आपण म्हणतो कि चिंतन मनन केले पाहिजे.

स्वामी भक्तहो .. आपण म्हणतो कि चिंतन मनन केले पाहिजे.. पण केले जात नाही कारण चिंतन मनन का करायचे.. याचा फायदा काय हेच आम्ही समजून घेत नाही .. चला आधी आपण चिंतन मनन म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करू… आपण सर्व शिकलो.. आज प्रत्येक जण काही तरी काम करतो.. पण बहुतांशी लोक म्हणतात कि मी जे शिकलो त्याचा आयुष्यात काहीच उपयोग होत नाही.. खरंच हे खरे आहे का ? आहे पण नाही पण कसे पहा.. आपण लहानपणी १,२ ,३,४,५, शिकलो बाराखडी शिकलो… याचा वापर आपल्या जीवनात होतो कि नाही.. होतो कसा तर आपणस अंक कळतात म्हणजेच आर्थिक व्यवहार करताना उपयोग होतो.. बाराखडी येते त्यामुळे आपण वाचू शकतो.. म्हणजेच आपला पाया पक्का आहे.. पण आपण ज्या क्षेत्रात करियर करतो त्याचा पायाचा मजबूत नाही म्हणून आपण म्हणतो कि याचा जीवनात उपयोग नाही .. कारण आपण शाळेत जो अभ्यास केला त्यावर कधीच चिंतन केले नाही.. तसेच हे जे काही ग्रंथ आहेत , स्वामी चरित , गुरुचरित्र, तारक मंत्र हे केवळ पारायण कण्यासाठी नाहीत तर त्यावर आपणस चिंतन मनन करायचे आहे.. कारण प्रत्येक ग्रंथात आपल्याला पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर असते पण आपण ते शोधत नाही तर आपण फक्त पारायण करतो.. जेव्हा तो ग्रंथ असेल वा ओवीं असेल आपल्या अंतःकरणात रुजेल तरच स्वामीं ना आपल्याकडून काय अपेक्षित आहे.. हे आपणस समजेल.. ग्रंथ कोणताही असो नुसता वाचण्यापेक्षा त्यावर चिंतन मनन करा पहा नक्कीच एक आनंददायी जीवनाची अभिव्यक्ती होईल.. असो आपण चिंतन मनन करावे.. स्वामी नाम घ्यावे.. स्वामी सेवेत दंग व्हावे हीच स्वामी चरणी प्रार्थना

 

अशक्य ही शक्य करतील स्वामी

स्वामी वाणी पुष्प ५२६(पर्व ४ थे भाग ३०)

आजचे चिंतन-मनन

अशक्य ही शक्य करतील स्वामी
जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा ,
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा |

www.SwamiVaani.com

स्वामीं भक्तहो..वरील ओवी वर चिंतन मनन काय करणार..कारण तारक मंत्रातील प्रत्येक शब्द हा..तारणहार आहे..स्वामीं भक्त आणि तारक मंत्र.. हे स्वामीं आणि स्वामीं भक्ताच्या नात्याला घट्ट करणारा दोर म्हणा साखळी म्हणा..काय ते भाव आहेत.. मनाला टॉनिक..बुडत्याला आधार..तारक मंत्र म्हणजे..जो स्वामीं भक्ताला तारतो.. भक्ती भाव ह्रदयात उत्पन्न करतो..या विषयी किती ही लिहिले तरी शब्द भांडार कमी पडेल..असो..आपण रोज तारक मंत्र सेवा करत असालच..करत नसाल तर सुरू करा..जगी.. म्हणजे केवळ भारतातच नाही तर संपूर्ण सृष्टीत..प्रत्येक जीवाच्या जन्म आणि मृत्यू ही स्वामीं ची लीला आहे..आणि अश्या या ब्रम्हांड नायकाचे आपण बालक आहोत..इथे बालक म्हणजे आपण त्यांचे बाळ आहोत..पहा आपण आपल्या बाळाची कशी काळजी घेतो..हातावरच्या फोडा पेक्षा अधिक..आपण आपल्या बाळाची काळजी घेतो..मग विचार करा आपण स्वामीं आईचे बाळ आहोत..स्वामीं आपली किती काळजी घेतात…हा अनुभव आहे..जो सूक्ष्म असतो..जो अनुभवता आला पाहिजे..कारण आपले मन चांगले झाले की कधी म्हणते का? स्वामीं मुळे झाले ? जेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टीत शोधू तेव्हा आपणस याचा अनुभव येतो..आपल्याला मनाला सांगता आले पाहिजे..घाबरू नकोस तू स्वामीं चा बाळ आहेस..हा पण इथे ही गोष्ट लक्षात असावी आपले कर्म स्वामीं ना भूषणावह असावे…एखादी गोष्ट आपणस अशक्य वाटत असेल तर..मनाला सांगा अशक्य असे काहीच नाही..कारण अशक्य हा शब्दच मुळात स्वामीं भक्ताला लागू होत नाही..मी फक्त १००% प्रयत्न करणार..आणि जो पर्यंत यश मिळत नाही..तो पर्यंत थांबणार नाही..कारण.. प्रत्येक वेळेस स्वामीं सांगतात की तू या पेक्षा चांगले करू शकतोस.. थांबू नकोस..पहा..सर्व काही शक्य होताना आपणस दिसेल.. धन्यवाद समर्था..! चला स्वामीं ना प्रार्थना करूया..हे समर्था..मी जाणतो की संपूर्ण ब्रम्हांड चा तूच तर चालक आहे..पण माझे मन।हे विसरते.. हे विसरल्या मुळे.. घाबरते..या मनाचा हा विसराळू पणा कायमचा दूर कर..अशक्य हा शब्द आमच्या मनातून..विचारातून काढून टाक.. कारण मी तुझे बालक आहे..आणि तू कधीच आम्हाला भरकटू देत नाहीस..ही समज दिल्याबद्दल धन्यवाद.. ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद…!

दत्त येऊनिया ऊभा ठाकला

स्वामी वाणी पुष्प ५२५(पर्व ४ थे भाग २९)

दत्त येऊनिया ऊभा ठाकला ,
सदभावे साष्टांगेसी प्रणिपात केला |
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ,
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ||

– श्री दत्त महाराजांची आरती
www.SwamiVaani.com

स्वामीं भक्तहो..वरील ओवी वर आपण चिंतन मनन केले असेलच.. लहानपणा पासून श्री दत्त प्रभूंच्या आरती चे कडवे मी म्हणत आहे..आपण ही म्हणत।असाल..पण जेव्हा यावर चिंतन मनन करण्याची आज वेळ आली.. काहीच चिंतन झाले नाही..मग स्वामीं मार्ग दाखवतात.. आणि एका क्षणात स्वामीं नी एका स्वामीं भक्ता मार्फत उत्तर दिले..सर्व प्रथम त्यांना धन्यवाद..ही आरती श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिली असे म्हंटले जाते..या बाबत आपणस माहिती असेल तर आपण सांगावे..भाव इतका खोल आहे की..तो शब्दांत नाही..हे आरतीचे कडवे म्हणजे अनुभव.. दत्त येऊनिया उभा ठाकला..इथे दत्त म्हणजे..परमेश्वराची अनुभीत…आपण म्हणतो संकटात कुणी मदत केली की..दत्ता सारखा उभा राहिलास..म्हणजेच आपल्या ध्यानी मनी नसताना कुणी तरी मदत करते..स्वामीं अनुभूती सुद्धा अशीच आहे..कोणतीच अपेक्षा न करता आपण जेव्हा स्वामीं सेवा करतो..नाम घेतो..नामातून आपण सहज ध्यानात प्रवेश करतो..ध्यानात कधी आपणस स्वामीं अनुभव येतो..आपणस ही कळत नाही..या अनुभूती मध्ये.. फक्त स्वामीं आणि आपणच असतो..या अवस्थेत जेव्हा आपण असतो..ती अवस्था म्हणजे स्वामीं च्या प्रसन्न मुद्रेची अवस्था..स्वामीं यात आशीर्वाद देतात..ही अवस्था म्हणजे.. जन्म आणि मृत्यू च्या पली कडची अवस्था..स्वामीं महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला ही अवस्था मिळावी असे स्वामीं आईचे नियोजन आहे..फक्त गरज आहे..अखंड स्वामीं नाम सेवेची..स्वामीं भक्तहो..चला आपण सर्व मिळून स्वामींना प्रार्थना करूया..हे समर्था..आज या आरतीतील भावाला निमित्त करून आमच्यात जो भक्ती भाव जागृत केलास त्याबद्दल धन्यवाद.. तुझी तर इच्छा आहे की प्रत्येकाला स्वामीं तत्वाची अनुभूती द्यावी..परंतु माझे मन त्यात बाधा निर्माण करते..कृपा।कर माझ्या मनाची चावी तुझ्याकडे घे.. आमच्याकडून अखंड स्वामीं नाम सेवा..अखंड ध्यान सेवा करून घे…कारण तुझ्या इच्छे शिवाय हे होऊ शकत नाही..धन्यवाद समर्था..धन्यवाद चिंतन मनन करून घेतल्याबद्दल.. धन्यवाद प्रार्थना करून घेतल्याबद्दल..!

जाणसी मनीचे सर्व समर्था

स्वामी वाणी पुष्प ५२४(पर्व ४ थे भाग २८)

✨ आजचे चिंतन-मनन ✨

जाणसी मनीचे सर्व समर्था,
विनवू किती भवहरा रे ।।
इतुके देई दीन दयाळा ,
नच तव पद अंतरा रे ।।

– आरती संग्रह (दिंडोरी प्रणित सेवा मार्ग)

www.SwamiVaani.com

स्वामीं भक्त हो..वरील ओवी म्हणजे ह्रदयातून आलेले आर्त भाव..ज्यांच्या हृदयातून हे भाव प्रगट झाले अश्या..प.पु.पिठले महाराज..प.पु. मोरे दादा व गुरुमाऊली यांच्या मुळे आपल्या पर्यंत आले..या सर्वांच्या चरणी प्रार्थना करूया आमच्या कडून या ओवी वर चिंतन मनन करून घ्या…जी आर्त भावनेने केली जाते ती आरती…ज्या शब्दांच्या केवळ श्रवण केले तरी भक्ती भाव जागृत होतो..असे वरील कडवे आहे…हे समर्था तू आमच्या मनातील सर्व जाणतोस..मी काही न बोलताही तुला सर्व काही कळते.. हे समर्था तू तर भव सागर तारक आहेस.. तुला काय , कशी आणि किती प्रार्थना करू..आज इतकीच प्रार्थना आहे की..काहीही होऊ दे पण हे दिन दयाळा..तुझ्या चरणा पासून मला दूर करू नकोस..तुझ्या चरणी जे सुख, आनंद, प्रेम आहे ते इतर कुठेही नाही..धन्यवाद समर्था..धन्यवाद ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद
.!

स्वामी सेवेचा सोपा मार्ग

स्वामी भक्तहो..जप सेवा करायचीच आहे तर सोप्पा मार्ग.. रोज सकाळी उठलात कि मोबाईल फोन सुरु करण्यापूर्वी स्वामी नाम घ्या.. मग मोबाइल हातात घेऊन आजची सेवा सबमिट करा.. झाली कि आजची सेवा.. पहा किती सोपे आहे स्वामी नाम सेवेचा मार्ग…!