श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 3

Nov 12, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

उगाचि भितोसी भय हे पळू दे – आपले मन अनेकदा अनेक गोष्टींचा विचार करत असते… उद्या काय होईल… माझे अमुक काम होईल कि नाही… आणि या विचारातुन अनेकदा मनात भीती निर्माण होते… उद्या काय होईल याची… कधी कधी आपणस काही तरी अडचण असते आणि मग आपल्या मनात भीती चे विचार डोकावतात… या मनाला विचारांना आपणस सांगायचे आहे… अरे भिऊ नकोस ब्रम्हांड नायक आपल्या सोबत आहेत!

जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे – अरे मना तुझ्या जवळ अफाट अशी शक्ती आहे… स्वामी नामाची शक्ती… ती शक्ती आहे आहे आपल्या अंतकरणात आहे… आपल्या आतील आवाज अनेकदा आपणस सांगत असतो स्वामी महाराज आहेत भिऊ नकोस.. पण आपले नकरात्मक विचार मध्ये येत असतात… आपणास आंतरिक शक्तीस जागृत करायचे आहे… त्या शक्ती ची अनुभूती घ्यायची आहे.

जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा – या संपूर्ण जीव सृष्टी च्या जन्म व मृत्यूची जी दोरी आहे ती… स्वामी महाराजांच्या हाती आहे… कुणाचा जन्म कधी होईल… शेवटचा श्वास कधी याचे संपूर्ण नियोजन हे स्वामी महाराजांच्या कडे आहे… थोडक्यात झाडाचं पण सुद्धा ज्यांच्या सत्ते ने हालते… अश्या ब्रम्हांड नायकाचे आपणस सेवक आहोत… एकदा का स्वामींच्या हाती आपला हात समर्पित केला कि मग.. प्रत्येक दिवस कसा स्वामीमय बनतो… पण याचा अर्थ असा मुळीच नाही कि आपले दुखत आहे आणि आपण म्हणाल मी काहीच करणार नाही… आपणास डॉक्टर कडे जावे लागेल.. त्याच्या नियमांचे पालन करावेच लागेल.

नको घाबरू तू असे बाळ त्यांचा – हे मना तू घाबरू नकोस… तू स्वामीचा बाळ आहेस… जसे आपले आई वडील आपली काळजी घेतात तसेच स्वामी महाराज आपली काळजी घेत असतात… बघा एखादे लहान मुलं.. आपल्या आई च्या किंवा वडिलांच्या खांद्यावर बसते तेवहा त्यास खात्री असते… आपणस आपले वडील पडू देणार नाहीत… त्या मुले त्याच्या मनात कोणतीही भय नसते… ते घाबरत नाही… तशीच दृढ श्रद्धा आणि विश्वास आपणस आपल्यात निर्माण करायचा आहे… आपण स्वामींचे बाळ आहोत हा दृढ विश्वास आपणस आपल्या अंतकरणात निर्माण दृढ करायचा आहे.

 


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...