श्री गजानन महाराज चरित्र दर्शन भाग -४

Nov 25, 2021 | मराठी, संत गजानन महाराज

Share

श्री गजानन महाराजांच्या दर्शनाची आस बंकटलालच्या मनात निर्माण झाली श्री बंकटलाल ह्यांना पूर्ण विश्वास होता की ,श्री गजानन महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत आणि आता त्यांच्या मनात श्रींच्या दर्शनाची आस जागृत झाली होती त्याची तहान भूक हरपली होती त्यांचे डोळे आता फक्त श्री महाराज ह्यांच्या दर्शनाची वाट पाहत होते त्यांना सगळीकडे श्री गजानन महाराज आहेत असे वाटत होते त्यांच्या मनाची ही अवस्था ते कोणाला सांगू पण शकत नव्हते त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना विचारले की,बाळा काय झाले आहे तुला?काही चिंता तुला भेडसावत आहे काय ?तुझी तब्येत तर ठिक आहे ना. त्यांनी वडिलांना सगळे ठिक आहे असे सांगितले परंतु त्यांचा शोध चालूच होता त्यांच्या घरा जवळच श्री रामाजी पंत देशमुख नावाचे वयस्कर गृहस्थ राहत होते ते खूप थकलेले होते त्यांना श्री बंकटलाल ह्यांनी श्री महाराज ह्यांच्या विषयी सांगितले तेव्हा त्यांनी बंकटलाल ह्यांचे शब्द ऐकल्यावर ते म्हणाले की ते कोणी संत महात्मा असणार अशातच चार दिवस निघून गेले श्री बंकटलाल ह्यांच्या मनात ते चालूच होते त्या दिवशी गावात श्री गोविंद बुवा टाकळीकर नावाचे मोठे किर्तनकार आले होते आणि त्याचे त्या दिवशी तेथे किर्तन होते त्यांच्या किर्तनाला श्री बंकटलाल गेले होते तेथे त्यांचा मित्र पितांबर आला होता त्या दोघांची तेथे भेट झाली तेव्हा श्री बंकटलाल ह्यांनी त्यांना श्री गजानन महाराज ह्यांच्या विषयी सांगितले त्याचवेळी श्री बंकटलाल ह्यांना श्री गजानन महाराजांचे दर्शन झाले

|| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

 

बोध -वरील लीलेतून आपल्याला असा बोध होतो की ,तो म्हणजे आपली श्रद्धा ,भक्ती असेल तर आपल्याला त्याचे फळ नक्कीच मिळते तिच आपल्यासाठी चांगली शिकवण आहे हेच पाहणा ,श्री बंकटलाल ह्यांचा विश्वास इतका दृढ होता की एकाच भेटीत त्यांची श्री महाराजांवर श्रद्धा बसली होती… त्यांची श्री महाराज ह्यांच्या दर्शनाची आस इतकी दृढ होती की त्यांना चार दिवसात परत श्री महाराजांचे दर्शन झाले… येथे अजून एका  गोष्टींचा आपल्याला बोध होतो तो म्हणजे श्री बंकटलाल ह्यांच्या कडून तो असा की ,आपण आपल्या वडिलांचा आदर केला पाहीजे . येथे पहा की ,त्यांच्या वडिलांनी त्यांना विचारले की काही समस्या आहे का?परंतु बंकटलाल ह्यांनी त्यांना काही त्रास नको म्हणून त्यांना आदरपूर्वक सांगितले की काही समस्या नाही आहे त्या नंतर त्यांनी श्री गोविंद बुवा ह्यांना सगळी गोष्ट सांगितली तर त्यांनी सकारत्मक भावाने त्यांना सांगितले की ते कोणी महान पुरुष असतील त्यांच्या तोंडाने ही  गोष्ट ऐकल्यावर तर त्यांची श्रद्धा खूप वाढली त्यानंतर त्यांनी खुप पार्थना केली असेल आणि त्याचाच परिणाम म्हणा असे झाले की ,त्यांना श्री ब्रह्मांड नायक गजानन महाराज ह्यांचे दर्शन प्राप्त झाले बोला श्री गजानन महाराज ह्यांचा जयजयकार असो  त्यांची दर्शनाची इच्छा पूर्ण झाली बोला श्री गजानन महाराजांचा जयजयकार असो

|| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

प्रार्थना -हे ब्रह्मांड नायका आज आपण आम्हाला आजच्या लीलेच्या माध्यमातून जो भक्ती,श्रद्धा,आणि विश्वास याची शिकवण दिली त्याबद्दल धन्यवाद इतकी श्रद्धा,भक्ती,आणि विश्वास आमच्या मनात जागवा की जेणेकरून आपल्या लिलांचा अर्थ आम्हाला समजला पाहिजे आणि आम्ही त्यासाठी पात्र असू ही प्रार्थना करून घेण्यासाठी खूप खूप धन्यवाद


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...