अन्न  हे पूर्ण ब्रह्म आहे त्याचा आदर करा!! श्री गजानन वाणी भाग १ – संदर्भ -ग्रंथ श्री गजानन विजय

Nov 4, 2021 | मराठी, संत गजानन महाराज

Share

श्री गजानन महाराज काही ना बोलता कृती द्वारे सांगत आहेत.. अन्न  हे पूर्ण ब्रह्म आहे त्याचा आदर करा!!

श्री क्षेत्र शेगाव मध्ये देवीदास पातुरकर नावाचे गृहस्थ राहात होते… ते मठाधिपती होते… एके दिवशी त्यांच्या घरी त्याच्या मुलाच्या ऋतू शांतीचा कार्यक्रम होता… त्या निमित्त त्यांनी अनेक लोकांना भोजनासाठी निमंत्रण दिले होते…त्या काळी जेवण करण्यासाठी पानाच्या पत्रावळीचा वापर केला जात… आज हि अनेक ठिकाणी याचा वापर होतो… जेवण  झाल्यावर त्या पत्रावळी त्यांच्याह घर शेजारी असणाऱ्या कचरा कुंडीत टाकल्या जात होत्या… सर्वप्रथम त्याच ठिकाणी श्री गजानन महाराज त्या कचरा कुंडीपाशी येऊन बसलेले दिसले… आजानुबाहु , तेजस्वी मुद्रा ,दिगम्बर ,अंगावर जुन्या कापडाची बंडी आणि हातात चिलीम होती… परब्रम्ह श्री गजानन महाराज त्या पत्रावळी वरील जे भाताचे शीत होते ते उचलून खात होते…

!! गण गण गणात बोते !!बोला

|| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

बोध – परब्रम्हाची प्रत्येक लीला हि आपल्या साठी प्रेरणा देणारी आहे… आणि त्यांच्या लीलेतुन बोध प्राप्त होण्यासाठी त्यांची कृपाच असावी लागते…  चला आपण त्यांनाच प्रार्थना करूया आम्हाला  हृदयातून मार्गदर्शन करा… अन्नाचा प्रत्येक कण  हा महत्वपूर्ण असा आहे… एक एक कणा पासून अनके कण बनतात आणि त्यातून अनेक जणांचे उदरभरण होऊ शकते… अन्न हे पूर्ण ब्रम्ह आहे हि समज आपणस कायम ठेवायची आहे… आपणस अन्नाचा एकही कण  वाया जाणार नाही या साठी प्रयन्त करायचा आहे… या ठिकाणी श्री गजानन महाराज श्री पातुरकर यांच्या  घरी जाऊन सुद्धा जेवण करू शकत होते… परंतु त्यांना आपल्याला समज देण्यासाठी हि लीला केली आहे… आपल्याला जेवढे आवश्यक आहे तवढेच अन्न  घ्या .. तसेच अन्नाच्या प्रत्येक कणाला  धन्यवाद द्या… त्याचप्रमाणे ज्या शेती मधून हे धान्य आले त्या शेतकऱ्याला धन्यवाद द्या… ज्यांनी हे अन्न  बनवले त्यांना धन्यवाद द्या…तसेच आणखीन ऐका  गोष्टीचे भान आपणस ठेवायचे आहे ते म्हणजे जेव्हा आपण बाहेर हॉटेल मध्ये जेवण करण्यास जातो त्यावेळेस आपणस या गोष्टी चे जास्त भान ठेवायचे आहे… कारण आपण अनेकदा अन्न  तसेच टाकून देतो… इथे आपणस विशेष काळजी घ्यायची आहे… आपला आहे अन्ना विषयी चा भाव…  समज श्री गजानन महाराजांच्या सेवेचे पहिले पाऊल ठरेल… !!बोला

|| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

चला आपण सर्व मिळून श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया – हे ब्रम्हांडनायक श्री गजानन महाराज आज आपण आम्हाला अन्न हे पूर्णब्रम्ह हि जी समज  दिलीत त्या बद्दल धन्यवाद…हि समज आम्हाला कायम राहावी आणि अन्नाच्या एकाही  कणाचे नुकसान आमच्या द्वारे होऊ नये..अन्नाचा प्रत्येक कण  ग्रहण करताना तुमच्या बोधाची.. लीलेची आठवण असावी हीच प्रार्थना… धन्यवाद महाराज कोटि कोटि धन्यवाद

 


Share
और पढिये !!

क्षमा म्हणजे काय ?

💐 *स्वामी वाणी पुष्प ५७४(पर्व ४ थे भाग ७८)* *आजचे चिंतन-मनन* जया अंगी क्षमा भाव करुणेचा ! ऐसा भक्त सदैव प्रिय स्वामींचा !! म्हणोनि चुकलेल्या माफ करावे ! चूक झाली तर नम्र भावें माफी मागावे !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. क्षमा म्हणजे काय? इंग्रजीत आपण सॉरी...

अतूट श्रद्धा म्हणजे काय?

स्वामी वाणी पुष्प ५७३(पर्व ४ थे भाग ७७)* *आजचे चिंतन-मनन* श्रध्दा अतूट-अभेद्य करा ! स्वामी चरणी भाव धरा ! जन्म सार्थक निश्चित !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. जशी आपली श्रद्धा असेल तसे फल आपणस प्राप्त होत असते..आपण म्हणतो आमची स्वामी वर किंवा या या देवावर...

स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ?

प्रश्न- स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ? चिंतन- स्वामीं भक्तहो..आजचा प्रश्न हा इतका खोल आहे की ज्यावर प्रत्येकाने चिंतन मनन केले पाहिजे..स्वामीं सेवा..खूप सोपी आहे तशीच खूप अवघड...

अतुलना प्रार्थना

हे समर्था..आज पर्यंत मला वाटायचं की...माझेच विचार, मत, तत्व बरोबर आहे..इतरांचे नाही..पण आज तू समज दिलीस की...प्रत्येक गोष्ट ही अनुभव घेण्यापूर्वी छान वाटते..म्हणजेच ती सुद्धा अतुलनीय आहे..ही समज कायम राहू दे..ही समज दिल्याबद्दल धन्यवाद..ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल...

मधाची मधुरता मधमाश्यांनशिवाय नाही.. श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6 श्री महाराज बंकटलाल यांच्या घरी रहात होते... गावाच्या दक्षिणेस बंकटलाल यांची शेती होती.. श्री महाराज बंकटलाल यांच्या शेतात कणसे खाण्यासाठी गेले.. त्यांच्या बरोबर अजूनही अनेक सेवेकरी होते.. शेतात एक...

श्री रामचरित मानस 4

विक्रम संवत १६३१ मध्ये श्री रामचरित्र मानस कथेला प्रारंभ झाल.. चैत्र मासातील नवमी या तिथीस वार मंगळवार या दिवशी अयोध्येत हे चरित्र प्रकशित झाले... हाच प्रभू श्री रामांचा जन्मदिवस... शरयू नदी आणि अयोध्या नगरी..श्री तुलसीदास महाराज श्री राम कथेस आरंभ करत आहेत... श्री...

आत्महत्या -पाप आहे कि पुण्य आहे

https://youtu.be/QpXKoAqCoUU   आत्महत्या - आपण अनेकदा ऐकतो किंवा वाचतो कि अमुक अमुक व्यक्तींनी आत्महत्या केली.. आपण ऐकतो हळहळ व्यक्त करतो.. जवळची व्यक्ती असेल तर कदाचित आपल्या डोळ्यातही अश्रू येतात..काही दिवसा नंतर आपण सर्व जण विसरून जातो.. आपण अनेकदा हेही ऐकले...

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा - श्री महादेवांनी हि कथा रचली व सर्वप्रथम ती माता पार्वती यांना सांगितली... श्री शंकरांनी हि कथा काकभुशुंडी ऋषींना दिली कारण ते राम भक्त होते... काकभुशुंडी ऋषींनी याज्ञवल्क्य ऋषींना ऐकवली याज्ञवल्क्य ऋषींनी श्री भारद्वाज...

श्री रामचरित मानस 2 – महिमा राम नामाचा

महिमा राम नामाचा - श्री रामचरित मानस मध्ये संत श्रेष्ठ तुलसी दासजी महाराज राम नामाचा महिमा वर्णन करत आहेत... सर्वप्रथम राम नामाला वंदन असो... खरंतर राम नामाचा महिमा शब्दात व्यक्त करणे कठीण आहे... हा महामंत्र आहे.. इथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते कि ती हि कि...