आपल्यातील मूर्खपणा सांगत आहेत – श्री समर्थ रामदास स्वामी

Dec 7, 2021 | Uncategorized

Share

श्री समर्थ रामदास स्वामी  दासबोधातून आपल्यातील मूर्खपणा सांगत आहेत
मागें एक पुढे एक ।
ऐसा जयाचा दंडक
बोले एक करी एक ।
तो एक पढत मूर्ख ।।
रामदास स्वामींनी किती सोप्या भाषेत आपल्यातील मूर्ख पणाचा गुण सांगितला आहे.. पहा ना अनेकदा कळत- नकळत आपल्या कडून हि चूक होत असते… एखाद्या व्यक्तीची एखादी गोष्ट आपणस पटली नाही कि आपण तिच्या मागून… तिच्या विषयी चर्चा करतो … मग आपण सारासार विचार न करता त्या व्यक्तीला मूर्ख म्हणतो.. पण खरोखर ती व्यक्ती मूर्ख आहे कि आपणच मूर्ख आहोत… कारण ज्या व्यक्ती विषयी आपण बोलत आहोत… ती व्यक्ती समोर नाही तरी देखील आपण तिच्या विषयी नकारात्मक बोलत असतो… नक्की आपण स्वतः ला च तर मूर्ख बनवत आहोत कि नाही… आपणच विचार करावा… समर्थ सांगतात… ज्या व्यक्ती विषयी आपण मागून टीका करतो… तीच व्यक्ती समोर असेल तर आपण तिची खोटी स्तुति करतो…खरंच आपण त्याला मूर्ख बनवत नाही तर आपणस स्वतःच आपण मूर्ख बनवतो पण हे आपल्याला समजतच नाही… आपण मराठीत एक म्हण ऐकिली आहे… बोले तैसा वागे … त्याचे वंदावे पाऊले… या विषयी समर्थ सांगतात कि… लोकांशी बोलताना एक बोलतो व प्रत्यक्ष कृती करताना मात्र आपण त्याच्या विरुद्ध कृती करतो… जसे आपणस व्यायामाचे महत्व माहित आहे… म्हणून आपण इतरांना त्याचे इतके महत्व सांगतो कि… त्या व्यक्ती ला वाटते खरंच हा एक उत्कृष्ट व्यायाम पटू असेल… प्रत्यक्षात आपण कधीच व्यायाम करत नाही… मग हा मूर्खपणा नाही का ? पहा समर्थानी एका श्लोकात आपल्यातील मूर्खपणाचे दर्शन आपणस करून दिले आहे… यावर आपण स्वतः चिंतन करावे .
चला आपण समर्थांना प्रार्थना करूया – हे समर्था तू आज आम्हाला आमच्यातील एक मूर्खपणा दाखवला त्याबद्दल धन्यवाद… आम्हीं जेव्हा तो वाचतो तेव्हा तो छान वाटतो… पण मनावरच्या मूर्खपणाच्या सवयी मुळे आम्हाला आमचा मूर्खपणा कधीच दिसत नाही… आजचा हा श्लोक आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनव… जेणेकरून… आम्हाला आमच्यातील मूर्खपणा जाणवेल… आणि मूर्ख पणा आमच्यातून हळूहळू नष्ट व्हावा असा आम्हाला आशीर्वाद द्या… धन्यवाद समर्था … कोटी कोटी धन्यवाद ! जय जय रघुवीर समर्थ


Share
और पढिये !!

क्षमा म्हणजे काय ?

💐 *स्वामी वाणी पुष्प ५७४(पर्व ४ थे भाग ७८)* *आजचे चिंतन-मनन* जया अंगी क्षमा भाव करुणेचा ! ऐसा भक्त सदैव प्रिय स्वामींचा !! म्हणोनि चुकलेल्या माफ करावे ! चूक झाली तर नम्र भावें माफी मागावे !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. क्षमा म्हणजे काय? इंग्रजीत आपण सॉरी...

अतूट श्रद्धा म्हणजे काय?

स्वामी वाणी पुष्प ५७३(पर्व ४ थे भाग ७७)* *आजचे चिंतन-मनन* श्रध्दा अतूट-अभेद्य करा ! स्वामी चरणी भाव धरा ! जन्म सार्थक निश्चित !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. जशी आपली श्रद्धा असेल तसे फल आपणस प्राप्त होत असते..आपण म्हणतो आमची स्वामी वर किंवा या या देवावर...

स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ?

प्रश्न- स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ? चिंतन- स्वामीं भक्तहो..आजचा प्रश्न हा इतका खोल आहे की ज्यावर प्रत्येकाने चिंतन मनन केले पाहिजे..स्वामीं सेवा..खूप सोपी आहे तशीच खूप अवघड...

अतुलना प्रार्थना

हे समर्था..आज पर्यंत मला वाटायचं की...माझेच विचार, मत, तत्व बरोबर आहे..इतरांचे नाही..पण आज तू समज दिलीस की...प्रत्येक गोष्ट ही अनुभव घेण्यापूर्वी छान वाटते..म्हणजेच ती सुद्धा अतुलनीय आहे..ही समज कायम राहू दे..ही समज दिल्याबद्दल धन्यवाद..ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल...

मधाची मधुरता मधमाश्यांनशिवाय नाही.. श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6 श्री महाराज बंकटलाल यांच्या घरी रहात होते... गावाच्या दक्षिणेस बंकटलाल यांची शेती होती.. श्री महाराज बंकटलाल यांच्या शेतात कणसे खाण्यासाठी गेले.. त्यांच्या बरोबर अजूनही अनेक सेवेकरी होते.. शेतात एक...

श्री रामचरित मानस 4

विक्रम संवत १६३१ मध्ये श्री रामचरित्र मानस कथेला प्रारंभ झाल.. चैत्र मासातील नवमी या तिथीस वार मंगळवार या दिवशी अयोध्येत हे चरित्र प्रकशित झाले... हाच प्रभू श्री रामांचा जन्मदिवस... शरयू नदी आणि अयोध्या नगरी..श्री तुलसीदास महाराज श्री राम कथेस आरंभ करत आहेत... श्री...

आत्महत्या -पाप आहे कि पुण्य आहे

https://youtu.be/QpXKoAqCoUU   आत्महत्या - आपण अनेकदा ऐकतो किंवा वाचतो कि अमुक अमुक व्यक्तींनी आत्महत्या केली.. आपण ऐकतो हळहळ व्यक्त करतो.. जवळची व्यक्ती असेल तर कदाचित आपल्या डोळ्यातही अश्रू येतात..काही दिवसा नंतर आपण सर्व जण विसरून जातो.. आपण अनेकदा हेही ऐकले...

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा - श्री महादेवांनी हि कथा रचली व सर्वप्रथम ती माता पार्वती यांना सांगितली... श्री शंकरांनी हि कथा काकभुशुंडी ऋषींना दिली कारण ते राम भक्त होते... काकभुशुंडी ऋषींनी याज्ञवल्क्य ऋषींना ऐकवली याज्ञवल्क्य ऋषींनी श्री भारद्वाज...

श्री रामचरित मानस 2 – महिमा राम नामाचा

महिमा राम नामाचा - श्री रामचरित मानस मध्ये संत श्रेष्ठ तुलसी दासजी महाराज राम नामाचा महिमा वर्णन करत आहेत... सर्वप्रथम राम नामाला वंदन असो... खरंतर राम नामाचा महिमा शब्दात व्यक्त करणे कठीण आहे... हा महामंत्र आहे.. इथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते कि ती हि कि...