देवघर कसे असावे

Nov 8, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

देवघर कसे असावे – खरंतर देवघर कसे असावे.. यावर अनेकांची अनेक मते आहेत… यावर खरंतर प्रत्येकाने चिंतन केले तर प्रत्येक जण स्वतःला प्रामाणिक उत्तर देऊ शकतो कि… देव घर कसे असावे… ज्या ठिकाणी आपले चित्त स्थिर होते.. मन शुद्ध होते…आंतरिक आनंद प्राप्त होईल असे देव घर असावे..आता आपण म्हणाल नक्की देवघर कसे असावे… देव घर हे आपणस आर्थिक दृष्टया जसे परवडेल असे असावे… नक्कीच बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत… त्यातील आपणास आवडणारा… परवडणारा पर्याय आपण निवडावा… देवघरात नेहमी स्वच्छ असे कापडी आसन असावे.. शक्यतो रोज धुतलेले आसन असावे… आता महत्वाचा मुद्दा… देवघरात देव कोणते असावेत.. शास्त्रानुसार पंचायतन असावे… थोडक्यात पाच देव असावेत… जसे गणेश, विष्णू, शंकर, सूर्य, देवी… हि पाच देव असावेत… शंख.. घंटा असावी… आता काय होते… आपण देवघरात देवांची इतकी गर्दी करतो कि काही दिवसानी आपणस देव घर छोटे वाटू लागते… या मागचे मुख्य कारण म्हणजे आपण… कुठे गेलात किंवा कुणी सांगितले कि आणखीन एक देवाची मूर्ती अथवा फोटो घेऊन येतो व आपणस हि कळत नाही आणि मग देव घर लहान पडू लागते… त्या मुळे आज पासून ठरवा कि मी आहे त्याच देवांची व्यस्थित पूजा करेल उगाचच आणखीन देवांच्या मूर्ती अथवा फोटो वाढवत बसणार नाही.. अनेकदा काय होते मूर्ती किंवा फोटो खराब होतात आणि मग काही लोकांच्या सांगण्यावरून त्या मूर्ती अथवा फोटो मंदिरात नेवून ठेवले जातात… आता यावर तुम्ही स्वतः चिंतन मनन करा आणि ठरवा कि हे योग्य आहे कि आयोग्य… नक्की आपण भक्ती करतो कि वेडेपणा… कृपया हि गोष्ट प्रथम बंद करा… आठ दिवस… किंवा महिन्यातून एकदा सर्व देवांना हळद… लिंबू… किंवा दही… किंवा बाजारात अनेक पावडर मिळतात त्याचा वापर करून देवांना स्वच्छ करावे… कारण काय होते वातावरणामुळे किंवा केमिकल युक्त गंधाने मूर्ती खराब होतात त्यामुळे आपण अश्या प्रकारे महिण्यातून एकदा सर्व मूर्ती स्वच्छ करावेत… बघा नक्कीच आपली प्रसन्नता वाढण्यास मदत होईल… आता देवपूजा झाली… रोज देवाला काहीतरी नैवैद्य अर्पण करावा… आपण देवांना अनेक फुले वाहतो… दुसऱ्या दिवशी ते निर्माल्य नदीत वा पाण्यात टाकण्याची चुकीची पद्धत आपण करतो… बघा एकीकडे आपण गंगेच्या पाण्याची पूजा करतो आणि दुसरी कडे त्याच गंगा मातेचे पाण्यात घाण टाकतो… अशी कशी आपली श्रद्धा जी आपल्या पर्यावरणाचे नुकसान करत असेल तर… देव कसा प्रसन्न होईल… त्यामुळे आज पासून संकलप करा कि निर्माल्य पाण्यात टाकणार नाही म्हणजे नाहीच.. इथेच आपली निम्मी भगवंताची सेवा रुजू होते व ईश्वर सुद्धा खुश होऊन आशीर्वादच देतो… केवळ देवाला स्नान घातले कि देव पूजा संपते का नाही तर ईश्वराच्या जवळ जाण्याचा सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण रुपी भक्ती… पूजा झाली कि रोज किमान ५ मिनिटे कोणत्याही देवाचे नामस्मरण करा … जप करा… बघा आपणस… आपल्या स्वतः मध्ये आमूलाग्र बदल झालेले दिसेल… आज आपण इथेच थांबू… पुढील भागात यावर अजून चिंतन मनन करूया… चला तर मग राम कृष्ण हरी.. आपणास माहिती आवडल्यास नककीच आपले चॅनेल subscribe करा इतरांनाही सांगा… धन्यवाद


Share
और पढिये !!

स्वामींची भक्ती

स्वामी भक्तहो.. स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत भक्ती हवी.. आपण सर्व स्वामींची भक्ती करतो पण कधी कधी आपले मन स्वामी भक्ती मध्ये व्यवहारिक पणा आणते.. इथे एक गोष्ट स्प्ष्ट करावीशी वाटते ती म्हणजे प्रार्थना आणि व्यवहारिक पणा यातील भेद आपणस समजला पाहिजे..नक्कीच तो यातून...

अहंकार

हे समर्था... माझ्यातील अहंकार ही सर्वात मोठी बाधा आहे... माझ्यातील अहं म्हणतो..मी केले म्हणून हे होत आहे.. पण तुझ्या इच्छे शिवाय मी श्वास ही घेऊ शकत नाही पण माझ्यातील अहं हे विसरते..आणि खोट्या अहं पोटी माझे नुकसान होते.. माझ्यातील अहंकार नष्ट कर..कारण तो जो पर्यंत...

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..!

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..! श्रावण मासी हर्ष मानसी...आपल्या मनात भक्ती भाव वाढवण्याचा मास...आपण।अनेक संकल्प करतो..अनेक मंदिरात जातो..विशेषतः श्री शिव मंदिरात आपण जातो..आपण अनेक गोष्टी भगवान श्री शिव यांना अर्पण करतो..मग आपण अनेक गोष्टी पिंडीवर वाहतो..मग...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री खंडू पाटील रोज श्री महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जात असत.. श्री खंडू पाटील महाराजांना सवयी प्रमाणे गण्या असे म्हणत असत.. एकेदिवशी कुकाजी खंडू पाटलाला म्हणतात अरे तू रोज श्री महाराजांच्या...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री गजानन महाराज श्री हरी पाटलांच्या भावाला म्हणत आहेत बाळांनो तुमच्या हाताला खूप त्रास झाला असेल तो त्रास दूर करण्यासाठी तुम्हाला उसाचा रस काढून देतो हरी पाटील श्री महाराजांचे सेवक ( भक्त झाले )...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- जर असशील पैलवान तर मला उठव ( उचल ) शेंगांव मध्ये पाटील घराण्याचे खूप मोठे प्रस्त होते.. पाटलांना दोन मुले होते.. कडताजी आणि कुकाजी.. कडताजी यांना ६ मुले होती तर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- मी आता मंदिरात राहणार आहे जेव्हा तू बोलवशील तेव्हा नक्की येईल.. ! शेगांव चे पूर्वी नाव होते शिवगाव.. नंतर काळानुरूप त्याचे नाव शेगांव झाले.. महाराज शेगांव मध्ये...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे वज्रभूषणा तुझा सदैव जयजकार होईल.. कर्म मार्ग सोडू नकोस मात्र त्यात अडकू नकोस! शिवर गावात वज्रभूषण नावाचा पंडित राहत होता.. त्याला चारही वेदांचे ज्ञान होते.. तो...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २१ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे नरसिंगा तू उत्तम केलेस प्रपंचात राहिलास.. ! शेगावच्या जवळ असणाऱ्या अकोट गावी श्री गजानन महाराज श्री नरसिंग यांची भेट घेण्यासाठी जातात.. श्री नरसिंग यांना श्री महाराज बंधू मानत असा उल्लेख चरित्रात येतो.. असो नक्कीच श्री नरसिंग हे...

हे स्वामीं चे घर आहे…आम्ही स्वामीं च्या घरात राहतो

स्वामीं भक्तहो... अनेकदा आपण ऐकतो की वास्तू दोष आहे.. मग तो दोष घालवण्यासाठी आपण अनेक उपाय योजना करतो..आणि त्या केल्याचं पाहिजेत...पण मग याचाच एक भाग म्हणून आपण जर विचार केला की हा दोष आपण कसा दूर करू शकतो.. दोष कोणताही असो तो दूर होऊ शकतो पण जर आपले विचार बदलत नसतील...