डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी व लाखोंच्या सकारत्मक प्रार्थनेने मृत्यूच्या दारातून परत.. स्वामीं सेवेकरी…!

  • आपण नेहमी म्हणतो की स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून रहावे.. म्हणजेच आपले कर्म निस्वार्थ भावनेने करावे..फळाची अपेक्षा करू नये…खरंच काय असते निःस्वार्थ सेवा..अशी निःस्वार्थ सेवा करणारे कुणी आहेत का… असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होईल तर याचे उत्तर आहे हो..असे स्वामींचे सेवेकरी आहेत ज्यांनी आज पर्यंत अखंड निस्वार्थ सेवा केली आहे..आपणस स्वामीं वाणी ही वेबसाईट तसेच अँप देखील माहीत असेल..या वर आपण स्वामीं वाणी ऐकली असेल..वाचली असेल..पण ही लिहिली कुणी..ही प्रसिद्ध कोण करत आहे..हे आज पर्यंत काही मोजक्याच लोकांना माहीत आहे..आपण म्हणाल की मग यात काय झाले ? एक स्वामी वाणी प्रसिद्ध झाली की ती लाखो लोक ती वाचत होते..श्रवण करत होते..वेबसाईट Views सुध्दा लाखो.. जर याचा हिशोब केला तर या माध्यमातून ते वार्षिक लाखो रुपये कमवू शकत होते पण..स्वतःला शब्द दिला होता स्वामीं सेवेचे बाजारी करण करणार नाही..अशी ही निस्वार्थ सेवा अखंडपणे ३.५ वर्ष सुरु होती..साधारण ३०९ भागांची स्वामीं वाणी वेबसाईटवर उपल्बध होती..पण अचानक काही गोष्टी झाल्या..कुठंतरी वाटले की स्वामीं लिलामधून काही जण चुकीचा अर्थ लावत आहेत.. मग विचार आला..आपले काम स्वामी सेवा करणे आहे..आपले मत इतरांवर लादणे नाही..क्षणाचाही विचार न करता त्यांनी सर्व स्वामीं वाणी संग्रह अर्चिव केला..विचार निस्वार्थ होता..अनेकांनी उत्पन्न कमावले.. पण ते स्वामी विचारांचा प्रचार करत होते म्हणून आणि चांगलं कार्य कार्य करत होते म्हणून त्यानां सुद्धा परवानगी दिली.. उत्पन्न महत्वाचे नाही तर स्वामी विचार महत्वाचे आहे हा मुद्दा महत्वाचा..
  • या जागी माझ्यासारखी व्यक्ती नक्कीच नाही म्हणाली असती अथवा मला काहीं मोबदला दे म्हणाली असते पण यांनी असे काहीच केले नाही..
  • मग विचार केला चिंतन मनन केले की स्वामीं सेवा तर थांबली नाही पाहिजे..मग स्वामीं वाणी चे नवीन पर्व सुरु झाले..दैनंदिन जीवनातील स्वामीं वाणी..म्हणजे आपणस अनेक प्रश्न असतात..त्यावर उत्तर मिळत नाही..अश्या प्रश्नांवर चिंतन मनन करून उत्तर मांडण्याचा प्रयत्न यात केला आहे..ही सेवा सुद्धा निस्वार्थ सुरू आहे.. कदाचित आपल्या मनात प्रश्न निर्माण होईल..ही व्यक्ती गर्भ श्रीमंत असेल..हिला पैशाचे महत्त्व समजलं नसेल.. वेडी व्यक्ती..असे अनेक गोष्टी आपल्या मनात येतील..अनेकांना जेव्हा मी हे सांगितले तेव्हा त्यांनी मला असेच उत्तर दिले..पण खरंतर ती व्यक्ती देखील सर्व सामान्यच आहे…प्रापंचिक आहे..तरुण आहे..कुटुंब चालवण्यासाठी १८-१८ तास काम करते..पण निस्वार्थ स्वामीं सेवेचा विडा उचलला आहे असे म्हणावे लागेल..आपण म्हणाल काय फायदा..अहो स्वामीं चा नियम आहे ते कुणाचेच काही ठेवत नाहीत..वेळ आली की व्याजासह परत..एक दिवस अचानक त्यांचे भयानक डोके दुखू लागले..डॉक्टर कडे गेले तर BP २८० झाला होता..ब्रेन स्ट्रोक चा अटॅक होता..प्यारलेसिस पासून ते जिवंत राहणे अशक्य होते.. परंतु दररोजची ध्यानधारणा आणि सर्वांच्या अप्रत्यक्ष आशीर्वाद ह्या मुळे तर काय.. डॉक्टर आश्चर्य चकित होऊन बोलले की, ‘तुम्ही अजून बोलत आहात यावर विश्वास बसत नाही..’ त्यांना ICU मध्ये ऍडमिट केले… परिस्थिती क्रिटिकल होती.. या परिस्थितीत सुद्धा या व्यक्तीने गुरूवार ची स्वामीं वाणी प्रसिद्ध केली.. त्यांना ऑडिओ करता आला नाही..त्याबद्दल त्यांनी स्वामीं भक्तांची माफी मागितली व कारण सांगितले..
  • *अहो ज्या माणसाचे नाव माहीत नाही..चेहरा माहीत नाही.* अश्या स्वामीं सेवेकरी बरा व्हावा यासाठी.. फेसबुक, इन्स्टाग्रामवर, व्हाट्सएपच्या माध्यमातून लोकांना सकारात्मक प्रार्थना केल्या..यात नाही म्हंटल तरी हजारो लोकांच्या सकारात्मक प्रार्थना काम करत होत्या..आपल्या सर्वांच्या सकारात्मक प्रार्थना आणी डॉक्टरांचे प्रयत्न यातून मृत्यू वर मात केली..डॉक्टरांचे प्रयत्नाला आपल्या सर्वांच्या सकारात्मक प्रार्थनेचे बळ.. 72 तासाच्या आत डॉक्टरांनी सांगितले आता आपणस धोका नाही..आणि 7-8 दिवसांतच त्याना discharge मिळाला..ते सुख रूप घरी आले..अजूनही डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितले आहे.. पण धोक्याच्या बाहेर हेत..
  • हे सर्व काय होते तर निस्वार्थ स्वामीं सेवेचे फळ…एखादी व्यक्ती मृत्यु च्या दारात असून सुद्धा निस्वार्थ सेवा सुरू ठेवते मग त्याचे फल या पेक्षा मोठे ते काय असणार.. असो..यातून आपणस काय बोध मिळतो..आपले प्रत्येक कर्म निस्वार्थ भावनेने करा..मग ती स्वामीं सेवा असो वा..आपण करत असणारी नोकरी.. धंदा असो तो जेव्हा आपण एक स्वामीं सेवा म्हणून करू तेव्हा नक्कीच स्वामीं महाराज आपणस भरभरून देतात..दुसरे आपले थोडे फार दुखत असेल तर दुर्लक्ष करू नका तात्काळ डॉक्टर कडे जा ..त्यांचा सल्ला घ्या.. मनाने किंवा इतरांचे ऐकून उपचार करू नका..शरीराची काळजी घ्या कारण हेच जेव्हा आपण याची काळजी घेऊ तेव्हा ते देखील आपली काळजी घेणार आहे..निस्वार्थ स्वामीं सेवा करा..मेवा नक्कीच मिळेल..या सर्व अनुभवात आज त्या निस्वार्थ सेवेकरी चे नाव सांगणे अपरिहार्य आहे पण त्यांनी स्वामीं सेवेकरी हीच ओळख कायम असावी ही इच्छा व्यक्त केली….!
    नक्कीच अशीच प्रेरणात्मक सेवा तुमच्या द्वारे व्हावी हीच समर्थ चरणी प्रार्थना..धन्यवाद स्वामीं
    ,”काही जण असेही बोलतील की,स्वामींचीच कृपा होती तर मग डॉक्टर कडे कशाला गेला? आशा लोकांना सांगावेसे वाटते की, डॉक्टरांना सुद्धा देवानेच बनवले आहे.. आणि क्वांटम फिसिक्स च्या नियमांने सर्व लोकांच्या सकारात्मक प्रार्थना- तरंगाचा प्रभाव उपचारात सहकार्य करत असतो.. म्हणून दवा आणि दुवा ह्याचे महत्व आहे..😊”

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ – गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ – गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा… ! 

आपण लीला क्रमांक ७ मध्ये पाहिले कि श्री गजानन महाराज श्री बंकटलाल यांच्या घरीच राहिले.. दुसऱ्या दिवशी श्री गजानन महाराजांची विविध प्रकारचे सुंगधी द्रव्याने स्नान घातले.. षोडश उपचारे पूजा केली.. नैवद्य अर्पण केला.. इतके भक्तिमय वातावरण होते कि सर्व सेवेकरी सेवेत तल्लीन झाले होते.. श्री बंकटलाल तर भक्तीत इतके तल्लीन झाले होते.. त्यांचे घर द्वारकापुरी सारखे झाले होते… तो दिवस सोमवारचा होता.. त्यावेळेस तिथे श्री बंकटलाल यांचे चुलत भाऊ इच्छाराम सुद्धा तिथेच होते… ते शिव भक्त होते.. त्या दिवशी त्यांचा उपवास होता.. त्यांनी श्री महाराजांना प्रार्थना केली.. महाराज आपण करुणाघन आहात.. आपण सर्वांच्या इच्छेची पूर्ती करता.. माझी आपणस विनंती आहे कि.. आपण संध्याकाळचे भोजन देखील आमच्याकडे करावे.. आपण जर जेवण केले नाही तर मी देखील भोजन करणार नाही.. आपण सर्वांची इच्छा पूर्ण करता.. माझी इतकी इच्छा पूर्ण करा.. महाराज भोजन करण्यास तयार झाले.. इच्छाराम भोजनाचे ताट घेऊन आले.. ताटात आंबेमोहर तांदळाचा भात , मोतीचूर चे लाडू , जिलेबी, अजूनही बरेच पदार्थ होते.. श्री महाराज स्वतःशीच बोलले.. “आता इतके खा कि कधीच खाण्यास मिळाले नाही.. सगळ्यांना दाखव अति खाणे काय असते.. असे म्हणून महाराज भोजन करण्यास सुरवात करतात.. त्यांनी ताटातील सर्व अन्न ग्रहण केले.. त्यांनी इतके जेवण केले कि त्यांना तिथेच जोराची उलटी झाली.. हि त्यांची लीला होती.. बोला श्री गजानन महाराज कि जय !

बोध – वरील लीलेत खूपच खोल असा संदेश दडला आहे.. वरील लीलेत इच्छा रामजी यांनी आपली इच्छा महाराजांना सांगितली व इच्छा युक्त भक्ती साठी श्री महाराजांना भोजनाचा आग्रह केला.. त्यांना माहित होते श्री महाराजांचे भोजन झाले आहे तरी आपल्या व्रताच्या पूर्ती साठी महाराजांना भोजनाचा आग्रह धरला.. श्री महारांजानी सुद्धा आपणस बोध प्राप्त व्हावा यासाठी भोजन करण्यास तयार झाले.. त्यांनी केवळ भोजनच केले नाही तर आणलेले सर्व भोजन त्यांनी ग्रहण केले आणि लगेचच उलटी केली.. इथे ते सर्व अन्न पचवू शकत होते पण जाणून बुजून त्यांनी उलटी केली कारण त्यांना सर्वांना दाखवून द्याचे होते कि कुणालाही कोणत्याच गोष्टीचा आग्रह करू नका.. ज्याला जितकी भूख आहे तो तितके अन्न ग्रहण करेल.. त्याला आग्रह करून खाऊ घालूं नका.. इथे इच्छा रामजी सारखे आपले सुद्धा होते.. कुठेही कोणती चांगली खाण्याची वस्तू दिसली कि ती खाण्याचा मोह आपण रोखू शकत नाही मग तेव्हा आपणस भूख असो व नसो आपण अतिरिक्त अन्न ग्रहण करतो.. अश्या प्रकारे आपण आपली शरीरावर अन्याय करतो… असे आपण करू नये हा बोध देण्यासाठी श्री गजानन महाराजांनी हि लीला केली असावी असा बोध मिळतो.. बोला गजानन महाराज कि जय .. !

प्रार्थना – श्री गजानन महाराज आपण तर करुणाघन आहात.. आजच्या लीलेच्या माध्यमातून आपण आम्हाला समज दिलीत कि शरीराला आवश्यक असेल तितकेच अन्न आपण ग्रहण करणे आवश्यक आहे.. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो.. आम्हाला आमच्या आहारावर नियंत्रण ठेवण्याची समज द्या.. आमच्यातील इच्छा राम वर नियंत्रित करा.. अती सर्व वर्ज्य करण्याची समज आमच्यात दृढ करा.. हि समज दिल्याबद्दल धन्यवाद.. हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद

पितृपक्ष – पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा

पितृपक्ष – पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा, आपल्याकडे दरवर्षी भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपदी अमावास्या हा साधारण १५ ते १६ दिवसाची कालावधी ला आपण पितृपक्ष म्हणतो. पितृपक्ष म्हंटलं कि आपल्या कडे आपण म्हणतो कि कोणतेच धार्मिक  कार्य या महिन्यात करायची नाही हे आपण आज पर्यंत ऐकत आलो आहोत पण नेमके काय आहे ? कश्या साठी असतो? नेमके काय करणे अपेक्षित असावे आपली पूर्वजांना या कालावधीत यावर आज आपण चिंतन मनन करणार आहोत. जसे इंग्रजीत १२ महिने आहेत तसेच आपल्या संस्कृतीत १२ महिने आहेत. आपल्यकडे प्रत्येक महिण्याची काही तरी विशेष असा सण असतो जो आपणस काही तरी प्रेरणा देत असतो तसाच हा भाद्रपद महिना याच्या सुरवातीला आपण १० दिवस गणपती बाप्पा ची सेवा करतो आणि लगेचच दुसऱ्या दिवशी पितृपक्ष सुरु होतो जो कालावधी आपण आपल्या पूर्वजांच्या सेवे साठी शास्त्राने ठरवून दिला आहे. खरंतर प्रत्येक दिवसच तसा आपल्या वडीलधाऱ्या माणसांच्या सेवेसाठी असतो. ज्यावेळी एखादी व्यक्ती मृत पावते तेव्हा प्रथम वर्षी आपण वर्ष श्राद्ध करतो पण त्यानंतर आपण दरवर्षी पूर्वजांच्या सेवेसाठी देणे काळा नुसार शक्य होणार नाही हे आपली पूर्वजांनी जाणले असावे म्हणूनच त्यांनी पितृपक्ष या साठी वर्षातील १५ दिवसांचा कालावधी दिला असावा. आता नेमकी आपल्या पूर्वजांची सेवा कधी करावी हा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो. समजा एखादी व्यक्ती प्रतिपदा ला मृत झाली असेल तर तिचे पक्ष भाद्रपद प्रतिपदेला करावे.. एकादशी ला एखादी व्यक्ती मृत झाली असेल तर तिचे पक्ष भाद्रपद एकादशीला करावे थोडक्यात ज्या तिथीला व्यक्ती मृत पावते त्या नंतर वर्ष श्राद्ध झाल्या नंतर दरवर्षी भाद्रपद महिन्यांत त्या तिथीला आपल्या पूर्वजांचे पक्ष करावेत. एखादी स्त्री सवाष्ण मृत असेल तर तिचे पक्ष नवमी तिथीला करण्यात येतात. पती मृत झाल्या नंतर दोघांचे पक्ष एकाच तिथीस करण्यात येतात . ज्यांना आपल्या पूर्वजांची तिथी माहित नसेल अश्यानी अमावस्या तिथीला पक्ष करावेत. थोडक्यात हि झाली तिथी विषयी माहिती आता अनेकांच्या मनात प्रश्न असतो कि या साठी स्वयंपाक काय असावा खरंतर स्वयंपाक याला साधाच असतो. पोळी भाजी , वरण भात , कढी , खीर ,भाजणीच्या डाळीचे वडे . साधारण असा नैवद्य आपण करतो. आता हि झाली माहिती शास्त्रानुसार आता आपण यावर थोडे चिंतन मनन करूया.. खरंच हा महिना सेवा केली तरच पूर्वज तृप्त होतील का ? आपण ज्याची मृत झाल्या नंतर सेवा म्हणून पक्ष करत आहोत त्यांची जिवंतपणी तितक्याच आत्मीयतेने सेवा केली आहे का ? त्यांना काय हवं काय नको आहे हे आपण पाहिले आहे का ? त्यांच्याशी जीवंतपणी आत्मीयतेने बोललो आहोत का ? यांची उत्तरे हा असावीत जर याचे उत्तर नाही असे येत असेल तर नक्कीच आपण आधी त्यांची माफी मागितली पाहिजे कारण जो पर्यंत आपण केलेली चूकच जर आपणस समजत नसेल तर आपण पितरांची किती हि सेवा केली तरी आपणस अपेक्षित फल कसे प्राप्त होईल. हे झाले मृत व्यक्तींबद्दल खरंतर आपण सर्वांशीच आदराने वागले पाहिजे कारण मुख्य दोष निर्मिती होत असेल तर जिवंत व्यक्तींना जो त्रास देतो त्यातुन म्हणून जर आपण सर्वांशीच वागताना दोष रहित वागण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपले रोजचे जीवनच सेवा मय बनेल आणि मग जेव्हा आपण मृत व्यक्तींची सेवा करू ती तर विशेष असे फल दिल्याशिवाय राहणार नाही यात काहीच शंका नाही.

चला तर मग आजपासूनच या सेवेस सुरवात करूयात आणि आपले जीवन सुंदर असे बनवूयात. चला आज आपण आपल्या पूर्वजांना प्रार्थना करूयात..

हे माझ्या पूर्वजांनो… मला माफ करा.. जाणते अजाणतेपणी.. आपण जिवीत असताना आपले मन माझ्याकडून दुखावले गेले त्याबद्दल मला माफ करा.. तुमच्या अनेक इच्छा अपेक्षा आम्ही पूर्ण करू शकलो नाही त्याबद्दल आम्हाला माफ करा… ज्या चुका आमच्याकडून झाल्या त्या परत होऊ नयेत या साठी आम्हाला आशीर्वाद द्या… आता तरी आम्हाला समज प्राप्त होऊ द्या.. आमचे प्रत्येक कर्म हे मनुष्य सेवा बनू द्या जेणेकरून एखादी व्यक्ती मृत झाल्यावर रडू नाही आले तरी तिच्या सेवेचा आनंद आम्हाला प्राप्त होईल.. आणि जिवंतपणीच आमच्याकडून सेवा होईल .. आम्हाला आज हि समज दिलीस त्याबद्दल धन्यवाद… आमच्याकडून हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद … !

www.chetnakeswar.com

श्री गणपती बाप्पा ची मूर्ती आपणस काय प्रेरणा देत आहे

श्री गणपती बाप्पा ची मूर्तीची आपण स्थापना करतो हि मूर्ती आपणस अनेक गोष्टींची प्रेरणा देते.. चला तर मग आज आपण यावर चिंतन मनन करण्याचा प्रयत्न करूया…विशाल मस्तक आपणस प्रेरणा देते ज्या प्रमाणे बाप्पा बुद्धी ची देवता आहे त्याचप्रमाणे आपण कायम नवनवीन ज्ञान प्राप्त केले पाहिजे.. म्हणजेच कायम आपण नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे… म्हणजेच बाप्पा आपणस प्रेरणा देत आहे आहेत कि ज्ञान प्राप्त कर… सुपासारखे कान आपणस प्रेरणा देतात कि ज्या प्रमाणे सुपाने आपण धान्य साफ करतो त्याच प्रमाणे आपणस बाप्पा सांगत आहेत कि तू अश्याच गोष्टी श्रवण कर जेणेकरून तुझे कल्याण होईल.. अश्याच गोष्टींचे श्रवण कर ज्यात सर्वांचे कल्याण भाव असतील.. ज्या श्रवण केले कि आपली चेतनेची पातळी उंचावेल असेच श्रवण करण्यास बाप्पा आपणस सांगत आहेत… एकदंत म्हणजेच भगवंतास आपण एकदंत म्हणतो यातून बाप्पा आपणस सांगत आहेत कि तुझ्या जवळ काय नाही या पेक्षा तुझ्याकडे जे काही आहे त्यात आपण समाधानी असावे.. पण आपण नेमके उलटे करतो माझ्याकडे काय नाही यावर आपण रडत बसतो बाप्पा सांगतात तुझ्याकडे जे काही आहे त्याचा पुरेपूर वापर कर कारण तुला मी जे दिले आहे ते भरपूर आहे त्याचा वापर कर हि प्रेरणा आपणस बाप्पा च्या एकदंत पासून मिळते…बाप्पा चे उदर आपणस प्रेरणा देते कि इतरांच्या चुका आपण कोणत्याही कायम माफ कराव्यात.. कारण आपण इतरांच्या चुका पाहण्यापेक्षा त्यांच्यातील गुण घ्यावेत व चुका माफ कराव्यात… मोदक बाप्पा ला आवडतात यावरून बाप्पा आपणस सांगत आहेत कि ज्या प्रमाणे मोद म्हणजे आनंद, गोडवा जिव्हाळा हा मोदकात असतो त्या प्रमाणे आपण हि नेहमी आनंदी असावे आपले वर्तन सर्वांशी स्नेहपूर्ण असावे हा बोध आपणस बाप्पा देत आहेत..बाप्पा च्या हातातील परशु आपणस प्रेरणा देतो कि कोणतंही संकट आले तरी भिऊ नका तर त्याला समर्थपणे त्याचा सामना करा कारण संकट काळी आपणस विचाररूपी परशु वापरण्याचा बोध बाप्पा आपणस देत आहेत.. उंदीर हे गणपतीचे वाहन आहे… आपणस बोध देतो कि आपण सदैव आपल्या कार्यसाठी तयार असायला हवे.. म्हणजेच चांगल्या कार्याचे वाहक बनण्याचा बोध इथे आपणस प्राप्त होतो.. थोडक्यात बाप्पा ची मूर्ती आपणस आपल्या विकासासाठी प्रेरणा देत आहे… चला तर मग बाप्पा ची सेवा करत करत बाप्पा ना अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती करूया

प्रार्थना – दोष कुणाचा

हे समर्था.. आज पर्यंत मला वाटत होते की समोरची व्यक्तीच चुकीची आहे..पण आज मला समजले की दोष समोरच्यात नाही तर माझ्या विचारांत आहे..माझ्या विचारांतील दोष दूर कर..कारण माझे जसे विचार तशीच सृष्टी मला प्राप्त होणार आहे..माझी दृष्टी..विचार..आचार प्रेम..आनंद..मौनमय बनव…समर्था ही समज दिल्या बद्दल धन्यवाद.. ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद..!

  • www.chetnakeswar.com