श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 5

Nov 13, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ या ठिकाणी सरळ सरळ अर्थ आहे कि विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ …म्हणजे स्वामी चरणाची विभूती… स्वामी चरणी व वंदन… स्वामी नामाची साधना… स्वामी नामाचे ध्यान… आणि स्वामी चरणाचे  तीर्थ… हे ज्या स्वामी सेवेकऱ्याच्या  जीवनात आहे… त्याला कसलीच भीती भय नाही… या ठिकाणी विभूती म्हणजे आपणस आपल्या नकारात्मक विचारांना हटवून सकारात्मक विचारांची विभूती  मनाला लावायची आहे. नमन म्हणजे नुसता नमस्कार नव्हे तर… पूर्णपणे आपल्या मनास  स्वामी चरणी लीन करायचे आहे… नाम म्हणजे आपणस नामरूपी सेवा रुजू करायची आहे… जेव्हा जेव्हा शकय आहे तेव्हा अखंड स्वामी नाम घ्यायचे आहे… कोणतेही संकट आले तर हृदयातून स्वामी नाम यावे.. इतकी स्वामी नामाची सवय आपणस लावायची आहे… ध्यान हि सर्वोच्च साधना आहे.. रोज थोडा वेळ तरी आपणस ध्यान साधने साठी द्याचा आहे…हे ध्यान आपण स्वामी नामाचे करू शकता.. किंवा आपणस जी ध्यानाची पद्धत सोपी वाटते ते करू शकता… पण ध्यान करावे… तीर्थ म्हणजे या ठिकाणी स्वामी सांगत आहेत अरे जेव्हा तू हि साधना सुरु करशील तेव्हा तुला जो अनुभव येईल तेच तीर्थ असणार आहे.

स्वामीच या पंच प्रानामृतात अनेकदा आपण प्रश्न विचारतो की स्वामी कुठे आहेत.. किंवा आपणस इतर कुणी विचारते कि स्वामी कुठे आहेत… स्वामी कुठे आहेत यांचे उत्तर तर स्वामींनी आधीच दिले आहे – विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ  यात आपणस स्वामी भेटतील.. इथे याचा स्पष्ट अर्थ असा आहे.. जेव्हा आपण आपल्या स्वतः वर काम करू… आपली आंतरिक सफाई होईल तेव्हा आपणस नक्कीच स्वामी कुठे आहेत याची अनुभूती येईल.

हे तीर्थ घे आठवी रे प्रचीती स्वामी काय आहेत तर स्वामी हे अनुभूती आहेत.. मग स्वामींची अनुभूती घ्यायची असेल तर काय करावे..काही नाही फक्त आपणस वर सांगितल्या प्रमाणे सेवा करायची आहे .. मग अनुभूत येणारच आहे.. हो पण त्या साठी आपणस सेवेत सातत्य असणे गरजेचं आहे. सातत्य असेल तर आपणस प्रचिती येतेच.

न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती एकदा आपण सेवेस सुरवात केली कि आपणस अनुभव येतात… पण यात कसे असते आपण स्वामींना आपल्या मनाची चावी त्यांच्याकडे  द्यायची आहे… मग स्वामी महाराज आपला हात धरतात.. स्वामींनी आपला हात धरला असताना आपल्या मनात जर अनन्य भक्ती आणि श्रद्धा असेल तरी.. स्वामी महाराज आपला हात कधीच सोडत नाहीत… फक्त गरज आहे आपल्या सेवा श्रद्धा आणि विश्वासाची.


Share
और पढिये !!

स्वामींची भक्ती

स्वामी भक्तहो.. स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत भक्ती हवी.. आपण सर्व स्वामींची भक्ती करतो पण कधी कधी आपले मन स्वामी भक्ती मध्ये व्यवहारिक पणा आणते.. इथे एक गोष्ट स्प्ष्ट करावीशी वाटते ती म्हणजे प्रार्थना आणि व्यवहारिक पणा यातील भेद आपणस समजला पाहिजे..नक्कीच तो यातून...

अहंकार

हे समर्था... माझ्यातील अहंकार ही सर्वात मोठी बाधा आहे... माझ्यातील अहं म्हणतो..मी केले म्हणून हे होत आहे.. पण तुझ्या इच्छे शिवाय मी श्वास ही घेऊ शकत नाही पण माझ्यातील अहं हे विसरते..आणि खोट्या अहं पोटी माझे नुकसान होते.. माझ्यातील अहंकार नष्ट कर..कारण तो जो पर्यंत...

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..!

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..! श्रावण मासी हर्ष मानसी...आपल्या मनात भक्ती भाव वाढवण्याचा मास...आपण।अनेक संकल्प करतो..अनेक मंदिरात जातो..विशेषतः श्री शिव मंदिरात आपण जातो..आपण अनेक गोष्टी भगवान श्री शिव यांना अर्पण करतो..मग आपण अनेक गोष्टी पिंडीवर वाहतो..मग...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री खंडू पाटील रोज श्री महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जात असत.. श्री खंडू पाटील महाराजांना सवयी प्रमाणे गण्या असे म्हणत असत.. एकेदिवशी कुकाजी खंडू पाटलाला म्हणतात अरे तू रोज श्री महाराजांच्या...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री गजानन महाराज श्री हरी पाटलांच्या भावाला म्हणत आहेत बाळांनो तुमच्या हाताला खूप त्रास झाला असेल तो त्रास दूर करण्यासाठी तुम्हाला उसाचा रस काढून देतो हरी पाटील श्री महाराजांचे सेवक ( भक्त झाले )...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- जर असशील पैलवान तर मला उठव ( उचल ) शेंगांव मध्ये पाटील घराण्याचे खूप मोठे प्रस्त होते.. पाटलांना दोन मुले होते.. कडताजी आणि कुकाजी.. कडताजी यांना ६ मुले होती तर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- मी आता मंदिरात राहणार आहे जेव्हा तू बोलवशील तेव्हा नक्की येईल.. ! शेगांव चे पूर्वी नाव होते शिवगाव.. नंतर काळानुरूप त्याचे नाव शेगांव झाले.. महाराज शेगांव मध्ये...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे वज्रभूषणा तुझा सदैव जयजकार होईल.. कर्म मार्ग सोडू नकोस मात्र त्यात अडकू नकोस! शिवर गावात वज्रभूषण नावाचा पंडित राहत होता.. त्याला चारही वेदांचे ज्ञान होते.. तो...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २१ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे नरसिंगा तू उत्तम केलेस प्रपंचात राहिलास.. ! शेगावच्या जवळ असणाऱ्या अकोट गावी श्री गजानन महाराज श्री नरसिंग यांची भेट घेण्यासाठी जातात.. श्री नरसिंग यांना श्री महाराज बंधू मानत असा उल्लेख चरित्रात येतो.. असो नक्कीच श्री नरसिंग हे...

हे स्वामीं चे घर आहे…आम्ही स्वामीं च्या घरात राहतो

स्वामीं भक्तहो... अनेकदा आपण ऐकतो की वास्तू दोष आहे.. मग तो दोष घालवण्यासाठी आपण अनेक उपाय योजना करतो..आणि त्या केल्याचं पाहिजेत...पण मग याचाच एक भाग म्हणून आपण जर विचार केला की हा दोष आपण कसा दूर करू शकतो.. दोष कोणताही असो तो दूर होऊ शकतो पण जर आपले विचार बदलत नसतील...