देवघर कसे असावे

Nov 8, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

देवघर कसे असावे – खरंतर देवघर कसे असावे.. यावर अनेकांची अनेक मते आहेत… यावर खरंतर प्रत्येकाने चिंतन केले तर प्रत्येक जण स्वतःला प्रामाणिक उत्तर देऊ शकतो कि… देव घर कसे असावे… ज्या ठिकाणी आपले चित्त स्थिर होते.. मन शुद्ध होते…आंतरिक आनंद प्राप्त होईल असे देव घर असावे..आता आपण म्हणाल नक्की देवघर कसे असावे… देव घर हे आपणस आर्थिक दृष्टया जसे परवडेल असे असावे… नक्कीच बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत… त्यातील आपणास आवडणारा… परवडणारा पर्याय आपण निवडावा… देवघरात नेहमी स्वच्छ असे कापडी आसन असावे.. शक्यतो रोज धुतलेले आसन असावे… आता महत्वाचा मुद्दा… देवघरात देव कोणते असावेत.. शास्त्रानुसार पंचायतन असावे… थोडक्यात पाच देव असावेत… जसे गणेश, विष्णू, शंकर, सूर्य, देवी… हि पाच देव असावेत… शंख.. घंटा असावी… आता काय होते… आपण देवघरात देवांची इतकी गर्दी करतो कि काही दिवसानी आपणस देव घर छोटे वाटू लागते… या मागचे मुख्य कारण म्हणजे आपण… कुठे गेलात किंवा कुणी सांगितले कि आणखीन एक देवाची मूर्ती अथवा फोटो घेऊन येतो व आपणस हि कळत नाही आणि मग देव घर लहान पडू लागते… त्या मुळे आज पासून ठरवा कि मी आहे त्याच देवांची व्यस्थित पूजा करेल उगाचच आणखीन देवांच्या मूर्ती अथवा फोटो वाढवत बसणार नाही.. अनेकदा काय होते मूर्ती किंवा फोटो खराब होतात आणि मग काही लोकांच्या सांगण्यावरून त्या मूर्ती अथवा फोटो मंदिरात नेवून ठेवले जातात… आता यावर तुम्ही स्वतः चिंतन मनन करा आणि ठरवा कि हे योग्य आहे कि आयोग्य… नक्की आपण भक्ती करतो कि वेडेपणा… कृपया हि गोष्ट प्रथम बंद करा… आठ दिवस… किंवा महिन्यातून एकदा सर्व देवांना हळद… लिंबू… किंवा दही… किंवा बाजारात अनेक पावडर मिळतात त्याचा वापर करून देवांना स्वच्छ करावे… कारण काय होते वातावरणामुळे किंवा केमिकल युक्त गंधाने मूर्ती खराब होतात त्यामुळे आपण अश्या प्रकारे महिण्यातून एकदा सर्व मूर्ती स्वच्छ करावेत… बघा नक्कीच आपली प्रसन्नता वाढण्यास मदत होईल… आता देवपूजा झाली… रोज देवाला काहीतरी नैवैद्य अर्पण करावा… आपण देवांना अनेक फुले वाहतो… दुसऱ्या दिवशी ते निर्माल्य नदीत वा पाण्यात टाकण्याची चुकीची पद्धत आपण करतो… बघा एकीकडे आपण गंगेच्या पाण्याची पूजा करतो आणि दुसरी कडे त्याच गंगा मातेचे पाण्यात घाण टाकतो… अशी कशी आपली श्रद्धा जी आपल्या पर्यावरणाचे नुकसान करत असेल तर… देव कसा प्रसन्न होईल… त्यामुळे आज पासून संकलप करा कि निर्माल्य पाण्यात टाकणार नाही म्हणजे नाहीच.. इथेच आपली निम्मी भगवंताची सेवा रुजू होते व ईश्वर सुद्धा खुश होऊन आशीर्वादच देतो… केवळ देवाला स्नान घातले कि देव पूजा संपते का नाही तर ईश्वराच्या जवळ जाण्याचा सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण रुपी भक्ती… पूजा झाली कि रोज किमान ५ मिनिटे कोणत्याही देवाचे नामस्मरण करा … जप करा… बघा आपणस… आपल्या स्वतः मध्ये आमूलाग्र बदल झालेले दिसेल… आज आपण इथेच थांबू… पुढील भागात यावर अजून चिंतन मनन करूया… चला तर मग राम कृष्ण हरी.. आपणास माहिती आवडल्यास नककीच आपले चॅनेल subscribe करा इतरांनाही सांगा… धन्यवाद


Share
और पढिये !!

क्षमा म्हणजे काय ?

💐 *स्वामी वाणी पुष्प ५७४(पर्व ४ थे भाग ७८)* *आजचे चिंतन-मनन* जया अंगी क्षमा भाव करुणेचा ! ऐसा भक्त सदैव प्रिय स्वामींचा !! म्हणोनि चुकलेल्या माफ करावे ! चूक झाली तर नम्र भावें माफी मागावे !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. क्षमा म्हणजे काय? इंग्रजीत आपण सॉरी...

अतूट श्रद्धा म्हणजे काय?

स्वामी वाणी पुष्प ५७३(पर्व ४ थे भाग ७७)* *आजचे चिंतन-मनन* श्रध्दा अतूट-अभेद्य करा ! स्वामी चरणी भाव धरा ! जन्म सार्थक निश्चित !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. जशी आपली श्रद्धा असेल तसे फल आपणस प्राप्त होत असते..आपण म्हणतो आमची स्वामी वर किंवा या या देवावर...

स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ?

प्रश्न- स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ? चिंतन- स्वामीं भक्तहो..आजचा प्रश्न हा इतका खोल आहे की ज्यावर प्रत्येकाने चिंतन मनन केले पाहिजे..स्वामीं सेवा..खूप सोपी आहे तशीच खूप अवघड...

अतुलना प्रार्थना

हे समर्था..आज पर्यंत मला वाटायचं की...माझेच विचार, मत, तत्व बरोबर आहे..इतरांचे नाही..पण आज तू समज दिलीस की...प्रत्येक गोष्ट ही अनुभव घेण्यापूर्वी छान वाटते..म्हणजेच ती सुद्धा अतुलनीय आहे..ही समज कायम राहू दे..ही समज दिल्याबद्दल धन्यवाद..ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल...

मधाची मधुरता मधमाश्यांनशिवाय नाही.. श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6 श्री महाराज बंकटलाल यांच्या घरी रहात होते... गावाच्या दक्षिणेस बंकटलाल यांची शेती होती.. श्री महाराज बंकटलाल यांच्या शेतात कणसे खाण्यासाठी गेले.. त्यांच्या बरोबर अजूनही अनेक सेवेकरी होते.. शेतात एक...

श्री रामचरित मानस 4

विक्रम संवत १६३१ मध्ये श्री रामचरित्र मानस कथेला प्रारंभ झाल.. चैत्र मासातील नवमी या तिथीस वार मंगळवार या दिवशी अयोध्येत हे चरित्र प्रकशित झाले... हाच प्रभू श्री रामांचा जन्मदिवस... शरयू नदी आणि अयोध्या नगरी..श्री तुलसीदास महाराज श्री राम कथेस आरंभ करत आहेत... श्री...

आत्महत्या -पाप आहे कि पुण्य आहे

https://youtu.be/QpXKoAqCoUU   आत्महत्या - आपण अनेकदा ऐकतो किंवा वाचतो कि अमुक अमुक व्यक्तींनी आत्महत्या केली.. आपण ऐकतो हळहळ व्यक्त करतो.. जवळची व्यक्ती असेल तर कदाचित आपल्या डोळ्यातही अश्रू येतात..काही दिवसा नंतर आपण सर्व जण विसरून जातो.. आपण अनेकदा हेही ऐकले...

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा - श्री महादेवांनी हि कथा रचली व सर्वप्रथम ती माता पार्वती यांना सांगितली... श्री शंकरांनी हि कथा काकभुशुंडी ऋषींना दिली कारण ते राम भक्त होते... काकभुशुंडी ऋषींनी याज्ञवल्क्य ऋषींना ऐकवली याज्ञवल्क्य ऋषींनी श्री भारद्वाज...

श्री रामचरित मानस 2 – महिमा राम नामाचा

महिमा राम नामाचा - श्री रामचरित मानस मध्ये संत श्रेष्ठ तुलसी दासजी महाराज राम नामाचा महिमा वर्णन करत आहेत... सर्वप्रथम राम नामाला वंदन असो... खरंतर राम नामाचा महिमा शब्दात व्यक्त करणे कठीण आहे... हा महामंत्र आहे.. इथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते कि ती हि कि...