आपल्यातील मूर्खपणा सांगत आहेत – श्री समर्थ रामदास स्वामी

Dec 7, 2021 | Uncategorized

Share

श्री समर्थ रामदास स्वामी  दासबोधातून आपल्यातील मूर्खपणा सांगत आहेत
मागें एक पुढे एक ।
ऐसा जयाचा दंडक
बोले एक करी एक ।
तो एक पढत मूर्ख ।।
रामदास स्वामींनी किती सोप्या भाषेत आपल्यातील मूर्ख पणाचा गुण सांगितला आहे.. पहा ना अनेकदा कळत- नकळत आपल्या कडून हि चूक होत असते… एखाद्या व्यक्तीची एखादी गोष्ट आपणस पटली नाही कि आपण तिच्या मागून… तिच्या विषयी चर्चा करतो … मग आपण सारासार विचार न करता त्या व्यक्तीला मूर्ख म्हणतो.. पण खरोखर ती व्यक्ती मूर्ख आहे कि आपणच मूर्ख आहोत… कारण ज्या व्यक्ती विषयी आपण बोलत आहोत… ती व्यक्ती समोर नाही तरी देखील आपण तिच्या विषयी नकारात्मक बोलत असतो… नक्की आपण स्वतः ला च तर मूर्ख बनवत आहोत कि नाही… आपणच विचार करावा… समर्थ सांगतात… ज्या व्यक्ती विषयी आपण मागून टीका करतो… तीच व्यक्ती समोर असेल तर आपण तिची खोटी स्तुति करतो…खरंच आपण त्याला मूर्ख बनवत नाही तर आपणस स्वतःच आपण मूर्ख बनवतो पण हे आपल्याला समजतच नाही… आपण मराठीत एक म्हण ऐकिली आहे… बोले तैसा वागे … त्याचे वंदावे पाऊले… या विषयी समर्थ सांगतात कि… लोकांशी बोलताना एक बोलतो व प्रत्यक्ष कृती करताना मात्र आपण त्याच्या विरुद्ध कृती करतो… जसे आपणस व्यायामाचे महत्व माहित आहे… म्हणून आपण इतरांना त्याचे इतके महत्व सांगतो कि… त्या व्यक्ती ला वाटते खरंच हा एक उत्कृष्ट व्यायाम पटू असेल… प्रत्यक्षात आपण कधीच व्यायाम करत नाही… मग हा मूर्खपणा नाही का ? पहा समर्थानी एका श्लोकात आपल्यातील मूर्खपणाचे दर्शन आपणस करून दिले आहे… यावर आपण स्वतः चिंतन करावे .
चला आपण समर्थांना प्रार्थना करूया – हे समर्था तू आज आम्हाला आमच्यातील एक मूर्खपणा दाखवला त्याबद्दल धन्यवाद… आम्हीं जेव्हा तो वाचतो तेव्हा तो छान वाटतो… पण मनावरच्या मूर्खपणाच्या सवयी मुळे आम्हाला आमचा मूर्खपणा कधीच दिसत नाही… आजचा हा श्लोक आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनव… जेणेकरून… आम्हाला आमच्यातील मूर्खपणा जाणवेल… आणि मूर्ख पणा आमच्यातून हळूहळू नष्ट व्हावा असा आम्हाला आशीर्वाद द्या… धन्यवाद समर्था … कोटी कोटी धन्यवाद ! जय जय रघुवीर समर्थ


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...