श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 2

जिथे स्वामी पाय तिथे न्युन काय – ज्या घरात स्वामी सेवा केली जाते तिथे कश्याची कमतरता नसते. या ठिकाणी घरात म्हणजेच आपले ह्रदय मंदिर. ज्या वेळेस आपण स्वामींची सेवा करतो त्या वेळेस हळू हळू आपले मनाला स्थिरता प्राप्त होते. मनाची शुद्धता झाली कि हृदयातून स्वामी नाम येऊ लागते म्हणजेच ह्रदयात स्वामी विषयी अनन्य भक्ती प्रेम जागृत होते आणि मग त्या आपल्या जीवनात कशाचीच कमतरता राहत नाही. आपले जीवन प्रेम आनंद आणि मौन याने भरून जाते.

स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय – स्वामी महाराज स्वतः आपल्या भक्ताचे प्रारब्ध घडवतात. आपण अनेकदा या गोष्टीची अनुभूती घेतली आहे. अनेकदा आपण अडचणीत संकटात असतो. स्वामी महाराजांना प्रार्थना करतो… ती प्रार्थना करताना आपल्या मनात अनन्य भाव असतो आणि आपण पाहतो कि आपणस व असणारी गोष्टीची प्राप्ती आपणस होते म्हणजेच आपणस अनुभूती येते कि कश्या पद्धतीने स्वामी महाराज आपले प्रारब्ध घडवतात.

आज्ञेविणा काळ ना नेई त्याला – स्वामींच्या इच्छे शिवाय परलोक प्राप्ती सुद्धा होत नाही. याची अनुभूती आपणा पैकी बहुतेकांनी घेतला आहे. अनेक व्यक्ती अश्या परिस्थिती मध्ये असतात कि आपणस असे वाटतं असते कि कधी हि हि व्यक्ती परलोकी जाऊ शकते.. अश्या वेळेस आपण सर्व आपल्या भाव भटकी नुसार स्वामी महाराजांना प्रार्थना करतो आणि मृत्यू शय्ये वर असणारी व्यक्ती बरी होते.. म्हणजेच स्वामींच्या आज्ञे शिवाय आपणस परलोक सुद्धा होत नाही.

परलोकही ना भिती तयाला – आता आपणस जरी मृत्यू आला तरी आपण ज्या कोणत्या लोकी जाऊ तिथे सुद्धा आपणस स्वामी कृपेची अनुभूत प्राप्त होते. म्हणजेच आपणास जरी मृत्यू आला तरी आपणस मृत्यू भीती राहत नाही. पहा समजा आपणस कुणी सांगितलें कि तुम्ही उद्या मरणार आहात. अश्या वेळेस आपल्या मनात असंख्य विचार येतात. मला कसे मरण येणार.. मरण इतक्या लवकर नको… काही त्रास होईल का. असं अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. पण जेव्हा स्वामी सेवेत असतो अन स्वामी कृपेने आपणस आपल्या सत्य स्वरूपाची जाणीव हते तेव्हा सर्व प्रकारची भीती नाहीशी होते व आपले मन सांगते. स्वामीच्या इच्छे नुसार होणार आहे. मी कशाला चिंता , भीती बाळगू

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन १

खरं तर तारक मंत्र म्हणजे प्रत्येक स्वामीं भक्ता साठी स्वामीं च कवच आहे..प्रत्येक शब्द हा स्वामीं अनुभूती आहे..खरंतर ज्यांनी हा तारक मंत्र शब्द रुपात गुंफला..त्यांची भक्ती ची अवस्था ही खूपच वरच्या पात्रते ची असणार..आणि त्यामुळेच स्वामींनी आपल्या सर्वांसाठी तारक मंत्र त्यांच्या कडून करून घेतला..ज्यांनी हा तारक मंत्र शब्द रुपात उतरवला त्यांचे उपकार तर आपण कधीच फेडू शकत नाही..उलट त्यांना प्रार्थना करू या ..आमच्या अल्प बुद्धी ला त्याचा अर्थ उलगडू द्या..जशी भक्ती.. सेवा तुमच्या मार्फत झाली त्यातील काही तर सेवा करण्याची संधी आम्हाला प्राप्त व्हावी..आणि आमचे जीवन स्वामीं मय बनावे हीच प्रार्थना!
निःशंक हो निर्भय हो मन रे !
सुरवातीलाच स्वामीं आपल्या मनाला सांगत आहेत…हे मना..मनात कोणतीही शंका आणू नकोस..कोणतीच भीती मनात ठेवू नकोस…पहा सुरवातीलाच स्वामीं सांगत आहेत आपल्या स्वतःच्या मनावर कार्य करण्यास..कारण आपले मन हे सर्व गोष्टीचे कारक आहे..आपण मनात शंका उपस्थित केली की..आपले होणारे काम ही होत नाही..आपण मनाला सांगायच आहे..हे मना कोणतीच शंका भीती मनात आणू नकोस मनाला सांगायचं आहे..तू जी नकारात्मक बडबड करत आहेस..त्यापेक्षा स्वामीं नाम घे..मना एक गोष्ट लक्षात ठेव सर्व नकारात्मक विचारावर जे राम बाण औषध मला मिळालं आहे..ते म्हणजे “श्री स्वामीं समर्थ” हे नाम अंतर्मनात इतके रुजवा की आपले मन पण म्हणेल..अभी सिर्फ और सिर्फ श्री स्वामी समर्थ”
प्रचंड स्वामीं बळ पाठीशी रे- इथे स्वामीं महाराज आपल्या मनाला सांगण्यास सांगत आहेत ब्रम्हांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची शक्ती माझ्या पाठीशी आहे..आता इथे आपले मन शंका कुशंका निर्माण करते स्वामीं बळ पाठीशी आहे तरी पण आपले मन आपल्या मनात शंका निर्माण करते..या शंकेचे रूपांतर ..नकारात्मकते मध्ये होते..आणि आपल्यासोबत असणारी स्वामीं ची शक्ती जी कार्य करणार होती तिला अडथळा निर्माण होतो..आज आपण हाथ धुतो.. मास्क लावतो का ? कारण आपल्या मनावर हे खोल पर्यंत रुजले आहे की यानी आपण होणाऱ्या रोगाचा अटकाव करू शकतो अगदी तसेच नकारात्मक विचारांना हे माहीत आहे जर आपल्या मनावर नकारात्मक गोष्टी निर्माण झाल्या तर हा नक्कीच यांच्या पासून स्वामीं ची शक्ती बळ यांना प्राप्त होणार आहे यात अडथळा निर्माण होणार आहे..म्हणून मनाला सतत सांगा स्वामीं महाराजांची शक्ती माझ्या सतत सोबत आहे
अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी…स्वामीं महाराज हे आपल्या सामान्य बुद्धी च्या पली कडे आहेत
.याचे आपणस सतत स्मरण ठेवायचे आहे..काय होतं आपल्या मनात स्वामीं विषयी एक विशिष्ट अशी कल्पना रुपी आकृती तयार आहे..आणि त्यानुसार आपण विचार करतो व मन ही यालाच सत्य मानते…आता आपण म्हणाल की मग आम्ही जी मूर्ती ..फोटो पाहतो ते स्वामीं नाहीत का ? असे नाही ते स्वामीच आहेत.. पण फक्त तसेच स्वामींचे स्वरूप जाणतो..पण स्वामीं हे चरा चरात आहेत..पण आपल्या मनावर आपण आज पर्यंत जे काही संस्कार केले आहेत..करत आहोत त्यामुळे… आपण त्यांना ओळखू शकत नाही…त्यामुळं स्वामीं या ठिकाणी सांगत आहेत..की मी सतत तुझ्या सोबत आहे पण तू कोणतेही तर्क.. वितर्क लावत बसू नकोस..कारण तू त्यातच अडकशील.
अशक्य ही शक्य करतील स्वामीं..हा तर आपल्या सर्वांसाठी स्वामींनी दिलेला आशीर्वाद आहे..जर हा आशिर्वाद रुपी मंत्र आपल्या अंतर्मनात कोरला गेला तर या सारखा सुवर्ण योग असूच शकत नाही..कारण ही खूपच उच्चतम स्वामीं कृपा असेल कारण कोणत्याही परिस्थिती मध्ये ह्रदयातून एकच हाक येईल…अशक्य ही शक्य करतील स्वामीं त्याच क्षणी आपली इच्छा पूर्ण झालेली असेल.