श्री गजानन महाराज लीला दर्शन 3

Nov 18, 2021 | मराठी, संत गजानन महाराज

Share

आपले गजानन महाराज बोलत आहेत – हि संपूर्ण सृष्टी ब्रम्ह व्याप्त आहे यात अशुद्ध किंवा शुद्ध असा काही भेदभाव नाही.
श्री गजानन महाराज लीला – श्री गजानन महाराज यांनी जेवण केले हे आपण लीला न २ मध्ये पाहिले… आता जेवण झाल्यानंतर श्री महाराज यांना पाणी पिण्यास आवश्यक असणार असा विचार श्री बंकटलाल व श्री दामोदर यांच्या मनात आला… श्री महाराज यांच्या जवळ पाणी पिण्यासाठी भांडे होते परंतु त्यात पाणी नव्हते… तेव्हा श्री दामोदर यांनी श्री महाराजांना विनयपूर्वक विचारले… महाराज आपणस पिण्यासाठी पाणी आणू का ? श्री महाराज यांनी त्यांच्याकडे पहिले आणि हसले… आणि म्हणाले… आपणास आवश्यकता वाटत असेल तर जरूर पाणी आणावे… जगाच्या व्यवहारानुसार जेवण केल्यानंतर पाणी पिणे आवश्यक आहे… श्री महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे दामोदर घरात पाणी आणण्यासाठी जातात… तिथे गाई… म्हशी.. घोडे तसेच इतर पाळीव प्राण्यासाठी पाणी पिण्यासाठी एक हौद होता… श्री महाराज तिथे गळे व त्यांनी तेच पाणी ग्रहण केले… हे सर्व पाहून सर्व लोक आश्चर्य चकित झाले… दामोदर पाणी घेऊन येऊ पर्यंत श्री महाराजांनी पाणि ग्रहण केले होते… हे सर्व पाहून दामोदर श्री महाराजांना म्हणाले.. श्री महाराज ते पाणी अशुद्ध आहे.. ते पाणी प्राणी पितात… मी तुमच्या साठी माठातील शुद्ध व थंड पाणी घेऊन आलो आहे… तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले… या सर्व व्यवहारिक गोष्टी मला सांगू नका … हि संपूर्ण सृष्टी ब्रम्ह व्याप्त आहे यात अशुद्ध किंवा शुद्ध असा काही भेदभाव नाही… पाणी हे पाणीच असते… पाणी आणि पाणी पिणारा वेगळा नाही… श्री महाराज यांची हि वाणी ऐकून बंकटलाल आणि दामोदर दोघेही श्री महाराज यांचे चरण स्पर्श करण्यासाठी पुढे आले.. परंतु श्री महाराज वायू वेगाने तिथून निघून गेले… बोला श्री गजानन महाराज कि जय !
!! गण गण गणात बोते !!बोला

|| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

बोध – श्री गजानन महाराज वरील लीलेतून खूपच खोल असा बोध देत आहेत… पहा ना श्री महाराज यांचे जेवण झाल्यानंतर श्री दामोदर यांनी श्री महाराजांना पाणी पिण्याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले कि जगाच्या व्यवहारा नुसार पाणी पीले पाहिजे… पहा ना यात पहा खूप खोल संदेश आहे… ते तर ब्रम्हांड नायक आहेत तरीही… जगाच्या व्यवहारा नुसार त्यांनी पाणी ग्रहण केले… आपणस सुद्धा संसार करताना… सर्व गोष्टींची पूर्तता करायची आहे… असे नाही कि फक्त आध्यात्मिकता किंवा संसार करायचा आहे… आपणस सर्व गोष्टीत एकरूपता आणायची आहे… जसे पाणी दुधात एकत्र केले तर दुधाचा रंग धारण करते… म्हणजे ज्यात मिळवले जाते त्याचे रूप धारणा करते… अगदी तसेच आपणस संसारात राहताना आपले कर्म करायचे आहे…एखाद्या कामाची पूर्तता झळाई कि त्यात अडकायचे नाही.. आपणस आपल्या मनाला पाण्याप्रमाणे निर्मळ… शुद्ध बनवायचे आहे… इथे महाराज पाण्याचे महत्व पण सांगत आहेत… पण यावर आपण पुढे चिंतन करूया…

चला आपण श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया… श्री गजानन महाराज आपण आजच्या लीलेला माध्यम करून जो आम्हाला बोध दिलात त्याबद्दल धन्यवाद… पाण्याप्रमाणे आमचे मन सुद्धा शुद्ध करा… निर्मळ करा… या मनावर कायम तुमच्या नामाची जादू असावी… जेणेकरून आम्हाला शुद्ध ज्ञान प्राप्त होईल… आमच्या मनावरील चुकीच्या धारणा दूर करा… जेणेकरून तुम्ही आम्हाला जे ज्ञान देऊ इच्छिता त्यासाठी आम्ही पात्र बनू… ! … धन्यवाद महाराज .. कोटि कोट धन्यवाद

 


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...