श्री गणेशला पूजेचा प्रथम मान कसा मिळाला गणेश पुराण कथा २

Sep 14, 2025 | मराठी

Share

कथा २ – प्रथमपूजेचा मान गणेशांना कसा मिळाला
एकदा सर्व देवगणांनी शिवजींना विचारले –“प्रभो! आमच्यापैकी प्रथमपूजेचा अधिकारी कोण?”
शिवजी म्हणाले –“जो संपूर्ण विश्वाची परिक्रमा करून सर्वांत आधी येईल, तोच मानकरी.”
सर्व देवगण भव्य वाहनांवर बसून निघाले. पण गणेशजींचे वाहन होते लहान मूषक.गणेशजींनी मनाशी विचार केला –“विश्व म्हणजेच आईवडील. त्यांच्या प्रदक्षिणेनेच संपूर्ण परिक्रमा पूर्ण होते.”आणि त्यांनी आई-पित्याची प्रदक्षिणा केली.बोला गणपती बाप्पा मोरया..!
बोध:वरील कथा ही खरंतर आपल्यासाठी आहे पहा..जसे गणपती बाप्पा चे वाहन मूषक आहे..वाहन छोटे पण महत्त्वाचे आहे..आपल्या जीवनात ही अनेकदा अनेक लहान लहान गोष्टी आपल्याकडे असतात पण आपण आपल्या कडे जे आहे ते न पहाता..म्हणतो माझ्याकडे एवढेच आहे…जसे माझ्या कडे सायकल आहे…गाडी नाही..पण आपण आपण आपल्या कडे जे आहे त्यातून खूप काही करू शकतो..फक्त आपला दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे…बाप्पा नी आपल्या आई वडिलांना प्रदक्षिणा घातली…म्हणजेच काय आपले आद्य कर्तव्य या ठिकाणी बाप्पा सांगत आहेत..आधी आपली आई..वडिलांची सेवा करा..तोच धर्म आहे..तोच कल्याणाचा मार्ग आहे…इतरांपेक्षा वेगळा विचार करण्याची क्षमता असेल तरच आपण खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकतो…प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी केवळ बाह्य परिस्थितीकडे पाहू नये; योग्य विचार महत्त्वाचा आहे….बोला गणपती बाप्पा मोरया…चला बाप्पा ला प्रार्थना करूया…
प्रार्थना..हे गणपती बाप्पा..तू माता पिता यांना प्रदक्षिणा घालून विश्व प्रदक्षिणा करून आम्हाला आई वडिलांच्या सेवेचे महत्व पटवून दिले आहेस..मात्र आम्ही इतर सर्व करतो…पण आई वडिलांची सेवाच विसरतो… आमच्या वर कृपा कर..आणि आमच्याकडून आई वडिलांची सेवा घडू दे… आमच्या मुळे त्यांच्या डोळ्यात कधी अश्रू येऊ नयेत…आमच्यातील सेवा भाव इतका दृढ कर की..आमची मातृ पितृ सेवा पाहून…इतरांनाही प्रेरणा मिळेल…कोणतेच आई वडील वृद्धाश्रमात नसतील…ही बुद्धी सर्वांना दे..कारण तुझ्या कृपेने हे शक्य आहे…ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद..! बोला गणपती बाप्पा मोरया..!
www.chetnakeswar.com


Share
और पढिये !!

यश मिळवणे सोपे आहे

यश मिळवणे सोपे आहे कि अवघड आहे.. आपल्या प्रत्येकाला यश हवे.. जसे आपल्याला यश हवे आहे तसे यश प्रत्येकालाच हवे आहे... आपल्या प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी आहे.. विद्यार्थी असेल तर काही म्हणतील ८० टक्के मिळावेत..८० टक्के मिळणार ८५ म्हणेल.. पण मग इथे प्रश्न निर्माण...

इच्छा पूर्ती चा मंत्र

स्वामीं भक्तहो...इच्छा...आपण नेहमी म्हणतो..माझी अमुक अमुक इच्छा आहे..थोड्या वेळाने दुसरी इच्छा निर्माण होते..पुन्हा तिसरी... अश्या अनेक इच्छा आपल्या मनात निर्माण होतात..खरंच आपली इच्छा काय आहे..आपली कोणती इच्छा पूर्ण होते..कोणती इच्छा पूर्ण होते..नक्कीच यावर चिंतन मनन...

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले आपण जे आचरण करतो.. तेच उपदेश लोकांना द्यायचे. स्वामी भक्त हो आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत.. आपल्या वाणी तुन आपण जे बोलतो तसेच आपले आचारण असले पाहिजे.. म्हणजे समजा आपण म्हणत असू कि अमुक गोष्ट करू नका वाईट असते.. पण सर्व...

स्वामींना कोणीही फसवू शकत नाही

स्वामी भक्तहो.. कितीही चलाखी करा.. स्वामींना कोणीही फसवू शकत नाही..स्वामींना सर्व समजते..!! स्वामी भक्त हो यात खूप खोल असा अर्थ आहे.. सर्वप्रथम आपल्या मनात येते आम्ही तर कोणतीच चलाखी करत नाही..हे आपण जे उत्तर देत आहोत हेही आपल्या मनाची चलाखी आहे ना.. पहा स्वामी सेवा...

ईश्वर एकच आहे

बोध - आपली श्रद्धा कोणत्याही देवावर असो.. ईश्वर एकच आहे.. कुणी स्वामी म्हणेल.. कुणी माऊली.. कुणी राम , कुणी कृष्ण पण प्रत्येकाची हाक हि स्वामी कडे जाते..फक्त आपला विश्वास महत्वाचा. प्रार्थना - स्वामी ज्या प्रमाणे सूरदास यांच्या हाकेला वो दिलीस तशीच तू आमच्या हाकेला...

स्वामी भक्त सूरदास यांच्या पासून बोध

स्वामीं भक्त हो..आपण लीला।वाचली असेल..नसेल तर वाचा...! बोध-- वरील लीला जर आपण वाचली..चिंतन मनंन केले तर..बोधच बोध आहेत..चला आजचा बोध पाहू...स्वामीं नी कृपा केली त्याचे नाव काय होते..."सूरदास" ज्यांचा सूर स्वामीं च्या सुराशी जुळला आहे..तो का जुळला त्यांनी..श्री कृष्ण...

घरातील देवांना अभिषेक

स्वामीं भक्तहो...आपण रोज आपल्या घरातील देवांना अभिषेक करावा..पण मंत्र माहीत नाहीत..अहो..महामंत्र माहीत आहे ना..."श्री स्वामीं समर्थ" १०८ वेळेस म्हणा...पुजा सुरू केल्यापासून.. संपेपर्यंत... फक्त स्वामीं नाम...पहा किती सोपे।आहे...अहो माझ्या स्वामीं ची सेवा सोपीच...

स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत

स्वामीं भक्तहो..या लीलेत स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत..पण भक्ती कशी वाढेल..ती दृढ कशी होईल..कारण नुसते भक्ती भाव म्हणून तो जागृत होईल का? आपल्याला भुक लागली आहे..समोर पंचपक्वांन्न आहेत..ते पाहून आपली भुक भागेल का? त्या साठी आपणस ते अन्न खावे...

भक्ती आणि ज्ञान

स्वामीं भक्त हो..भक्ती आणि ज्ञान या एकमेकांना पूरक आहेत तश्याच बाधक ही आहेत..आपण म्हणाल कसे..आता आपण आपलेच उदाहरण घेऊ...आपल्याला स्वामीं ची पुजा करायची आहे..आपल्याला सगळे मंत्र आणि तंत्र माहिती आहेत...आपण विधिवत पूजा करत आहोत...आपल्या मनातील भाव तपासून पहा...कुठे तरी...

स्वामींची भक्ती

स्वामी भक्तहो.. स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत भक्ती हवी.. आपण सर्व स्वामींची भक्ती करतो पण कधी कधी आपले मन स्वामी भक्ती मध्ये व्यवहारिक पणा आणते.. इथे एक गोष्ट स्प्ष्ट करावीशी वाटते ती म्हणजे प्रार्थना आणि व्यवहारिक पणा यातील भेद आपणस समजला पाहिजे..नक्कीच तो यातून...