श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 4

Nov 13, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

खरा होई जागा श्रद्धे सहित आपण अनेकदा म्हणतो कि मी स्वामींचा सेवेकरी आहे…असे म्हणत असताना आपल्या मनात श्रद्धा जागृत असते… पण अनेकदा काय होते संकट आले वा काही अडचण आली कि आपण विसरून जातो कि… आपण स्वामींचे सेवेकरी आहोत… कारण आपल्या मनात भीती निर्माण झालेली असते संकटा  विषयी आणि आपल्या अंतर्मनातील श्रद्धे ची जागा भीती नि घेतली असते… त्यामुळे आपल्या मधील श्रद्धा भाव कमी होतो… हि श्रद्धा कमी होऊ नये या साठी आपणस स्वामी नामाची कास धरायची आहे… आणि आपल्या अंतर्मनात श्रद्धा भाव पोहोचवायचा आहे.

कसा होशी त्या विन तू स्वामी भक्त

मनात नाही भाव आणि स्वामी मला पाव… असे कसे होईल… फक्त आपण स्वामी सेवेकरी आहोत असे म्हणून.. आपण स्वामींचे सेवेकरी होणार आहोत का ? नाही त्या साठी आपणस आपल्यातील श्रद्धा हा गुण  वाढवायचा आहे… आता हा गुण  कसा वाढेल… सोपे आहे… रोज एक तरी स्वामी लीला वाचावी… त्यावर स्वतः चिंतन … मनन करावे… रोज किमान ५ मिनिटे स्वामी नाम जप रुपी सेवा करावी.. पहा नककीच आपली श्रद्धा वाढेल… आणि आपल्या अंतर्मनातून आवाज येईल मी स्वामींचा बाळ आहे .. आता  भीतीचे काय कारण .

किती दा दिला बोल त्यानीच हाथ आज पर्यंत आपणस अनेकदा संकट..  दुःख आली… आपणस  त्यातुन कुणी वाचवले… स्वामींनी च वाचवले ना.. मग आज जेव्हा संकट आले आहे तेव्हा आपले मन का बरे विसरले आहे..आपले मन हे विसरल्यामुळे काय होते.. आपणस आपले दुःख मोठे वाटू लागते आणि सर्व मार्ग आपणस बंद दिसतात… या मुळे संकट आले कि सर्वप्रथम मनास सांगा… हे संकट नसून मला शिकण्याची संधी आहे… कारण यातून बाहेर तर मी सहजच पडणार आहे… कारण स्वामी महाराज माझ्या सोबत आहेत.. आज पर्यंत त्यांनीच तर मला  हाथ दिला आहे… आणि स्वामींनी एकदा हाथ धरला कि ते सोडत नाहीत.

नको डग मगू स्वामी देतील साथ हे मना तू डगमगू नकोस… कारण आज पर्यंत प्रत्येक संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वामी महाराजांनी साथ दिली आहे… आपले मन डगमगले कि आपले होणारे काम होत नाही… आणि आपला एक नकारात्मक विचार…आपले यश आपल्या पासून दूर नेऊ शकते… त्यामुळे न डगमगता  संकटांना  सांगा… स्वामी महाराजांची साथ माझ्या सोबत आहे… डगमगू नकोस… भिऊ नकोस.


Share
और पढिये !!

क्षमा म्हणजे काय ?

💐 *स्वामी वाणी पुष्प ५७४(पर्व ४ थे भाग ७८)* *आजचे चिंतन-मनन* जया अंगी क्षमा भाव करुणेचा ! ऐसा भक्त सदैव प्रिय स्वामींचा !! म्हणोनि चुकलेल्या माफ करावे ! चूक झाली तर नम्र भावें माफी मागावे !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. क्षमा म्हणजे काय? इंग्रजीत आपण सॉरी...

अतूट श्रद्धा म्हणजे काय?

स्वामी वाणी पुष्प ५७३(पर्व ४ थे भाग ७७)* *आजचे चिंतन-मनन* श्रध्दा अतूट-अभेद्य करा ! स्वामी चरणी भाव धरा ! जन्म सार्थक निश्चित !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. जशी आपली श्रद्धा असेल तसे फल आपणस प्राप्त होत असते..आपण म्हणतो आमची स्वामी वर किंवा या या देवावर...

स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ?

प्रश्न- स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ? चिंतन- स्वामीं भक्तहो..आजचा प्रश्न हा इतका खोल आहे की ज्यावर प्रत्येकाने चिंतन मनन केले पाहिजे..स्वामीं सेवा..खूप सोपी आहे तशीच खूप अवघड...

अतुलना प्रार्थना

हे समर्था..आज पर्यंत मला वाटायचं की...माझेच विचार, मत, तत्व बरोबर आहे..इतरांचे नाही..पण आज तू समज दिलीस की...प्रत्येक गोष्ट ही अनुभव घेण्यापूर्वी छान वाटते..म्हणजेच ती सुद्धा अतुलनीय आहे..ही समज कायम राहू दे..ही समज दिल्याबद्दल धन्यवाद..ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल...

मधाची मधुरता मधमाश्यांनशिवाय नाही.. श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6 श्री महाराज बंकटलाल यांच्या घरी रहात होते... गावाच्या दक्षिणेस बंकटलाल यांची शेती होती.. श्री महाराज बंकटलाल यांच्या शेतात कणसे खाण्यासाठी गेले.. त्यांच्या बरोबर अजूनही अनेक सेवेकरी होते.. शेतात एक...

श्री रामचरित मानस 4

विक्रम संवत १६३१ मध्ये श्री रामचरित्र मानस कथेला प्रारंभ झाल.. चैत्र मासातील नवमी या तिथीस वार मंगळवार या दिवशी अयोध्येत हे चरित्र प्रकशित झाले... हाच प्रभू श्री रामांचा जन्मदिवस... शरयू नदी आणि अयोध्या नगरी..श्री तुलसीदास महाराज श्री राम कथेस आरंभ करत आहेत... श्री...

आत्महत्या -पाप आहे कि पुण्य आहे

https://youtu.be/QpXKoAqCoUU   आत्महत्या - आपण अनेकदा ऐकतो किंवा वाचतो कि अमुक अमुक व्यक्तींनी आत्महत्या केली.. आपण ऐकतो हळहळ व्यक्त करतो.. जवळची व्यक्ती असेल तर कदाचित आपल्या डोळ्यातही अश्रू येतात..काही दिवसा नंतर आपण सर्व जण विसरून जातो.. आपण अनेकदा हेही ऐकले...

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा - श्री महादेवांनी हि कथा रचली व सर्वप्रथम ती माता पार्वती यांना सांगितली... श्री शंकरांनी हि कथा काकभुशुंडी ऋषींना दिली कारण ते राम भक्त होते... काकभुशुंडी ऋषींनी याज्ञवल्क्य ऋषींना ऐकवली याज्ञवल्क्य ऋषींनी श्री भारद्वाज...

श्री रामचरित मानस 2 – महिमा राम नामाचा

महिमा राम नामाचा - श्री रामचरित मानस मध्ये संत श्रेष्ठ तुलसी दासजी महाराज राम नामाचा महिमा वर्णन करत आहेत... सर्वप्रथम राम नामाला वंदन असो... खरंतर राम नामाचा महिमा शब्दात व्यक्त करणे कठीण आहे... हा महामंत्र आहे.. इथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते कि ती हि कि...