आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..!
श्रावण मासी हर्ष मानसी…आपल्या मनात भक्ती भाव वाढवण्याचा मास…आपण।अनेक संकल्प करतो..अनेक मंदिरात जातो..विशेषतः श्री शिव मंदिरात आपण जातो..आपण अनेक गोष्टी भगवान श्री शिव यांना अर्पण करतो..मग आपण अनेक गोष्टी पिंडीवर वाहतो..मग आपल्या भक्ती मुळे तिथे अनेक माश्या होतात..मुंग्या होतात..पहा आपणच मंदिराची स्वच्छता राखली नाही तर ती कोण राखणार..आपणस आपले घर स्वच्छ ठेवतो..तसे मंदिर ही स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे…मग आपण म्हणाल आम्ही ईश्वराला काही अर्पण करायचे नाही का? करायचे त्यासाठी मंदिरात..४- ५ डबे ठेवा… त्यात साखर, दूध, जवस, तीळ, दही, तूप,तेल अजून काही असेल ते त्या डब्यात ठेवा.. आपण मंदिरात अर्पण करत आहोत..ते असे अर्पण केले तर मंदिर स्वच्छ राहतील…हार फुले घ्या ती आपल्या घरी घेऊन आपली घरच्या देवाला वाह…श्री फळ ( नारळ) एक तर देवाला अर्पण करा किंवा प्रसाद म्हणून आपल्या घरी घेऊन जा..घरी जाऊन फोडा..आता प्रश्न निर्माण होईल..मंदिरात असे डबे नाहीत..अहो..आपणच आपल्या परीसरातील मंदिरात ही व्यवस्था करावी..पहा खूप छान सेवा होईल..वाहायचे असेल तर श्री महादेवाच्या चरणी फक्त पाणी अर्पण करूया.. मात्र त्याच बरोबर आपल्यातील षड्ररिपू अर्पण करणे अति महत्वाचे आहे..आपण सर्व ज्ञानी आहात.. नक्कीच आपल्या भक्ती मुळे आपले मंदिर आपण स्वच्छ ठेवाल…धन्यवाद स्वामीं..👍
www.chetnakeswar. com
हे स्वामीं चे घर आहे…आम्ही स्वामीं च्या घरात राहतो
स्वामीं भक्तहो… अनेकदा आपण ऐकतो की वास्तू दोष आहे.. मग तो दोष घालवण्यासाठी आपण अनेक उपाय योजना करतो..आणि त्या केल्याचं पाहिजेत…पण मग याचाच एक भाग म्हणून आपण जर विचार केला की हा दोष आपण कसा दूर करू शकतो.. दोष कोणताही असो तो दूर होऊ शकतो पण जर आपले विचार बदलत नसतील तर तो जो काही दोष आहे..तो मुळापासून दूर कसा होणार..आज आपण अश्याच एका उपायांवर चिंतन मनन करणार आहोत..आज आपण आपल्या घरांना विविध नावे देतो..जसे मातृ पितृ निवास, स्वामीं निवास,स्वप्न पूर्ती निवास..असे अनेक नावे आपण आपल्या वास्तूला देत असतो..पण नाव देताना हे नाव आपणस काय प्रेरणा देत आहे.. यांवर देखील आपण चिंतन मनन करणार आहोत…काही दिवसांपूर्वी एक पाटी मला स्वामीं कृपेनं मिळाली.. त्यावर लिहलं।आहे..” हे स्वामीं चे घर आहे…आम्ही स्वामीं च्या घरात राहतो” या वर चिंतन मनन झाले..एक विचार सुद्धा आपले जीवन बदलून टाकू शकतो तसेच हा एक विचार नक्कीच वास्तू दोष घालवू शकतो प्रेरणा मिळाली..पहा मी कुणाच्या घरात राहतो…स्वामीं च्या म्हणजेच ब्रम्हांड नायकाच्या घरात राहतो..जे स्वामीं चे घर आहे तिथे दोष कसा असणार..पहा एक।विचार कसे जीवन बदलून टाकतो.. इथे महत्वाचे सांगावेसे वाटते की इतरही गोष्टी आपण नाकारत नाही पण प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून करतो तेव्हाच आपणस यश प्राप्त होते..असो.. पहा जेव्हा हा विचार आपल्या अंतर्मनात कोरला जाईल तेव्हा आपण प्रत्येक घराकडे आपल्या स्वतःच्या घराकडे..जे घर आपले ऊन , वारा पाऊस अश्या अनेक संकटापासून रक्षण करते ते आपणस गृह मंदिरच वाटेल..आणि सर्व दोष दूर होतील हा विश्वास आहे..बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय!.धन्यवाद स्वामीं!
स्वामीं नाम
प्रातः काळी उठोन ! आधी करावे नामस्मरण !अंतरी घ्यावे स्वामी चरण ! शुद्धमन करोनी ! संदर्भ – श्री स्वामी चरित्र सारामृत – बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !
www.chetnakeswar.com
चोळाप्पा ने काय केले
योग यागादीक काही ! चोळाप्पा ने केले नाही काही! परी भक्तीसत्व पाही ! स्वामीं आले सदनांते ! संदर्भ – स्वामीं चरित्र
www.chetnakeswar.com
वास्तू दोष निवारण प्रार्थना
स्वामी भक्तहो आपण नेहमी ऐकतो किंवा बोलत असतो कि वास्तू दोष आहे.. पण जर कुणाला विचारले कि वास्तू दोष म्हणजे नेमके काय.. तर नक्कीच आपणस सांगता येणार नाही.. वास्तू दोष असतो किंवा नसतो.. यात आपणस पडायचे नाहीये.. पण आपण ज्या वास्तू मध्ये राहतो तिथे दोष आहे असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण एक प्रकारे नकारात्मक वातावरण तयार करतो.. पहा आपण म्हणतो वास्तू नेहमी काय म्हणते तथास्तु.. मग जेव्हा आपण म्हणतो आमच्या किंवा इतर कुणाच्या हि वास्तूत दोष आहे तेव्हा वास्तू काय म्हणेल.. म्हणजेच आपले विचार बदला..आपल्या बोलण्याची पद्धती बदला नक्कीच आपणस प्रत्येक वास्तू हि चांगलीच दिसेल कारण जशी दृष्टी वा विचार तशी सृष्टी आपण आपल्या जीवनात निर्माण करतो.. आता आपल्या विचारातील दोष घालवायचा आहे.. चला तर मग त्यासाठी रोज आपल्या घरात रोज हि प्रार्थना करूया.. पहा कसे बदल घडतात.. ..!
प्रार्थना – हे वास्तू देवता आज पर्यंत तू आम्हाला.. ऊन वारा , पाऊस , थंडी या पासून आमचे रक्षण केले त्याबद्दल धन्यवाद.. आम्हाला निवारा दिलास त्याबद्दल धन्यवाद.. आज पर्यंत माझ्यातील अज्ञान मुळे मी काही नकारात्मक तुझ्याविषयी बोललो असेल तर त्याबद्दल आम्हाला माफ कर.. तू तर पवित्रच आहेस पण आमचे मन नको नको त्या शंका घेते त्याबद्दल आम्हाला माफ कर.. आज पर्यंत जसे आमचे रक्षण केलेस.. अशीच तुझी साथ आम्हाला लाभू दे..आजपर्यंत जशी तू अनेक पिढ्याना साथ दिलीस अशीच साथ इथून पुढे देत रहा.. धन्यवाद वास्तू देवता.. कोटी कोटी धन्यवाद..बोला शी स्वामी समर्थ महाराज कि जय