अन्न  हे पूर्ण ब्रह्म आहे त्याचा आदर करा!! श्री गजानन वाणी भाग १ – संदर्भ -ग्रंथ श्री गजानन विजय

Nov 4, 2021 | मराठी, संत गजानन महाराज

Share

श्री गजानन महाराज काही ना बोलता कृती द्वारे सांगत आहेत.. अन्न  हे पूर्ण ब्रह्म आहे त्याचा आदर करा!!

श्री क्षेत्र शेगाव मध्ये देवीदास पातुरकर नावाचे गृहस्थ राहात होते… ते मठाधिपती होते… एके दिवशी त्यांच्या घरी त्याच्या मुलाच्या ऋतू शांतीचा कार्यक्रम होता… त्या निमित्त त्यांनी अनेक लोकांना भोजनासाठी निमंत्रण दिले होते…त्या काळी जेवण करण्यासाठी पानाच्या पत्रावळीचा वापर केला जात… आज हि अनेक ठिकाणी याचा वापर होतो… जेवण  झाल्यावर त्या पत्रावळी त्यांच्याह घर शेजारी असणाऱ्या कचरा कुंडीत टाकल्या जात होत्या… सर्वप्रथम त्याच ठिकाणी श्री गजानन महाराज त्या कचरा कुंडीपाशी येऊन बसलेले दिसले… आजानुबाहु , तेजस्वी मुद्रा ,दिगम्बर ,अंगावर जुन्या कापडाची बंडी आणि हातात चिलीम होती… परब्रम्ह श्री गजानन महाराज त्या पत्रावळी वरील जे भाताचे शीत होते ते उचलून खात होते…

!! गण गण गणात बोते !!बोला

|| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

बोध – परब्रम्हाची प्रत्येक लीला हि आपल्या साठी प्रेरणा देणारी आहे… आणि त्यांच्या लीलेतुन बोध प्राप्त होण्यासाठी त्यांची कृपाच असावी लागते…  चला आपण त्यांनाच प्रार्थना करूया आम्हाला  हृदयातून मार्गदर्शन करा… अन्नाचा प्रत्येक कण  हा महत्वपूर्ण असा आहे… एक एक कणा पासून अनके कण बनतात आणि त्यातून अनेक जणांचे उदरभरण होऊ शकते… अन्न हे पूर्ण ब्रम्ह आहे हि समज आपणस कायम ठेवायची आहे… आपणस अन्नाचा एकही कण  वाया जाणार नाही या साठी प्रयन्त करायचा आहे… या ठिकाणी श्री गजानन महाराज श्री पातुरकर यांच्या  घरी जाऊन सुद्धा जेवण करू शकत होते… परंतु त्यांना आपल्याला समज देण्यासाठी हि लीला केली आहे… आपल्याला जेवढे आवश्यक आहे तवढेच अन्न  घ्या .. तसेच अन्नाच्या प्रत्येक कणाला  धन्यवाद द्या… त्याचप्रमाणे ज्या शेती मधून हे धान्य आले त्या शेतकऱ्याला धन्यवाद द्या… ज्यांनी हे अन्न  बनवले त्यांना धन्यवाद द्या…तसेच आणखीन ऐका  गोष्टीचे भान आपणस ठेवायचे आहे ते म्हणजे जेव्हा आपण बाहेर हॉटेल मध्ये जेवण करण्यास जातो त्यावेळेस आपणस या गोष्टी चे जास्त भान ठेवायचे आहे… कारण आपण अनेकदा अन्न  तसेच टाकून देतो… इथे आपणस विशेष काळजी घ्यायची आहे… आपला आहे अन्ना विषयी चा भाव…  समज श्री गजानन महाराजांच्या सेवेचे पहिले पाऊल ठरेल… !!बोला

|| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

चला आपण सर्व मिळून श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया – हे ब्रम्हांडनायक श्री गजानन महाराज आज आपण आम्हाला अन्न हे पूर्णब्रम्ह हि जी समज  दिलीत त्या बद्दल धन्यवाद…हि समज आम्हाला कायम राहावी आणि अन्नाच्या एकाही  कणाचे नुकसान आमच्या द्वारे होऊ नये..अन्नाचा प्रत्येक कण  ग्रहण करताना तुमच्या बोधाची.. लीलेची आठवण असावी हीच प्रार्थना… धन्यवाद महाराज कोटि कोटि धन्यवाद

 


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...