साडेसाती – आत्मशुद्धीचा काळ

Oct 23, 2025 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

साडेसाती म्हणजे शनीचा आपल्यावर कृपेचा काळ — जो आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि आत्मशुद्धीची संधी देतो.
हा काळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.
शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते आपले कर्म दाखवतात आणि सुधारण्याची संधी देतात.
म्हणून साडेसातीमध्ये घाबरू नका, श्रद्धा ठेवा आणि सकारात्मक विचार करा.
हा काळ तुमच्या उत्कर्षाचा आहे — तो तुमचं कल्याणच करणार आहे.

स्वामी भक्त हो आपण आपल्या चॅनल वर आपले प्रश्न जे आहेत त्यावर चिंतन मनन करून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया ज्याचा उपयोग सर्वांना होणार आहे त्यामुळे आपल्याही मनात काही प्रश्न असतील तर ते आपण आम्हाला ई-मेल द्वारे पाठवू शकता किंवा कंमेंट मध्ये मांडू शकता आपण त्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया.. सर्वप्रथम आपले चॅनेल लाईक share आणि सुब्स्क्रिब करा.. आजचा आपला विषय आहे साडेसाती म्हणजे काय ? साडेसाती मध्ये काय करावे.. चला तर मग सुरवात करूया.. साडेसाती” म्हणजे शनी ग्रहाचा एखाद्या व्यक्तीच्या जन्मराशीवरून साडे-सात वर्षांचा प्रवास (7.5 वर्षे).
यात शनी तीन राशींमध्ये भ्रमण करतो:जन्मराशीच्या आधीची रास (२.५ वर्षे) जन्मराशी (२.५ वर्षे) जन्मराशी नंतरची रास (२.५ वर्षे) म्हणजे एकूण २.५ + २.५ + २.५ = ७.५ वर्षे → म्हणून नाव “साडेसाती”.साडेसाती तेव्हा सुरू होते, जेव्हा शनी जन्मराशीच्या आधीच्या राशीत प्रवेश करतो.
उदा. — जर एखाद्याची जन्मराशी “मकर” असेल, तर शनी धनु राशीत आला की साडेसाती सुरू होते आणि कुंभ राशीतून बाहेर पडल्यावर संपते.अनेक लोक साडेसाती आली कि घाबरतात आणि मग आपल्या नशिबाला दोष देतात.. पण हा काळ आपल्या उत्कर्षाचा काळ असतो.. शनी देव हे आपल्या कर्माचा हिशोब पाहतात पहा चांगले कर्म असेल तर चांगले फळच मिळेल.. म्हणजेच साडेसाती हा शब्द आपणस सदैव चांगले कर्मच करण्याचा उपदेश करत आहे नाही तर आपण वाईट अश्या परिणामांना सामोरे जावे लागते… म्हणजेच साडेसाती हा आपल्या कर्माचा आरसा आहे.. आता अनेकांना साडेसाती मध्ये दुःख यातना भोगाव्या लागतात पण याच साडेसाती मध्ये आपला उत्कर्ष होत असतो.. पण त्या आपल्याला हि समज असणे आवश्यक आहे कि हि साडेसाती माझे कल्याणच करणार आहे.. हा विश्वास .. श्रद्धा असली पाहिजे.. पहा एखादी गोष्ट वाईट म्हंटल कि आपले वाईटच होते.. जसे आपले विचार तसे आपले जीवन.. साडेसाती मध्ये मन घाबरते खरंतर मनाला सांगा आता तर माझा चांगला काल सुरु झाला आहे.. हो थोडे कष्ट यातना होत आहेत पण या काही वेळे नंतर मला सुखी करणार आहेत.. मला माझ्यात बदल करणे आवश्कयक असेल तो बदल करावा लागेल.. हि तर माझ्या चांगल्या आयुषची सुरवात आहे.. आता मी थांबणार नाही तर लढणार आहेकारण शनिदेव हे माझे कल्याणच करणार आहेत.. आता यात काय करावे.. सर्वप्रथम आपले विचार वर काम करा ते सकारात्मक बनवा.. त्या साठी चांगले पुस्तक वाचा.. शनी देवाला प्रार्थना करा.. शनी मंत्र म्हणा.. मनाला सांगा हा माझ्या उत्कर्षाचा काळ आहे.. जे काही घडतंय, ते माझ्या विकासासाठी घडतंय.” शनी महाराज माझे शत्रू नाहीत तर ते माझे कल्याण करणारे आहेत.. ते माझे उत्कर्ष करत आहेत.. पहा एक विचार किती फरक पडतो.. पहा नक्कीच मार्ग सापडू लागेल.. आज इथे थांबू पुन्हा भेटू नवीन प्रश्न आणि त्यावरील चितनं मनन घेऊन तो पर्यत आपले काही प्रश्न असतील तर पाठवा..द धन्यवाद


Share
और पढिये !!

यश मिळवणे सोपे आहे

यश मिळवणे सोपे आहे कि अवघड आहे.. आपल्या प्रत्येकाला यश हवे.. जसे आपल्याला यश हवे आहे तसे यश प्रत्येकालाच हवे आहे... आपल्या प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी आहे.. विद्यार्थी असेल तर काही म्हणतील ८० टक्के मिळावेत..८० टक्के मिळणार ८५ म्हणेल.. पण मग इथे प्रश्न निर्माण...

इच्छा पूर्ती चा मंत्र

स्वामीं भक्तहो...इच्छा...आपण नेहमी म्हणतो..माझी अमुक अमुक इच्छा आहे..थोड्या वेळाने दुसरी इच्छा निर्माण होते..पुन्हा तिसरी... अश्या अनेक इच्छा आपल्या मनात निर्माण होतात..खरंच आपली इच्छा काय आहे..आपली कोणती इच्छा पूर्ण होते..कोणती इच्छा पूर्ण होते..नक्कीच यावर चिंतन मनन...

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले आपण जे आचरण करतो.. तेच उपदेश लोकांना द्यायचे. स्वामी भक्त हो आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत.. आपल्या वाणी तुन आपण जे बोलतो तसेच आपले आचारण असले पाहिजे.. म्हणजे समजा आपण म्हणत असू कि अमुक गोष्ट करू नका वाईट असते.. पण सर्व...

स्वामींना कोणीही फसवू शकत नाही

स्वामी भक्तहो.. कितीही चलाखी करा.. स्वामींना कोणीही फसवू शकत नाही..स्वामींना सर्व समजते..!! स्वामी भक्त हो यात खूप खोल असा अर्थ आहे.. सर्वप्रथम आपल्या मनात येते आम्ही तर कोणतीच चलाखी करत नाही..हे आपण जे उत्तर देत आहोत हेही आपल्या मनाची चलाखी आहे ना.. पहा स्वामी सेवा...

ईश्वर एकच आहे

बोध - आपली श्रद्धा कोणत्याही देवावर असो.. ईश्वर एकच आहे.. कुणी स्वामी म्हणेल.. कुणी माऊली.. कुणी राम , कुणी कृष्ण पण प्रत्येकाची हाक हि स्वामी कडे जाते..फक्त आपला विश्वास महत्वाचा. प्रार्थना - स्वामी ज्या प्रमाणे सूरदास यांच्या हाकेला वो दिलीस तशीच तू आमच्या हाकेला...

स्वामी भक्त सूरदास यांच्या पासून बोध

स्वामीं भक्त हो..आपण लीला।वाचली असेल..नसेल तर वाचा...! बोध-- वरील लीला जर आपण वाचली..चिंतन मनंन केले तर..बोधच बोध आहेत..चला आजचा बोध पाहू...स्वामीं नी कृपा केली त्याचे नाव काय होते..."सूरदास" ज्यांचा सूर स्वामीं च्या सुराशी जुळला आहे..तो का जुळला त्यांनी..श्री कृष्ण...

घरातील देवांना अभिषेक

स्वामीं भक्तहो...आपण रोज आपल्या घरातील देवांना अभिषेक करावा..पण मंत्र माहीत नाहीत..अहो..महामंत्र माहीत आहे ना..."श्री स्वामीं समर्थ" १०८ वेळेस म्हणा...पुजा सुरू केल्यापासून.. संपेपर्यंत... फक्त स्वामीं नाम...पहा किती सोपे।आहे...अहो माझ्या स्वामीं ची सेवा सोपीच...

स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत

स्वामीं भक्तहो..या लीलेत स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत..पण भक्ती कशी वाढेल..ती दृढ कशी होईल..कारण नुसते भक्ती भाव म्हणून तो जागृत होईल का? आपल्याला भुक लागली आहे..समोर पंचपक्वांन्न आहेत..ते पाहून आपली भुक भागेल का? त्या साठी आपणस ते अन्न खावे...

भक्ती आणि ज्ञान

स्वामीं भक्त हो..भक्ती आणि ज्ञान या एकमेकांना पूरक आहेत तश्याच बाधक ही आहेत..आपण म्हणाल कसे..आता आपण आपलेच उदाहरण घेऊ...आपल्याला स्वामीं ची पुजा करायची आहे..आपल्याला सगळे मंत्र आणि तंत्र माहिती आहेत...आपण विधिवत पूजा करत आहोत...आपल्या मनातील भाव तपासून पहा...कुठे तरी...

स्वामींची भक्ती

स्वामी भक्तहो.. स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत भक्ती हवी.. आपण सर्व स्वामींची भक्ती करतो पण कधी कधी आपले मन स्वामी भक्ती मध्ये व्यवहारिक पणा आणते.. इथे एक गोष्ट स्प्ष्ट करावीशी वाटते ती म्हणजे प्रार्थना आणि व्यवहारिक पणा यातील भेद आपणस समजला पाहिजे..नक्कीच तो यातून...