूया

हे समर्था… आज तु आम्हाला पादसेवन भक्ती म्हणजे काय याची ओळख करून दिलीस… खरे तर हे तुम्ही जे काही सांगितले हे वाचन करताना… आम्हाला असे वाटते कि आम्हाला हे समजले आहे… परंतु रोजच्या कर्मात आम्ही आपली हि शिकवण विसरून जातो…पादसेवन भक्ती करायची असेल… त्या भक्ती मध्ये स्थिर होण्यासाठी आपलीच कृपा आवश्यक आहे… हे आई… तुला हीच प्रार्थना आहे कि आमची भक्ती वाढव…आम्हाला आपली पादसेवन भक्ती प्राप्त व्हावी हीच प्रार्थना… धन्यवाद समर्था !!


Share
और पढिये !!

स्वामींची भक्ती

स्वामी भक्तहो.. स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत भक्ती हवी.. आपण सर्व स्वामींची भक्ती करतो पण कधी कधी आपले मन स्वामी भक्ती मध्ये व्यवहारिक पणा आणते.. इथे एक गोष्ट स्प्ष्ट करावीशी वाटते ती म्हणजे प्रार्थना आणि व्यवहारिक पणा यातील भेद आपणस समजला पाहिजे..नक्कीच तो यातून...

अहंकार

हे समर्था... माझ्यातील अहंकार ही सर्वात मोठी बाधा आहे... माझ्यातील अहं म्हणतो..मी केले म्हणून हे होत आहे.. पण तुझ्या इच्छे शिवाय मी श्वास ही घेऊ शकत नाही पण माझ्यातील अहं हे विसरते..आणि खोट्या अहं पोटी माझे नुकसान होते.. माझ्यातील अहंकार नष्ट कर..कारण तो जो पर्यंत...

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..!

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..! श्रावण मासी हर्ष मानसी...आपल्या मनात भक्ती भाव वाढवण्याचा मास...आपण।अनेक संकल्प करतो..अनेक मंदिरात जातो..विशेषतः श्री शिव मंदिरात आपण जातो..आपण अनेक गोष्टी भगवान श्री शिव यांना अर्पण करतो..मग आपण अनेक गोष्टी पिंडीवर वाहतो..मग...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री खंडू पाटील रोज श्री महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जात असत.. श्री खंडू पाटील महाराजांना सवयी प्रमाणे गण्या असे म्हणत असत.. एकेदिवशी कुकाजी खंडू पाटलाला म्हणतात अरे तू रोज श्री महाराजांच्या...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री गजानन महाराज श्री हरी पाटलांच्या भावाला म्हणत आहेत बाळांनो तुमच्या हाताला खूप त्रास झाला असेल तो त्रास दूर करण्यासाठी तुम्हाला उसाचा रस काढून देतो हरी पाटील श्री महाराजांचे सेवक ( भक्त झाले )...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- जर असशील पैलवान तर मला उठव ( उचल ) शेंगांव मध्ये पाटील घराण्याचे खूप मोठे प्रस्त होते.. पाटलांना दोन मुले होते.. कडताजी आणि कुकाजी.. कडताजी यांना ६ मुले होती तर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- मी आता मंदिरात राहणार आहे जेव्हा तू बोलवशील तेव्हा नक्की येईल.. ! शेगांव चे पूर्वी नाव होते शिवगाव.. नंतर काळानुरूप त्याचे नाव शेगांव झाले.. महाराज शेगांव मध्ये...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे वज्रभूषणा तुझा सदैव जयजकार होईल.. कर्म मार्ग सोडू नकोस मात्र त्यात अडकू नकोस! शिवर गावात वज्रभूषण नावाचा पंडित राहत होता.. त्याला चारही वेदांचे ज्ञान होते.. तो...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २१ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे नरसिंगा तू उत्तम केलेस प्रपंचात राहिलास.. ! शेगावच्या जवळ असणाऱ्या अकोट गावी श्री गजानन महाराज श्री नरसिंग यांची भेट घेण्यासाठी जातात.. श्री नरसिंग यांना श्री महाराज बंधू मानत असा उल्लेख चरित्रात येतो.. असो नक्कीच श्री नरसिंग हे...

हे स्वामीं चे घर आहे…आम्ही स्वामीं च्या घरात राहतो

स्वामीं भक्तहो... अनेकदा आपण ऐकतो की वास्तू दोष आहे.. मग तो दोष घालवण्यासाठी आपण अनेक उपाय योजना करतो..आणि त्या केल्याचं पाहिजेत...पण मग याचाच एक भाग म्हणून आपण जर विचार केला की हा दोष आपण कसा दूर करू शकतो.. दोष कोणताही असो तो दूर होऊ शकतो पण जर आपले विचार बदलत नसतील...