चोवीस तास स्वामीं भक्तीत कसे रहावे..!

स्वामी भक्तहो.. आपण अनेकदा म्हणतो ऐकतो.. अनेकदा स्वामी वाणीतून आपण ऐकतो “स्वामी भक्तीत रहावे” स्वामी भक्तीत राहणे याचा अर्थ असा आहे का आपण २४ तास स्वामी नाम घ्यायचे आहे.. हे शक्य सुद्धा नाही.. तर मग आपण स्वामी भक्तीत राहणार कसे.. स्वामी भक्तीत राहणे शक्य आहे का ? हो शक्य आहे.. प्रत्येक कर्म जेव्हा आपण स्वामी सेवा आहे या भावनेनं करू तेव्हा त्याचा अर्थ आपण स्वामी भक्तीत आहोत.. जसे आपण सकाळी स्वामी नाम घेऊन घरा बाहेर पडलो.. आता आपण २४ तास स्वामी नाम घेऊ शकत नाही आणि स्वामींना ते अपेक्षित नाही.. तर आपण ज्या काही चांगल्या कामासाठी घरा बाहेर पडलो आहोत.. ते काम स्वामींनी मला दिले आहे.. मी ते प्रामाणिकने करणार.. हा भाव ठेवून.. आपण जेव्हा ते काम करतो तेव्हा ते काम म्हणजेच स्वामी भक्तीत राहणे होय..आता इथे थोडी गल्लत होऊ शकते कि स्वामी सेवा म्हणजे आपण पैसे कमवणार नाही का? असे नाही तर आपण जे काम करत आहोत त्यात गुणवत्ता देणे म्हणजे.. स्वामी भक्ती.. जसे आपण चहा चा व्यवसाय करत आहोत.. तेव्हा आपल्या कडे येणार ग्राहक हे स्वामींनी पाठवले आहेत.. त्यांना चांगला चहा देणे हि माझी स्वामी सेवाच आहे.. जेव्हा हा भाव आपल्यात जागृत होईल.. आपण तो आपल्या अंतकरणात कोरू .. त्यावर तसे करू त्यावेळी आपण स्वामी भक्तीतच असतो.. पहा आपण यावर चिंतन मनन करा नक्कीच आपले प्रत्येक कार्य हि स्वामी भक्ती होईल.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय .. ! www.chetnakeswar.com

प्रार्थना कोणती पूर्ण होते

प्रार्थना – आपण लहान पणा पासून ऐकतो प्रार्थना करत आलो आहोत.. आपण हि आपल्या मुलांना हि प्रार्थना करण्यास सांगतो.. पण प्रार्थना म्हणजे असते तरी काय.. हृदयातून निघालेला आवाज जो सर्वांचा हित दायक असतो त्यास आपण प्रार्थना म्हणू शकतो आता याची अशी एकच व्याख्या करणे अवघड आहे.. कारण प्रत्येकाच्या या बाबत वेगवेगळे मत आहेत.. पण आपण जर अनेक प्रार्थना पाहिले तर आपणस जाणवते कि.. प्रार्थना हि नेहमी विश्व कल्याण करणारी असते हे आपणस जाणवते..आपण अनेकदा व्यक्तिगत प्रार्थना करतो.. त्या पूर्ण होण्यास वेळ लागतो.. पण जेव्हा आपण सर्व समावेशक म्हणजेच अव्यक्तिगत प्रार्थना करतो तेव्हा ती लवकर पूर्ण होते.. जसे पसायदान आपण जर या वर चिंतन मनन केले तर आपणस जाणवेल माऊलींनी विश्वाचे कल्याण व्हावे या साठीच प्रार्थना केली आहे.. आपण प्रार्थना करताना ती कोणत्या भाषेत वा शब्दांत करतो या पेक्षा आपले भाव महत्वाचे आहेत..आपण रोज प्रार्थना करताना प्रयत्न करा कि सर्वांसाठी प्रार्थना करूया.. पहा आपल्या मनात प्रश्न निर्माण होईल कि सर्वांसाठी का ? पहा आपल्या सर्वांचे सुख हे एकमेकांवर अवलंबून आहे.. पहा समजा माझा कपडे विकण्याचा व्यवसाय आहे.. मी म्हंटल कि माझा चालू दे.. तर हि प्रार्थना अपूर्ण आहे.. कारण माझा व्यवसाय हा ग्राहकावर अवलंबून आहे.. ग्राहक तेव्हाच येईल जेव्हा त्या कडे पैसे असतील.. त्या कडे तेव्हाच पैसे येतील जेव्हा तो जिथे नोकरी करत असेल तो व्यवसाय व्यवस्थित चालत असेल.. म्हणजेच प्रत्येकाचे सुख हे एकमेकांवर अवलंबून आहे.. जर इतर सुखी होतील तरच आपण हि सुखी होऊ शकतो.. म्हणून मला प्रार्थना करताना अशी करावी लागेल कि.. सर्वांचा व्यवसाय , नोकरी मध्ये यश प्राप्त होऊ दे.. म्हणजेच प्रार्थना व्यक्तिगत न राहता.. विश्वकल्याणाची होईल.. आपणस जी काही प्रार्थना सुचते ती नेहमी लिहून ठेवण्याचा प्रयत्न करा.. पहा आपल्याच प्रार्थना भविष्यात आपणस प्रेरणा देतील.. चला तर मग आजपासून आपल्या प्रार्थना बदलूया.. आपले जीवन बदलूया.. धन्यवाद स्वामी..!
या बाबत आपले अभिप्राय आपण आम्हाला – chetnakeswar.com@gmail.com यावर पाठवू शकता

हे मना !! अशाच व्यक्तीच्या पावलावर पाऊल टाक.. ज्याच्या प्रवासाची दिशा आणि तुझ्या धेय्याची दिशा एकच आहे..!!

स्वामी वाणी पुष्प ५९०(पर्व ४ थे भाग ९४)*

*प्रेरणादायी बोल*

हे मना !! अशाच व्यक्तीच्या पावलावर पाऊल टाक.. ज्याच्या प्रवासाची दिशा आणि तुझ्या धेय्याची दिशा एकच आहे..!!

www.SwamiVaani.co.in

स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी खूप खोल आहे..कारण आपल्या विचारानुसार आपण अर्थ लावू शकतो..त्यामुळे यावर खूप खोल चिंतन मनन आवश्यक आहे..स्वामीं आपणच चिंतन मनन करून घ्या..सर्वप्रथम आपण सर्वांनी स्वतःला प्रश्न विचारणे आवश्यक आहे की माझ्या जीवनाचे ध्येय काय आहे? कदाचित यांवर विचार केला नसेल तर आता यावर विचार करा..ध्येय हे कोणतेही असू शकते.. माझं ध्येय असेल खूप पैसे कमविणे.. यात वाईट काही आहे का ? नाही ..पण खूप पैसे कशा साठी हे सुद्धा स्पष्ट असावे..त्या साठी काय करणार हे निश्चित असावे…या साठी आपले मार्गदर्शक कोण आहेत..कुणाच्या पावलावर पाऊल आपण टाकणार आहोंत..हे खूप महत्त्वाचे.. आपला आदर्श श्रीमंत व्यक्ती असणार हे निश्चित..पण व्यक्ती श्रीमंत कशी झाली ? कष्ट करून की अनीती ने..त्या व्यक्तीच्या जीवनाचा उद्देश केवळ पैसे कमविणे आहे की मिळालेल्या पैशाचा वापर..सर्वांच्या हितासाठी करतो..हे महत्वाचे..कदाचित आपल्या मनात येईल की मी पैसे कमवून समाज हित का करू ? समाज हित म्हणजे केवळ दानधर्म नसून.. आपल्या कर्मातील नीतिमत्ता ही सुद्धा समाज सेवाच आहे..म्हणजेच आपला आदर्श हा असाच असावा जो समाजहित कारी असेल..नाही तर आपले धेय्य कदाचित तातपुरते साध्य होईल पण ते अखंड यश नक्कीच नसेल..त्यात यशाचा सुवास नसेल..स्वामीं ना भूषणावह नसेल.. थोडक्यात अश्याच व्यक्तीच्या पाऊलावर पाऊल टाकूया ज्यांच्या यशाच्या प्रवासाची दिशा ही सर्वसमावेशक असेल.. जेव्हा आपण असे करतो तेव्हा आपले प्रत्येक कर्म हे स्वामीं सेवा बनते..स्वामीं ना अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती होते..धन्यवाद समर्था..कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय..!

परमशांती मधील स्वरनाद – श्री स्वामी समर्थ

स्वामी वाणी पुष्प ५८०(पर्व ४ थे भाग ८४)*

*आजचे चिंतन-मनन*

परमशांती मधील स्वरनाद तू ,
शून्या मधील अस्तित्व तू ,
बुद्धीच्या ही पलीकडे असलेला ,
ऐसा अतर्क्य समर्थ तू !!
www.SwamiVaanni.co.in

स्वामीं भक्तहो…परमशांती मधील स्वरनाद तू !!! आपण अनेकदा कळत न कळत कधी तरी म्हणतो मला शांती हवी आहे..पण ही शांती आहे तरी कुठे..याचे उत्तर मात्र आपणस मिळत नाही..आपण केवळ म्हणतो शांती शांती..मग आपण इतरत्र शांतीला शोधतो.. ही आपण शांती शोधतो.. स्वामीं तर आपणस परम शांती देत आहेत..पण ती आपण ग्रहण करत नाही..ती परम शांती आहे स्वामी नामात, स्वामीं चरणी, स्वामीं ध्यानी..फ़क्त गरज आहे त्या स्वामी नामाच्या स्वराशी एकरूप होण्याची…शून्या मधील अस्तित्व तू ..! शुन्य याला किंमत आहे की नाही आपण सर्वजण जाणतो..पैश्यात 0 नसेल तर काय होईल..परीक्षेत 0 मार्क मिळाले तर काय होते…वेळेत 0 सेकंदाचे…सर्वात महत्वाचे आयुष्याच्या शेवटचा श्वास घेतल्यानंतर आपण कुणीही।असलो तरी बरोबर काय येते ? शून्य..म्हणजेच शून्याला इतके।महत्त्व.. या शून्याचा वापर आपण करून घेतला पाहिजे कारण या शून्याच्या पलीकडे जे काही परम सत्य..परमशांती आहे ती म्हणजे ” श्री स्वामी समर्थ” कारण त्याच्या शिवाय कोणतेच अस्तित्व निर्माण होत नाही किंवा लय सुद्धा पावत नाही..बुद्धीच्या ही पलीकडे असलेला ,ऐसा अतर्क्य समर्थ तू !! पहा असा जो समर्था आहे तो कुठे आहे? आपणस हा प्रश्न विचारला की आपण आपल्या बुद्धीचा वापर सुरू करतो…आपल्या बुद्धितील तर्क.. वितर्क…मनातील विचार या द्वारे आपण त्याला शोधण्याचा प्रयत्न करतो…बुद्धी वर इतका भार देतों की मन म्हणते हे काही शकय नाही…बुद्धिवाद म्हणतो असे काहीच नाहीये..कारण आपण प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या माप दंडात मोजून पहातो.. पण आपण हे विसरतो किंवा आपणस माहिती नसते..ईश्वर ही बुद्धीने शोधण्यासाठी नाही तर ह्रदयातून हाक मारण्याची शक्ती आहे..पहा अनेक विषय बुद्धी ने सुटत नाहीत तेव्हा आपण म्हणतो ” दिमाग से नहीं दिल से काम करो”
म्हणजेच स्वामीं ची अनुभूती घ्यायची असेल तर ह्रदयातून होईल बुद्धीने नाही…कारण स्वामीं अतर्क्य आहेत..धन्यवाद स्वामीं…कोटी कोटी धन्यवाद…बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय..!